शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कांगोमध्ये १७० मुले बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 08:38 IST

ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर रवांडा आणि गोमा या शहरांच्या सीमेपर्यंत लाव्हा पसरला होता. सुमारे ५ हजार नागरिकांनी या शहरांमध्ये आसरा घेतला होता. तर सेक शहरातून सुमारे २५ हजार जणांवर विस्थापित होण्याची वेळ आली.

 गोमा : ज्वालामुखीच्या भयंकर उद्रेकामुळे कांगोमध्ये भीषण संकट आले आहे. ज्वालामुखीतून निघणारा तप्त लाव्हा ज्वालामुखीजवळच्या गावांमध्ये पसरला होता. परिणामी हजारो कुटुंबांवर विस्थापित होण्याची वेळ आली होती. याचा लहान मुलांना मोठा फटका बसला असून सुमारे १७० मुले बेपत्ता असल्याची मााहिती सूत्रांनी दिली आहे.ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर रवांडा आणि गोमा या शहरांच्या सीमेपर्यंत लाव्हा पसरला होता. सुमारे ५ हजार नागरिकांनी या शहरांमध्ये आसरा घेतला होता. तर सेक शहरातून सुमारे २५ हजार जणांवर विस्थापित होण्याची वेळ आली. लाव्हा बाहेर पडणे थांबल्यानंतर हळूहळू कुटुंबे परतत आहेत. मात्र, अनेक लहान मुलांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. गोमा शहरातील विमानतळाजवळ अनेक मुले बेघर झालेली आढळली आहेत. युनिसेफने दिलेल्या माहितीनुसार १७० मुले बेपत्ता झालेली आहेत, तर सुमारे १५० मुले कुटुंबांपासून दुरावली गेलेली आहेत. या मुलांसाठी दोन संक्रमण शिबिरांची उभारणी करण्यात आली आहे.नागरिक परतण्यास सुरुवात झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कॉलरासारख्या आजारांची साथ पसरू नये, यासाठी नागरिकांना शुद्ध पाणी पुरविण्यात येत आहे. लहान मुलांना मोठा फटका बसला असून सुमारे १७० मुले बेपत्ता असल्याची मााहिती सूत्रांनी दिली आहे.तसेच औषधे आणि इतर साहित्याचेही नागरिकांना वितरण करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Volcanoज्वालामुखीInternationalआंतरराष्ट्रीय