शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

केरळमध्ये १४.५० लाख लोक विस्थापित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:41 IST

केरळमध्ये प्रचंड पावसाच्या तडाख्याने १४.५० लाख लोक विस्थापित झाले असून ते सध्या ३,८७९ निवारा शिबिरांमध्ये राहात आहेत.

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये प्रचंड पावसाच्या तडाख्याने १४.५० लाख लोक विस्थापित झाले असून ते सध्या ३,८७९ निवारा शिबिरांमध्ये राहात आहेत. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्याचे मदतकार्य आता जवळजवळ आटोपते घेण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी तसेच घराघरांत जो प्रचंड कचरा वाहून आला आहे त्याची सफाई करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे आजवर २३१ जणांचे बळी गेले असून अद्याप ३१ जण बेपत्ता आहेत. राज्यात सर्वात जास्त विस्थापित एर्नाकुलम जिल्ह्यात असून तेथील ८९० निवारा शिबिरांमध्ये ५.३२ लाख लोक राहात आहेत.पुरामुळे प्रचंड कचरा, गाळ घराघरांत साचला आहे. तीन हजार पथकांच्या मदतीने त्यांची सफाई सुरु केली आहे. या घाणीमुळे रोगराई पसरण्याचा धोका टाळण्यासाठी १२ हजार घरांची सफाई केली आहे व तीन हजार गुराढोरांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे.विदेशी मदत स्वीकारणार नाहीनवी दिल्ली : केरळच्या पूरग्रस्तांसाठी संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) ७०० कोटी व मालदीवने ३५ लाखांंचे सहाय्य देण्याचे जाहीर केले असले तरी कोणतीही विदेशी मदत स्वीकारण्यास केंद्र सरकार राजी नाही. सुनामीच्या संकटानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपत्तीग्रस्तांसाठी विदेशी मदत न स्वीकारण्याचा निर्णय डिसेंबर २००४मध्ये घेतला होता. त्याच धोरणाची अंमलबजावणी केरळबाबत करण्यात येत आहे.केरळमधील जलप्रलयामागच्या कारणांचा ‘नासा’ने केला उलगडा; व्हिडिओ केला जारीवॉशिंग्टन : केरळमधील भयंकर जलप्रलयामागील कारणांचा उलगडा करणारा व्हिडिओ ‘नासा’ने जारी केला आहे. उपग्रहामार्फत प्राप्त माहितीचा वापर करून नासाने हा व्हिडिओ तयार केला आहे. यातून जोरदार पावसामुळे केरळ, कर्नाटकसह भारतातील अन्य भागांतील भयावह पूरस्थिती स्पष्ट होते. सर्वसामान्यपणे या काळात भारतात ग्रीष्मकालीन मॉन्सून होत असतो. तथापि, सामान्य मॉन्सूनदरम्यान वेळोवेळी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. परिणामी, जोरदार पाऊस होऊ शकतो. शतकातील सर्वांत विध्वंसकारी जलप्रलयाशी केरळ झुंजत आहे. जोरदार पाऊस आणि पुराच्या तडाख्याने केरळमध्ये २३१ लोकांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळ