शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...जेव्हा महात्मा गांधींनी केरळमधील पूरग्रस्तांना केली होती 6 हजारांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 08:12 IST

महात्मा गांधींनी केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा केला होता

तिरुवनंतपुरम: देवभूमी अशा ओळख असणारं सध्या केरळ भीषण पूर परिस्थितीचा सामना करत आहे. राज्यातील सर्व नद्यांना पूर आल्यानं होत्याचं नव्हतं झालं आहे. संपूर्ण भारतातून केरळला मदत केली जात आहे. याआधी शतकभरापूर्वीही केरळमध्ये महापूर आला होता. तेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केरळसाठी मदतनिधी उभारला होता. त्यांनी पूरग्रस्तांसाठी 6 हजार रुपयांची मदत केली होती. केरळमधील पुरानं आतापर्यंत 290 लोकांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 10 लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला आहे. 1924 मध्ये आलेल्या पुरानं अशाच प्रकारे केरळमध्ये हाहाकार माजवला होता. त्यावेळीही हजारो लोक पुरामुळे बेघर झाले होते. तर अनेकांचा मृत्यू झाला होता. केरळमधील मलबार प्रांताला या पुराचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यावेळी महात्मा गांधींनी त्यांच्या 'यंग इंडिया' आणि 'नवजीवन' या प्रकाशनांमधून केरळमधील पूर परिस्थितीची माहिती देणारे लेख प्रसिद्ध केले होते. यामधून त्यांनी केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. महात्मा गांधी यांच्या आवाहनानंतर देशभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचे असंख्य हात पुढे आले. आबालवृद्धांनी पूरग्रस्तांना सढळ हस्ते मदत केली. विशेष म्हणजे अनेक महिलांनी त्यांचे दागिने विकून मदतनिधी गोळा केला. याशिवाय खाऊसाठी साठवलेले पैसे पूरग्रस्तांसाठी देणाऱ्या लहानग्यांची संख्यादेखील लक्षणीय होती. महात्मा गांधींनी त्यांच्या लेखांमध्ये याबद्दलचा उल्लेख केला आहे. केरळमधील पूरग्रस्तांना मदत करता यावी, यासाठी अनेकांनी एकवेळचं जेवण घेणं बंद केलं होतं. देशवासीयांनी केरळमधील पूरग्रस्तांना केलेली मदत अविश्वसनीय होती. देशातील नागरिकांनी आपल्या आवाहनाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला, असं महात्मा गांधी त्यांच्या लेखात म्हटलं होतं.  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीKerala Floodsकेरळ पूर