शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Coronavirus: पुण्याहून दानापूरला ट्रेन पोहचली, १७ जण पॉझिटिव्ह निघाले; अर्धा तास डब्ब्यातच प्रवासी अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 11:07 IST

१५ मेडिकल टीमच्या माध्यमातून प्रवाशांची तपासणी होणार होती. रेल्वे आधी पोहचल्याने प्रवाशांना ट्रेनमध्ये बसवण्यात आलं होतं

ठळक मुद्देमागील २४ तासांत ९५ हजार ११२ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्यात ३ हजार ४६९ कोरोना रुग्ण आढळले.मजूरांना त्यांच्या मूळगावी परतण्याशिवाय कोणता पर्याय शिल्लक नव्हता. म्हणून या प्रवाशांनी पुण्याहून दानापूर असा रेल्वे प्रवास केला.महाराष्ट्रात कधीही लॉकडाऊन लागू शकतो त्यामुळे कामधंदे ठप्प झाले. त्यामुळे हे प्रवाशी पुन्हा बिहारला परतले होते.

पटना – रात्री उशीरा पुण्याहून दानापूर येथे आलेल्या ट्रेनमध्ये १७ कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी आढळले. कोरोना काळात धावणारी ही विशेष ट्रेन रात्री ११ च्या सुमारास दानापूर रेल्वे स्टेशनला पोहचली. मात्र यावेळी प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड झाला. दानापूर जंक्शनवर पुण्याहून ही ट्रेन तिथे पोहचली होती. यात ८०० प्रवाशी प्रवास करत होते. निर्धारित वेळेपेक्षा ४८ मिनिटं लवकरच ही ट्रेन दानापूर स्टेशनवर पोहचली होती.

त्यामुळे अर्धा तास प्रवाशांना ट्रेनमध्येच बंद राहावं लागलं. अर्ध्या तासानंतर जेव्हा मेडिकल टीम तपासासाठी रेल्वे स्टेशनवर पोहचली. १५ मेडिकल टीमच्या माध्यमातून प्रवाशांची तपासणी होणार होती. रेल्वे आधी पोहचल्याने प्रवाशांना ट्रेनमध्ये बसवण्यात आलं होतं. त्यानंतर प्रवाशांना रांगेत उतरून कोविड १९ चाचणी करावी लागली. यात ५२४ प्रवाशांच्या तपासणीवेळी १७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात कधीही लॉकडाऊन लागू शकतो त्यामुळे कामधंदे ठप्प झाले. त्यामुळे हे प्रवाशी पुन्हा बिहारला परतले होते.

मजूरांना त्यांच्या मूळगावी परतण्याशिवाय कोणता पर्याय शिल्लक नव्हता. म्हणून या प्रवाशांनी पुण्याहून दानापूर असा रेल्वे प्रवास केला. बिहारमध्ये शनिवारी कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. गेल्या २४ तासांत ३ हजार ४६९ नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले. या वर्षी एकाच दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्या समोर आली. राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या ११ हजार ९९८ इतकी झाली आहे. पटना येथे सर्वाधित १ हजार ४३१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.

बिहारमध्ये गया ३१०, औरंगाबाद ९३, बेगुसराय ८०, भागलपूर ९७, भोजपूर ७४, जहानाबाद ७७, लखीसराय ७०, मुजफ्फरपूर १८३ तर पूर्णिया ८७ असे कोरोनाबाधित आढळले. मागील २४ तासांत ९५ हजार ११२ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्यात ३ हजार ४६९ कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढून ११ हजार ९९८ इतकी झाली आहे. राज्यात २ लाख ६५ हजार ८७० कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या