शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

१५ अतिरेक्यांना घातले कंठस्नान

By admin | Updated: June 10, 2015 03:39 IST

मणिपूरमध्ये हल्ल्यात १८ जवानांचे प्राण हिरावणाऱ्या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराच्या विशेष दलाने मंगळवारी थेट म्यानमारमध्ये धडक देत १५ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे.

मणिपूर हल्ल्याला प्रत्युत्तर : भारतीय लष्कराची म्यानमार सीमेपार कारवाई नवी दिल्ली : मणिपूरमध्ये हल्ल्यात १८ जवानांचे प्राण हिरावणाऱ्या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराच्या विशेष दलाने मंगळवारी थेट म्यानमारमध्ये धडक देत १५ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. मणिपूरमधील हल्ल्यात सहभागी गट म्यानमारमध्ये दडून असल्याची गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारावर ही मोहीम पार पाडण्यात आली.म्यानमारमधील अधिकाऱ्यांनी गोपनीय माहिती पुरविण्यात सहकार्य केले. एनएससीएन (के) व केवायकेएल या २ दहशतवादी गटांचा हल्ल्यात सहभाग होता. भारतीय लष्कराने एकही जवान न गमावता या दोन्ही गटांच्या १५ अतिरेक्यांचा खात्मा करीत मोहीम फत्ते केली. मणिपूरमधील हल्ल्यानंतर लष्कराला अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आणखी हल्ले घडविले जाणारे असल्याची गुप्त माहिती मिळताच ही मोहीम हाती घेण्यात आली. भारत- म्यानमार सीमेवरील दोन स्थळांवर, नागालँड व मणिपूर सीमेवर तसेच म्यानमारमध्येही कारवाई करण्यात आली. त्यासाठी म्यानमारच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय राखण्यात आला, असे अतिरिक्त संचालक मेजर जनरल रणबीरसिंग यांनी सांगितले.प्रथमच भारतीय लष्कराने सीमापार धडक देत कमांडो मोहीम चोखपणे पार पाडली. दहशतवादाविरुद्ध ठोस कृतीचे ते निदर्शक ठरते. ईशान्येकडे दहशतवादी गटांनी हल्ल्यांची मालिकाच चालविल्याचे पाहता विशिष्ट अशा गोपनीय माहितीचा आधार घेण्यात आला. दहशतवाद्यांशी जोरदार धुमश्चक्री झाली. अतिरेक्यांनाच ठार मारण्याचे लक्ष्य ठरविण्यात आल्याने नागरिकांची प्राणहानी टाळता आली. ४ जून रोजी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. अतिरेकी सीमाभागात घुसखोरीनंतर हल्ले करून परतणार असल्याने त्यांना सीमेपलीकडे जाऊन मारणेच योग्य ठरले. म्यानमार आणि भारताच्या निकटस्थ सहकार्याचा एक इतिहास राहिला आहे. यापुढेही दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अशाच प्रकारे ठोस कृती केली जाईल, असेही जन. रणबीरसिंग म्हणाले. एनएससीएन(के) या अतिरेक्यांच्या गटाने मार्चमध्ये शस्त्रीसंधीतून माघार घेतल्यानंतर हल्ल्यांची मालिका घडवत धुमाकूळ चालविला होता. अन्य अतिरेकी गटांना ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट आॅफ साऊथ इस्ट इंडिया’ या छत्राखाली एकजूट करीत या संघटनेने कारवायांना वेग दिला होता.जशास तसे उत्तरलगेच हल्ल्यांचा धोका लक्षात घेता तातडीने कारवाई आवश्यक होती. नियोजित हल्ले परतवून लावण्यासाठी ही मोहीम पार पाडण्यात आली. आपली सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मतेवर हल्ले केले जात असतील तर असेच ठोस प्रत्युत्तर दिले जाईल. सीमा भाग आणि सीमेवरील राज्यांमध्ये शांतता आणि सलोखा राखण्याची हमी दिली जाईल.- मेजर जनरल रणबीरसिंग (लष्करी मोहिमांचे अतिरिक्त संचालक)