शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बालगृहात आणण्यापूर्वी १५७५ मुलांची लैंगिक छळवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 04:22 IST

देशभरातील बालगृहे तसेच आश्रयगृहांत वास्तव्याला असलेली १५७५ मुले मुक्तता करून या ठिकाणी आणण्यापूर्वी लैंगिक छळवणुकीला बळी पडली आहेत.

नवी दिल्ली - देशभरातील बालगृहे तसेच आश्रयगृहांत वास्तव्याला असलेली १५७५ मुले मुक्तता करून या ठिकाणी आणण्यापूर्वी लैंगिक छळवणुकीला बळी पडली आहेत. संपूर्ण देशातील ९,५९८ बाल संगोपन संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले असता हे धक्कादायक वास्तव समोर आले, अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.१५७५ मुले आणि मुली लैंगिक छळवणुकीचे शिकार होत असतील तर तुम्ही त्या बालकांसाठी काय केले, असा सवाल न्या. मदन बी. लोकूर यांनी केंद्राची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांना विचारला. चाईल्डलाईन इंडिया फाउंडेशनने त्या त्या राज्यांच्या सहभागातून केलेले सर्वेक्षण तुम्ही समोर आणले आहे, पण त्यानंतर काहीही घडलेले नाही, असे आनंद यांनी सांगितले. त्यावर न्या. लोकूर यांनी कोणत्याही राज्यांनी याबाबत कारवाई केलेली नाही. त्यामुळे या मुलांसाठी काहीही करण्यात आलेले नाही. त्यांचा लैंगिक छळ होतच राहणार का, असा प्रश्नही विचारला. एस. अब्दुल नाझीर आणि दीपक गुप्ता या अन्य न्यायाधीशांचा खंडपीठात समावेश आहे.आपल्या सभोवती काही घडत असेल आणि वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत असतील तर आपल्याला डोळे बंद ठेवता येणार नाहीत, असे न्या. गुप्ता यांनी म्हटले. डिसेंबर २०१५ ते मार्च २०१७ या दोन वर्षांच्या काळातील सर्वेक्षणाचा अहवाल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. बाल अधिकार संरक्षण राष्टÑीय आयोगाने बाल संगोपनाबाबत राष्टÑीय सामाजिक अंकेक्षण चालविले असून, आॅक्टोबर २०१८मध्ये हे काम पूर्ण होईल. (वृत्तसंस्था)नुसती आकडेवारी नको...मुलांबाबत अंकेक्षण हे केवळ आकडेवारी गोळा करण्यापुरते नसावे. बालगृहातील मुलांच्या स्थितीबाबत सक्रिय असे मूल्यांकन केले जावे. मुलांशी बोला, ते आनंदी आहेत की दु:खी ते समजून घ्या, असे न्या. गुप्ता यांनी बजावले.

टॅग्स :Rapeबलात्कारnewsबातम्या