शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

दुःखद... पुलवामा हल्ल्यानंतर 17 दिवसांत 19 जवानांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 17:58 IST

गेल्या 18 दिवसांमध्ये देशानं 59 जवान गमावले

नवी दिल्ली: पुलवामातील हल्ला, त्यानंतर भारत-पाकिस्तानचे ताणलेले संबंध, भारताचा एअर स्ट्राइक, विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका या घडामोडी सुरू असताना दहशतवाद्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. पुलवामा हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडींवर नजर टाकल्यास भारतीय हवाई दल, जम्मू  लष्कर पोलीस, सीआरपीएफला मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय सुरक्षा दलांची मोठी हानी झाली आहे. याशिवाय अनेक कुटुंबांनी त्यांच्या घराचा आधार गमावला आहे. 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामात दहशतवादी हल्ला झाले. जैश-ए-मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. यानंतर 12 दिवसांनी भारतीय हवाई दलानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मात्र या कारवाईच्या आधी आणि नंतरही देशासाठी प्राण अर्पण केलेल्या जवानांची संख्या चिंताजनक आहे. 1. एका मेजरसह पाच जवान शहीद (18 फेब्रुवारी)पुलवामातील हल्ल्यानंतर सारा देश शोकसागरात बुडाला असताना चारच दिवसांनंतर पुलवामात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चमकक झाली. यामध्ये लष्कराच्या पाच जवानांना वीरमरण आलं. त्यात एका मेजरचा समावेश होता. दहशतवाद्यांशी दोन हात करताना 55 राष्ट्रीय रायफल्सचे मेजर विभूती शंकर धोंडियाल यांना वीरमरण आलं. याच चकमकीत हरी सिंह, शेओ राम, अजय कुमार, अब्दुल रशीद शहीद झाले. 2. आयईडी नष्ट करताना मेजर शहीद17 फेब्रुवारीला मेजर चित्रेश सिंग बिश्त स्फोटकं नष्ट करताना शहीद झाले. जम्मू-काश्मीरच्या राजौरीत त्यांनी हौतात्म्य पत्करलं. 7 मार्चला त्यांचा विवाह होणार होता. 3. कुलगाममधील चकमकीत एक डीएसपी आणि एक लष्करी जवान शहीद25 फेब्रुवारीला कुलगाममधील तुरीगाममध्ये डीएसपी अमन कुमार ठाकूर यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. त्यांच्यासोबत हवालदार सोमबीर यांनीही हौतात्म्य पत्करलं. यावेळी स्थानिकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली होती. 4. हंडवाडात सीआरपीएफचे 5 जवान शहीदउत्तर काश्मीरच्या हंडवाडात 1 मार्चला दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. ही चकमक जवळपास 58 तास चालली. यामध्ये पाच जणांना वीरमरण आलं. सीआरपीएफच्या तीन आणि जम्मू काश्मीरच्या दोन पोलिसांनी देशासाठी प्राणांचं बलिदान दिलं. 5. बडगाममध्ये एमआय 17 हेलिकॉप्टरला अपघात; हवाई दलाच्या 6 अधिकाऱ्यांचा मृत्यू27 फेब्रुवारीला पाकिस्ताननं भारतीय हवाई हुद्दीत घुसखोरी केली. विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी हवाई दलाचं एफ-16 विमान जमीनदोस्त केलं. याच दिवशी बडगाममध्ये एमआय 17 हेलिकॉप्टर कोसळलं. यामध्ये हवाई दलाच्या 6 अधिकाऱ्यांना वीरमरण आलं.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानJammu Kashmirजम्मू-काश्मीरMartyrशहीद