शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

...जेव्हा महात्मा गांधींनी केरळमधील पूरग्रस्तांना केली होती 6 हजारांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 08:12 IST

महात्मा गांधींनी केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा केला होता

तिरुवनंतपुरम: देवभूमी अशा ओळख असणारं सध्या केरळ भीषण पूर परिस्थितीचा सामना करत आहे. राज्यातील सर्व नद्यांना पूर आल्यानं होत्याचं नव्हतं झालं आहे. संपूर्ण भारतातून केरळला मदत केली जात आहे. याआधी शतकभरापूर्वीही केरळमध्ये महापूर आला होता. तेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केरळसाठी मदतनिधी उभारला होता. त्यांनी पूरग्रस्तांसाठी 6 हजार रुपयांची मदत केली होती. केरळमधील पुरानं आतापर्यंत 290 लोकांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 10 लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला आहे. 1924 मध्ये आलेल्या पुरानं अशाच प्रकारे केरळमध्ये हाहाकार माजवला होता. त्यावेळीही हजारो लोक पुरामुळे बेघर झाले होते. तर अनेकांचा मृत्यू झाला होता. केरळमधील मलबार प्रांताला या पुराचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यावेळी महात्मा गांधींनी त्यांच्या 'यंग इंडिया' आणि 'नवजीवन' या प्रकाशनांमधून केरळमधील पूर परिस्थितीची माहिती देणारे लेख प्रसिद्ध केले होते. यामधून त्यांनी केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. महात्मा गांधी यांच्या आवाहनानंतर देशभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचे असंख्य हात पुढे आले. आबालवृद्धांनी पूरग्रस्तांना सढळ हस्ते मदत केली. विशेष म्हणजे अनेक महिलांनी त्यांचे दागिने विकून मदतनिधी गोळा केला. याशिवाय खाऊसाठी साठवलेले पैसे पूरग्रस्तांसाठी देणाऱ्या लहानग्यांची संख्यादेखील लक्षणीय होती. महात्मा गांधींनी त्यांच्या लेखांमध्ये याबद्दलचा उल्लेख केला आहे. केरळमधील पूरग्रस्तांना मदत करता यावी, यासाठी अनेकांनी एकवेळचं जेवण घेणं बंद केलं होतं. देशवासीयांनी केरळमधील पूरग्रस्तांना केलेली मदत अविश्वसनीय होती. देशातील नागरिकांनी आपल्या आवाहनाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला, असं महात्मा गांधी त्यांच्या लेखात म्हटलं होतं.  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीKerala Floodsकेरळ पूर