शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

राष्ट्रीय महामार्गासाठी १६ हजार ५८२ कोटी मंजूर रक्षा खडसे व ए.टी. पाटील यांची माहिती: २५ जानेवारी रोजी नितीन गडकरी करणार कामांचा शुभारंभ

By admin | Updated: January 11, 2016 00:23 IST

महामार्गाच्या कामासाठी केंद्र सरकारकडून १६ हजार ५८२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

जळगाव: जिल्‘ातून जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या कामासाठी केंद्र सरकारकडून १६ हजार ५८२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात काही राज्य मार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आले आहे. या कामांचा शुभारंभ २५ जानेवारी रोजी केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे व ए.टी.पाटील यांनी रविवारी दिली.सागर पार्कवर होणार सभाभाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ व सरचिटणीस दीपक फालक आदी उपस्थित होते. या कामांच्या शुभारंभांसाठी सागर पार्कवर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आल्याचे यावेळी खासदारांनी सांगितले. राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतरपहूर, बोदवड, मुक्ताईनगर, बर्‍हाणपूर, अंकलेश्वर, सिल्लोड, औरंगाबाद आदी राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले आहे.शहरात तीन ठिकाणी उड्डाणपूलया निधीतूनच जळगाव शहरातून जाणार्‍या रस्त्यावर बांभोरी ते नशिराबाद नाक्यापर्यंत १७ कि.मी.च्या अंतरात तीन उड्डाणपुल उभारण्यात येणारआहेत. कालिंका माता ते अजिंठा चौक, इच्छादेवी ते आकाशवाणी चौक व बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी हे उड्डाणपुल असतील. त्यासाठी ४१५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत,अशी माहिती खासदारांनी दिली. 

भुसावळला प्लॉस्टिक पार्कजिल्‘ातील प्लास्टीक उद्योगाला चालना देण्यासाठी भुसावळला एमआयडीसीत प्लॉस्टिक पार्कचाही प्रस्ताव आहे. हे काम अंतिम टप्यात आले आहे. केंद्र सरकारने देशात अहमदाबाद, वाराणसी व जळगाव अशी तीन जिल्‘ांची निवड केली आहे. टेक्सटाईल्स पार्क हा जामनेर तालुक्यातच होणार असल्याचा पुनरुच्चार खासदारांनी केला.असा आहे मार्ग व निधीपहूर, जामनेर,बोदवड, मुक्ताईनगर,बर्‍हाणपूर या ७५ कि.मी.रस्त्यासाठी ७५० कोटी रुपये, नांदुरा-बर्‍हाणपूर या महाराष्ट्र सिमेला जोडणार्‍या १४५ कि.मी.च्या रस्त्यासाठी १४५० कोटी, इंदूर, बर्‍हाणपूर, पिंप्री, मुक्ताईनगर या ४०१ कि.मी.साठी ३२६० कोटी, बोदवड, जामनेर, पहुर, अजिंठा, सिल्लोड, औरंगाबाद ४०१ कि.मी.च्या मार्गासाठी ३२६० कोटी, औरंगाबाद, फुलंब्री,जळगाव या १५५ कि.मी.साठी ४००० कोटी,बर्‍हाणपूर, रावेर,चोपडा, शिरपूर, सावदा, नंदुरबार, देडीपाडा, अंकलेश्वर या ५५५ कि.मी.साठी ४३५० यासह राष्ट्रीय महागार्ग २११ औरंगाबाद, चाळीसगाव ,धुळे या १५३ कि.मी.साठी २१७६ कोटी, चाळीसगाव घाटात १४ कि.मी. रस्ते व रेल्वेचा संयुक्त प्रकल्पासाठी १७५० कोटी रुपये मंजूर झाले असल्याचीमाहितीखासदारांनीदिली.