शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

अण्णा द्रमुकचे १८ बंडखोर आमदार अपात्रच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 03:52 IST

तामिळनाडूतील अण्णा द्रमुकच्या १८ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा विधानसभाध्यक्षांचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने योग्य ठरविला आहे.

चेन्नई : तामिळनाडूतील अण्णा द्रमुकच्या १८ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा विधानसभाध्यक्षांचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने योग्य ठरविला आहे. त्यामुळे जयललिता यांच्या निधनानंतर टीटीव्ही दिनकरन यांच्या गटात गेलेल्या या बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. मात्र या निर्णयाला ते आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतील.या निर्णयामुळे अण्णा द्रमुकला मोठाच दिलासा मिळाला आहे. या १८ जणांचे सदस्यत्व न्यायालयाने कायम ठेवले असते तर अण्णा द्रमुकची विधानसभेतील ताकद कमी झाली असती आणि कदाचित बहुमतही संपुष्टात आले असते. दुसरीकडे हा निर्णय म्हणजे जयललिता यांचे भाचे टीटीव्ही दिनकरन व त्यांच्या गटाला हा मोठाच धक्का आहे.जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाली होती. त्यातील या १८ आमदारांनी मूळ पक्षाबरोबर राहण्याऐवजी दिनकरन यांच्या गटात जाण्याचा निर्णय गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घेतला होता. त्यामुळे हे पक्षांतर असल्याचे मान्य करून, विधानसभाध्यक्ष पी. धनपाल यांनी त्यांचे सदस्यत्वच रद्द केले होते. या निर्णयाला आमदारांनी मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी खंडपीठासमोर झाल्यानंतर दोन न्यायाधीशांमध्ये मतभेद झाले होते आणि त्या दोघांनी वेगवेगळे निकाल दिले होते. मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांनी आपल्या निकालपत्रात विधानसभाध्यक्षांचा निर्णय योग्य ठरवला होता, तर न्या. एम. सुंदर यांनी त्याविरुद्ध म्हणजे अध्यक्षांचा निर्णय कायद्याला अनुसरून नसल्याचे निकालपत्रात नमूद केले होते. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने न्या. सत्यनारायण यांची या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नियुक्ती केली. न्या. सत्यनारायण यांच्याकडे या प्रकरणांची १२ दिवस सुनावणी झाली आणि निकाल राखून ठेवला होता. त्यांनी सकाळी त्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय देणारे आपले निकालपत्र वाचून दाखवले. (वृत्तसंस्था)>आव्हान देणारया निर्णयानंतर टीटीव्ही दिनकरन म्हणाले की, हा निर्णय म्हणजे आमच्यासाठी धक्का नाही. आम्ही परिस्थितीला सामोर जाऊ . आपण लवकरच या आमदारांशी चर्चा करणार असून, त्यानंतर काय करायचे, हा निर्णय घेतला जाईल. मात्र मिळालेल्या माहितीनुसार हे आमदार आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत.अण्णाद्रमुकच्या १८ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय हायकोर्टाने कायम ठेवल्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या चेहºयावरील आनंद असा स्पष्ट दिसत होता.