शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

अण्णाद्रमुकतील टीटीव्ही दिनकरन गटाचे १८ आमदार अपात्र, मुख्यमंत्र्यांचे गणित सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:07 IST

मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांचा पाठिंबा काढून घेणा-या सत्ताधारी अण्णाद्रमुकतील टीटीव्ही दिनकरन गटाच्या १८ आमदारांना तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल यांनी अपात्र ठरविले. विधानसभा सचिवांनी हा निर्णय जाहीर करताना म्हटले की, या आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र ठरविण्यात आले आहे.

चेन्नई : मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांचा पाठिंबा काढून घेणा-या सत्ताधारी अण्णाद्रमुकतील टीटीव्ही दिनकरन गटाच्या १८ आमदारांना तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल यांनी अपात्र ठरविले. विधानसभा सचिवांनी हा निर्णय जाहीर करताना म्हटले की, या आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र ठरविण्यात आले आहे.या आमदारांनी पक्ष सोडलेला नाही, ते दुसºया पक्षात गेलेले नाहीत किंवा पक्षादेशाविरुद्ध मतदानही केलेले नाही. तरीही त्यांच्याविरुद्ध पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा उगारला गेल्याने वाद होण्याची शक्यता आहे. अद्रमुकच्या मुख्य प्रतोदांच्या फिर्यादीवर अध्यक्षांनी १९ आमदारांना अपात्रतेची नोटीस काढली. त्यापैकी एक आमदार मुख्यमंत्र्यांच्या गटात आल्याने, त्याच्याविरुद्धची फिर्याद मागे घेण्यात आली होती.या अपात्रतेमुळे अण्णाद्रमुकमधील यादवीला नवा रंग चढणार आहे. पलानीस्वामी व पनीरसेल्वम गटांनी एकत्र येऊन, तुरुंगात असलेल्या शशिकला व त्यांच्या कुटुंबीयांना पक्षातून हाकलून दिले, परंतु पक्षाचे २१ आमदार मात्र शशिकला यांचे भाचे टीटीव्ही दिनकरन यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने पलानीस्वामी सरकारकडे बहुमत नाही, अशी स्थिती निर्माण झाली.२३४ सदस्यांच्या विधानसभेत पलानीस्वामी यांना बहुमतासाठी ११७ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे, परंतु फक्त १०८ आमदार त्यांच्याकडे आहेत. मुख्यमंत्र्यांकडे बहुमत नाही. त्यामुळे त्यांना विधानसभेत लगेच बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी दिनकरन गट व विरोधी द्रमुकने राज्यपालांकडे अनेक वेळा केली, पण ती मान्य झालेली नाही.या १८ आमदारांना अपात्र न ठरविता, विधानसभेत शक्तिप्रदर्शन घेतले, तर पलानीस्वामी सरकारचा पराभव झाला असता. या आमदारांखेरीज द्रमुकचे ८९, काँग्रेसचे आठ व मुस्लीम लीगचा १असे मिळून ११६ आमदार त्यांच्या विरोधात होते. दिवंगत जे. जयललिता यांची जागा रिकामी आहे.त्यामुळे आता या १८ आमदारांचे सदस्यत्व रद्द झाल्याने, सभागृहाची सदस्यसंख्या २१५ वर येईल व१०८ आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत सिद्ध करणे पलानीस्वामी सरकारला सुकर होईल.>कोर्टकज्ज्याचे संकेतअध्यक्षांच्या या निर्णयास न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे दिनकरन गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मद्रास उच्च न्यायालयानेही ही संभाव्य अपात्रता लक्षात घेऊनच, विधानसभेत २० सप्टेंबरपर्यंत शक्तिप्रदर्शन घेण्यास बंदी केली आहे.ही तारीख उलटताच, लगेच शक्तिप्रदर्शनासाठी विधानसभेचे अधिवेशन घ्यायचे, असे मुख्यमंत्र्यांची खेळी आहे, परंतु त्या आधीच हे अपात्रतेचे प्रकरण न्यायालयात गेल्यास तिढा वाढू शकतो.