शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

दुःखद... पुलवामा हल्ल्यानंतर 17 दिवसांत 19 जवानांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 17:58 IST

गेल्या 18 दिवसांमध्ये देशानं 59 जवान गमावले

नवी दिल्ली: पुलवामातील हल्ला, त्यानंतर भारत-पाकिस्तानचे ताणलेले संबंध, भारताचा एअर स्ट्राइक, विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका या घडामोडी सुरू असताना दहशतवाद्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. पुलवामा हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडींवर नजर टाकल्यास भारतीय हवाई दल, जम्मू  लष्कर पोलीस, सीआरपीएफला मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय सुरक्षा दलांची मोठी हानी झाली आहे. याशिवाय अनेक कुटुंबांनी त्यांच्या घराचा आधार गमावला आहे. 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामात दहशतवादी हल्ला झाले. जैश-ए-मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. यानंतर 12 दिवसांनी भारतीय हवाई दलानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मात्र या कारवाईच्या आधी आणि नंतरही देशासाठी प्राण अर्पण केलेल्या जवानांची संख्या चिंताजनक आहे. 1. एका मेजरसह पाच जवान शहीद (18 फेब्रुवारी)पुलवामातील हल्ल्यानंतर सारा देश शोकसागरात बुडाला असताना चारच दिवसांनंतर पुलवामात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चमकक झाली. यामध्ये लष्कराच्या पाच जवानांना वीरमरण आलं. त्यात एका मेजरचा समावेश होता. दहशतवाद्यांशी दोन हात करताना 55 राष्ट्रीय रायफल्सचे मेजर विभूती शंकर धोंडियाल यांना वीरमरण आलं. याच चकमकीत हरी सिंह, शेओ राम, अजय कुमार, अब्दुल रशीद शहीद झाले. 2. आयईडी नष्ट करताना मेजर शहीद17 फेब्रुवारीला मेजर चित्रेश सिंग बिश्त स्फोटकं नष्ट करताना शहीद झाले. जम्मू-काश्मीरच्या राजौरीत त्यांनी हौतात्म्य पत्करलं. 7 मार्चला त्यांचा विवाह होणार होता. 3. कुलगाममधील चकमकीत एक डीएसपी आणि एक लष्करी जवान शहीद25 फेब्रुवारीला कुलगाममधील तुरीगाममध्ये डीएसपी अमन कुमार ठाकूर यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. त्यांच्यासोबत हवालदार सोमबीर यांनीही हौतात्म्य पत्करलं. यावेळी स्थानिकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली होती. 4. हंडवाडात सीआरपीएफचे 5 जवान शहीदउत्तर काश्मीरच्या हंडवाडात 1 मार्चला दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. ही चकमक जवळपास 58 तास चालली. यामध्ये पाच जणांना वीरमरण आलं. सीआरपीएफच्या तीन आणि जम्मू काश्मीरच्या दोन पोलिसांनी देशासाठी प्राणांचं बलिदान दिलं. 5. बडगाममध्ये एमआय 17 हेलिकॉप्टरला अपघात; हवाई दलाच्या 6 अधिकाऱ्यांचा मृत्यू27 फेब्रुवारीला पाकिस्ताननं भारतीय हवाई हुद्दीत घुसखोरी केली. विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी हवाई दलाचं एफ-16 विमान जमीनदोस्त केलं. याच दिवशी बडगाममध्ये एमआय 17 हेलिकॉप्टर कोसळलं. यामध्ये हवाई दलाच्या 6 अधिकाऱ्यांना वीरमरण आलं.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानJammu Kashmirजम्मू-काश्मीरMartyrशहीद