शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

“पाकिस्तानात झोपलो होतो, सकाळी डोळे उघडताच अख्खं गाव भारताचा भाग बनलं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 17:09 IST

जेव्हा युद्ध संपलं तेव्हा पत्नी त्यांच्या पतीपासून, वडील त्यांच्या मुलापासून आणि भाऊ भावापासून वेगळे झाले होते.

नवी दिल्ली – श्योक नदीच्या काठापासून अवघ्या ३० मिनिटांचा रस्ता आहे परंतु ८६ वर्षीय हाजी शमशेर अली मागील ५० वर्षापासून हे अंतर पार करु शकले नाहीत. सीमेपलीकडेच पाकिस्तानच्या गिलगित-बाल्टिस्तान भागात हाजी अलीचा छोटा भाऊ हाजी अब्दुल कादीर राहतात. या दोन्ही भावांमध्ये दुरावा नशिबाने लिहिला आहे. १६ डिसेंबर १९७१ च्या सकाळी विजयाच्या बातमीसोबतच नवीन देश बनल्याची माहिती समोर आली. सकाळी डोळे उघडताच ते पाकिस्तानात नाहीत असं त्यांना कळालं.

रातोरात नियंत्रण रेषा बदलली होती त्यासोबतच ३५० कुटुंबाचं आयुष्यही बदललं. तुतुर्क आणि लडाखच्या नुब्रा खोऱ्यात ३ आणखी गावं जी १९४७ मध्ये पाकिस्तानच्या ताब्यात होती. ते भारताचा भाग बनले होते. अलीचा मुलगा हुसैन गुल्ली एक ट्रव्हल एजेंट आहे. त्याने सांगितले की, त्यावेळी मी तरुण होतो. शिक्षणासाठी मी लाहौरला जायचो. गावात खुप कमी लोकं होती. त्यात वुद्ध आणि लहान मुलं जास्त होती. जेव्हा युद्ध संपलं तेव्हा पत्नी त्यांच्या पतीपासून, वडील त्यांच्या मुलापासून आणि भाऊ भावापासून वेगळे झाले होते. अली यांचे भाऊ कादिर युद्धावेळी स्कार्दू येथे कामाला गेले होते असं त्यांनी सांगितले.

त्या आठवणींना उजाळा देताना गुल्ली म्हणाले. सुरुवातीला आम्ही जिवंत आहोत की नाही हेच कळत नव्हतं. माझी पत्नी, काकी माझ्यासोबत होती. आम्हाला त्यांची प्रतिक्षा करावी लागली. त्यानंतर स्कार्दूच्या रेडिओवर एका कार्यक्रमात कादीरचं नाव घेतलं गेले. ते ऐकून आमच्या जीवाला शांती मिळाली. रेडिओ पकडून आम्ही खूप रडलो. ही सीमा आमच्या मनावर कोरली गेली. त्यानंतर पत्र, भेटीसाठी खूप काळ वाट पाहावी लागली. दोन्ही देशांकडून व्हिसा मिळणं खूप कठीण होतं. अनेकदा कुटुंबातील जन्म-मृत्यूची बातमीही मिळण्यास वर्ष लोटत होती. अखेर १९८९ मध्ये मक्का येथे दोन्ही भाऊ एकमेकांना हज यात्रेच्या निमित्ताने भेटले.

अलविदा म्हणणं खूप कठीण

४९ वर्षीय फाजिल अब्बास नशिबवान निघाले. त्यांचे मोठे बंधू मोहम्मद बशीर जे त्यावेळी पाकिस्तानात शिक्षण घेत होते. २०१३ मध्ये व्हिसा घेऊन भारतात आले. अब्बास सांगतात की, माझे वडील वाट पाहत निघून गेले परंतु आईला तिच्या छोट्या मुलाला भेटता आले. मी ४२ वर्षानंतर पहिल्यांदा भावाला भेटलो. बशीरच्या स्वागतासाठी गाव सजलं होतं. आम्ही खूप आनंदात होतो. तो २ महिने थांबला आणि पुन्हा निघाला तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान