शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

केरळमध्ये १४.५० लाख लोक विस्थापित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:41 IST

केरळमध्ये प्रचंड पावसाच्या तडाख्याने १४.५० लाख लोक विस्थापित झाले असून ते सध्या ३,८७९ निवारा शिबिरांमध्ये राहात आहेत.

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये प्रचंड पावसाच्या तडाख्याने १४.५० लाख लोक विस्थापित झाले असून ते सध्या ३,८७९ निवारा शिबिरांमध्ये राहात आहेत. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्याचे मदतकार्य आता जवळजवळ आटोपते घेण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी तसेच घराघरांत जो प्रचंड कचरा वाहून आला आहे त्याची सफाई करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे आजवर २३१ जणांचे बळी गेले असून अद्याप ३१ जण बेपत्ता आहेत. राज्यात सर्वात जास्त विस्थापित एर्नाकुलम जिल्ह्यात असून तेथील ८९० निवारा शिबिरांमध्ये ५.३२ लाख लोक राहात आहेत.पुरामुळे प्रचंड कचरा, गाळ घराघरांत साचला आहे. तीन हजार पथकांच्या मदतीने त्यांची सफाई सुरु केली आहे. या घाणीमुळे रोगराई पसरण्याचा धोका टाळण्यासाठी १२ हजार घरांची सफाई केली आहे व तीन हजार गुराढोरांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे.विदेशी मदत स्वीकारणार नाहीनवी दिल्ली : केरळच्या पूरग्रस्तांसाठी संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) ७०० कोटी व मालदीवने ३५ लाखांंचे सहाय्य देण्याचे जाहीर केले असले तरी कोणतीही विदेशी मदत स्वीकारण्यास केंद्र सरकार राजी नाही. सुनामीच्या संकटानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपत्तीग्रस्तांसाठी विदेशी मदत न स्वीकारण्याचा निर्णय डिसेंबर २००४मध्ये घेतला होता. त्याच धोरणाची अंमलबजावणी केरळबाबत करण्यात येत आहे.केरळमधील जलप्रलयामागच्या कारणांचा ‘नासा’ने केला उलगडा; व्हिडिओ केला जारीवॉशिंग्टन : केरळमधील भयंकर जलप्रलयामागील कारणांचा उलगडा करणारा व्हिडिओ ‘नासा’ने जारी केला आहे. उपग्रहामार्फत प्राप्त माहितीचा वापर करून नासाने हा व्हिडिओ तयार केला आहे. यातून जोरदार पावसामुळे केरळ, कर्नाटकसह भारतातील अन्य भागांतील भयावह पूरस्थिती स्पष्ट होते. सर्वसामान्यपणे या काळात भारतात ग्रीष्मकालीन मॉन्सून होत असतो. तथापि, सामान्य मॉन्सूनदरम्यान वेळोवेळी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. परिणामी, जोरदार पाऊस होऊ शकतो. शतकातील सर्वांत विध्वंसकारी जलप्रलयाशी केरळ झुंजत आहे. जोरदार पाऊस आणि पुराच्या तडाख्याने केरळमध्ये २३१ लोकांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळ