शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये १४.५० लाख लोक विस्थापित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:41 IST

केरळमध्ये प्रचंड पावसाच्या तडाख्याने १४.५० लाख लोक विस्थापित झाले असून ते सध्या ३,८७९ निवारा शिबिरांमध्ये राहात आहेत.

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये प्रचंड पावसाच्या तडाख्याने १४.५० लाख लोक विस्थापित झाले असून ते सध्या ३,८७९ निवारा शिबिरांमध्ये राहात आहेत. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्याचे मदतकार्य आता जवळजवळ आटोपते घेण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी तसेच घराघरांत जो प्रचंड कचरा वाहून आला आहे त्याची सफाई करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे आजवर २३१ जणांचे बळी गेले असून अद्याप ३१ जण बेपत्ता आहेत. राज्यात सर्वात जास्त विस्थापित एर्नाकुलम जिल्ह्यात असून तेथील ८९० निवारा शिबिरांमध्ये ५.३२ लाख लोक राहात आहेत.पुरामुळे प्रचंड कचरा, गाळ घराघरांत साचला आहे. तीन हजार पथकांच्या मदतीने त्यांची सफाई सुरु केली आहे. या घाणीमुळे रोगराई पसरण्याचा धोका टाळण्यासाठी १२ हजार घरांची सफाई केली आहे व तीन हजार गुराढोरांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे.विदेशी मदत स्वीकारणार नाहीनवी दिल्ली : केरळच्या पूरग्रस्तांसाठी संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) ७०० कोटी व मालदीवने ३५ लाखांंचे सहाय्य देण्याचे जाहीर केले असले तरी कोणतीही विदेशी मदत स्वीकारण्यास केंद्र सरकार राजी नाही. सुनामीच्या संकटानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपत्तीग्रस्तांसाठी विदेशी मदत न स्वीकारण्याचा निर्णय डिसेंबर २००४मध्ये घेतला होता. त्याच धोरणाची अंमलबजावणी केरळबाबत करण्यात येत आहे.केरळमधील जलप्रलयामागच्या कारणांचा ‘नासा’ने केला उलगडा; व्हिडिओ केला जारीवॉशिंग्टन : केरळमधील भयंकर जलप्रलयामागील कारणांचा उलगडा करणारा व्हिडिओ ‘नासा’ने जारी केला आहे. उपग्रहामार्फत प्राप्त माहितीचा वापर करून नासाने हा व्हिडिओ तयार केला आहे. यातून जोरदार पावसामुळे केरळ, कर्नाटकसह भारतातील अन्य भागांतील भयावह पूरस्थिती स्पष्ट होते. सर्वसामान्यपणे या काळात भारतात ग्रीष्मकालीन मॉन्सून होत असतो. तथापि, सामान्य मॉन्सूनदरम्यान वेळोवेळी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. परिणामी, जोरदार पाऊस होऊ शकतो. शतकातील सर्वांत विध्वंसकारी जलप्रलयाशी केरळ झुंजत आहे. जोरदार पाऊस आणि पुराच्या तडाख्याने केरळमध्ये २३१ लोकांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळ