शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

रेल्वेने गमावले १५ कोटी प्रवासी

By admin | Updated: September 19, 2015 22:49 IST

कोणतीही भाडेवाढ केली नसताना चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत रेल्वे प्रवाशांची संख्या १५ कोटींनी घसरल्याने रेल्वे मंत्रालय बुचकळ्यात पडले आहे. प्रवाशांची घटती संख्या रेल्वेमंत्री

नवी दिल्ली : कोणतीही भाडेवाढ केली नसताना चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत रेल्वे प्रवाशांची संख्या १५ कोटींनी घसरल्याने रेल्वे मंत्रालय बुचकळ्यात पडले आहे. प्रवाशांची घटती संख्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची चिंता वाढवणारी ठरली आहे.रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी १५ सप्टेंबर रोजी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची बैठक बोलावत (जीएम) या मुद्द्यावर चर्चा केली असताना त्यांनाही आश्चर्य व्यक्त करण्यावाचून राहवले नाही. रेल्वेगाड्या नेहमीच हाऊसफुल्ल असतात. तुम्हाला आरक्षित तिकीट मिळत नाही. मग तुम्ही रेल्वेतील प्रवाशांची संख्या कमी झालीय, असे कसे म्हणता? संख्येबाबत काहीतरी घोटाळा आहे, असे ते या बैठकीत म्हणाल्याचे कळते.एप्रिल ते आॅगस्ट २०१५ या काळात रेल्वेतून ३५७.५ कोटी प्रवाशांनी प्रवास केला. चालू आर्थिक वर्षातील प्रवाशांची संख्या ३४२.५ कोटी आहे. प्रवाशांच्या संख्येत झालेली घट ४.२ टक्के आहे. हाच कल कायम राहिल्यास वर्षअखेर रेल्वे प्रवाशांची कपात ५ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. लागोपाठ दुसऱ्या वर्षी प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. २०१४-१५ या वर्षातही रेल्वेने १९.१ कोटी प्रवासी गमावले होते. दीर्घ पल्ल्याच्या एसी डब्यांमधील आरक्षित श्रेणीत ८० लाख प्रवाशांची संख्या वाढली, हीच काय ती जमेची बाजू म्हणता येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क) विभागीयमहाव्यवस्थापकांना पत्र रेल्वेप्रवाशांची संख्या घटल्याने चिंतेत पडलेले रेल्वे मंडळाचे अध्यक्ष (सीआरबी) ए.के. मित्तल यांनी सर्व विभागीय महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून त्या-त्या विभागातील प्रवाशांच्या कमी झालेल्या संख्येबाबत कारणे शोधण्यास सांगितले आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत कमी असलेले दर हे त्यामागचे कारण असल्याचे रेल्वे मंडळाचे सदस्य मानतात. हे शोधण्यासाठी फार मोठे शोधकार्य करण्याची गरज नाही, असे सांगत अनेक अधिकाऱ्यांनी हे पत्र अनावश्यक मानले आहे. ही आहेत संभाव्य कारणे!-रेल्वे प्रवासी नाराज होण्याची अनेक कारणे आहेत. तिकीट बुक करण्यापासून त्याची सुरुवात होते, तर प्रवास पार पडेपर्यंत त्रासात भरच पडत जाते.-लांबच लांब रांगांमुळे तिकीट खरेदी करणेही अनेकांसाठी त्रासदायक.-कमी पल्ल्याच्या अंतरासाठी किंवा उपनगरी प्रवासासाठी रस्ते वाहतुकीला अधिक पसंती. कमी दरात प्रवास करण्याऐवजी कमी वेळेत प्रवासाला प्राधान्य.-दिल्लीसारख्या ठिकाणी तिकीट वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या; मात्र त्या उपयोगात नाहीत. नेमके पैसे टाकावे लागतात. पैसे परत मिळत नाहीत, अशा तक्रारीही आहेत.-मोबाइल बुकिंग अ‍ॅप्सचा वापर किती जण करतात हा प्रश्नच आहे. अनेक प्रवाशांकडे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नसते.-रेल्वेमध्ये ५ हजार ‘टीटीर्इं’ची कमतरता आहे. त्यामुळे फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली असावी.