शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

“पाकिस्तानात झोपलो होतो, सकाळी डोळे उघडताच अख्खं गाव भारताचा भाग बनलं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 17:09 IST

जेव्हा युद्ध संपलं तेव्हा पत्नी त्यांच्या पतीपासून, वडील त्यांच्या मुलापासून आणि भाऊ भावापासून वेगळे झाले होते.

नवी दिल्ली – श्योक नदीच्या काठापासून अवघ्या ३० मिनिटांचा रस्ता आहे परंतु ८६ वर्षीय हाजी शमशेर अली मागील ५० वर्षापासून हे अंतर पार करु शकले नाहीत. सीमेपलीकडेच पाकिस्तानच्या गिलगित-बाल्टिस्तान भागात हाजी अलीचा छोटा भाऊ हाजी अब्दुल कादीर राहतात. या दोन्ही भावांमध्ये दुरावा नशिबाने लिहिला आहे. १६ डिसेंबर १९७१ च्या सकाळी विजयाच्या बातमीसोबतच नवीन देश बनल्याची माहिती समोर आली. सकाळी डोळे उघडताच ते पाकिस्तानात नाहीत असं त्यांना कळालं.

रातोरात नियंत्रण रेषा बदलली होती त्यासोबतच ३५० कुटुंबाचं आयुष्यही बदललं. तुतुर्क आणि लडाखच्या नुब्रा खोऱ्यात ३ आणखी गावं जी १९४७ मध्ये पाकिस्तानच्या ताब्यात होती. ते भारताचा भाग बनले होते. अलीचा मुलगा हुसैन गुल्ली एक ट्रव्हल एजेंट आहे. त्याने सांगितले की, त्यावेळी मी तरुण होतो. शिक्षणासाठी मी लाहौरला जायचो. गावात खुप कमी लोकं होती. त्यात वुद्ध आणि लहान मुलं जास्त होती. जेव्हा युद्ध संपलं तेव्हा पत्नी त्यांच्या पतीपासून, वडील त्यांच्या मुलापासून आणि भाऊ भावापासून वेगळे झाले होते. अली यांचे भाऊ कादिर युद्धावेळी स्कार्दू येथे कामाला गेले होते असं त्यांनी सांगितले.

त्या आठवणींना उजाळा देताना गुल्ली म्हणाले. सुरुवातीला आम्ही जिवंत आहोत की नाही हेच कळत नव्हतं. माझी पत्नी, काकी माझ्यासोबत होती. आम्हाला त्यांची प्रतिक्षा करावी लागली. त्यानंतर स्कार्दूच्या रेडिओवर एका कार्यक्रमात कादीरचं नाव घेतलं गेले. ते ऐकून आमच्या जीवाला शांती मिळाली. रेडिओ पकडून आम्ही खूप रडलो. ही सीमा आमच्या मनावर कोरली गेली. त्यानंतर पत्र, भेटीसाठी खूप काळ वाट पाहावी लागली. दोन्ही देशांकडून व्हिसा मिळणं खूप कठीण होतं. अनेकदा कुटुंबातील जन्म-मृत्यूची बातमीही मिळण्यास वर्ष लोटत होती. अखेर १९८९ मध्ये मक्का येथे दोन्ही भाऊ एकमेकांना हज यात्रेच्या निमित्ताने भेटले.

अलविदा म्हणणं खूप कठीण

४९ वर्षीय फाजिल अब्बास नशिबवान निघाले. त्यांचे मोठे बंधू मोहम्मद बशीर जे त्यावेळी पाकिस्तानात शिक्षण घेत होते. २०१३ मध्ये व्हिसा घेऊन भारतात आले. अब्बास सांगतात की, माझे वडील वाट पाहत निघून गेले परंतु आईला तिच्या छोट्या मुलाला भेटता आले. मी ४२ वर्षानंतर पहिल्यांदा भावाला भेटलो. बशीरच्या स्वागतासाठी गाव सजलं होतं. आम्ही खूप आनंदात होतो. तो २ महिने थांबला आणि पुन्हा निघाला तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान