शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वादळाचे यूपीत १७ बळी; असंख्य घरे उद्ध्वस्त, झाडे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 01:24 IST

धुळीचे वादळ व जोरदार पावसाचा तडाखा याने उत्तर प्रदेशात शुक्रवारी संध्याकाळपासून आतापर्यंत १७ जणांचा बळी घेतला असून, ११ जण जखमी झाले.

लखनौ : धुळीचे वादळ व जोरदार पावसाचा तडाखा याने उत्तर प्रदेशात शुक्रवारी संध्याकाळपासून आतापर्यंत १७ जणांचा बळी घेतला असून, ११ जण जखमी झाले. या वादळामुळे अनेक झाडे कोलमडली, विजेचे खांब कोसळले आणि अनेक ठिकाणी विजाही कोसळल्या. काही ठिकाणी वाऱ्याने घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. उत्तराखंडातही पाऊ स कोसळत असून, येत्या ४८ तासांत ढगफुटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.घरे कोसळल्याने आणि झाडे अंगावर पडल्यानेच हे मृत्यू झाले असल्याचे राज्याच्या प्रशासनातर्फे सांगण्यात आले. यापैकी ९ मृत्यू मोरादाबाद जिल्ह्यातील आहेत. संभळ जिल्ह्यात तीन जण मृत्युमुखी पडले असून, मेरळ व मुझफ्फरनगरमध्ये प्रत्येकी दोन जण मरण पावले आणि अमरोहा जिल्ह्यात एक जण अंगावर झाड कोसळून मरण पावला. धुळीच्या वादळाचा त्रास होऊ नये, यासाठी अमरोहा जिल्ह्यातील तरुण झाडाखाली उभा होता. ते झाडच नेमके त्याच्या अंगावर कोसळले. जखमींवर मोफत उपचार करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना भरपाईही दिली जाणार आहे. ज्यांनी घरे उद्ध्वस्त झाली, त्याची पाहणी करून त्यांना मदत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. (वृत्तसंस्था)उत्तराखंडात ढगफुटीउत्तराखंडमधील टिहरी, उत्तरकाशी, पौडी व नैनिताल या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी संध्याकाळीही ढगफुटी झाली. त्यानंतर डेहराडूनमध्ये मुसळधार वृष्टी झाली. या चारही जिल्ह्यातील नद्या भरून वाहू लागल्या आहेत आणि कित्येक घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक रस्तेही पावसाने वाहून गेले असून, काही गावांचा त्यामुळे संपर्कच तुटला आहे. बद्रीनाथ हायवेही काल संध्याकाळपासून बंद करण्यात आला. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाºयांना सतर्कतेचे आदेश दिले असून, एसडीआरएफ व एनडीआरएफच्या तुकड्या या चार जिल्ह्यांत रवाना करण्यात आल्या आहेत. डेहरादून, उधमसिंहनगर, हरिद्वार व पौडी गढवालमध्ये ताशी ७0 ते ८0 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि डोगराळ भागात अतिवृष्टी होऊ शकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.दिल्लीलाही फटका : दिल्लीमध्येही कालपासून वेगाने वारे वाहत असून, तिथे आजही अनेक भागांत धुळीचे वादळ झाले. त्यामुळे काही भागांतील वीजच बेपत्ता झाली होती. दिल्लीत एक जण या वादळात मरण पावला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश