शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वंदे मातरमची १५० वर्षे : उत्सव साजरा करण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 07:07 IST

राष्ट्रीय गीत भारताच्या चैतन्यशील, भव्य स्वरूपाचे प्रतिबिंब; ‘मन की बात’मध्ये केले संबोधित

नवी दिल्ली : ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत भारताच्या चैतन्यशील आणि भव्य स्वरूपाचे प्रतिबिंब आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. भावी पिढ्यांसाठी ही मूल्ये पुढे घेऊन जात या गीताचे १५० वे वर्ष संस्मरणीय बनविण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.  

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या रेडिओवरील भाषणात सांगितले की, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या आणि १८९६ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा गायलेल्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील. 

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ३० मिनिटांच्या भाषणात देशाच्या विविध भागात नागरिकांनी हाती घेतलेल्या अनेक अनोख्या उपक्रमांचा उल्लेख केला. छत्तीसगडमधील ‘गार्बेज कैफे’, बंगळुरूमधील तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न यांचा यात समावेश होता. 

ओडिशातील कोरापुट येथे कॉफी लागवडीच्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. यामुळे या प्रदेशातील लोकांना फायदा होत आहे, असे पंतप्रधान माेदी यांनी सांगितले. 

साेशल मीडियामुळे मिळाला नवीन प्राणवायू

पंतप्रधान म्हणाले, संस्कृती, सोशल मीडियाच्या जगाने संस्कृतला एक नवीन प्राणवायू दिला आहे. बरेच लोक त्यांच्या सोशल मीडिया चॅनेलद्वारे संस्कृत व अन्य विषय शिकवित असतात. 

नक्षलवादाच्या उच्चाटनामुळे सणांचा आनंद द्विगुणित 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी छठपूजेच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हटले की, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामुळे आणि नक्षलवादाच्या उच्चाटनामुळे या वर्षीचे सण पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने साजरे होत आहेत. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूरचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे. एकेकाळी नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागातही आज आनंदाचे दिवे उजळले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi calls to celebrate 150 years of Vande Mataram

Web Summary : Prime Minister Modi urged citizens to celebrate 150 years of Vande Mataram, a symbol of India's vibrant spirit. He highlighted unique initiatives like Chhattisgarh's 'Garbage Cafe' and Bengaluru's lake rejuvenation. Modi also praised Odisha's coffee cultivation and noted the positive impact of social media on Sanskrit promotion and reduced Naxalism.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी