शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतून १४५ भारतीयांची मायदेशी रवानगी, हात-पाय बांधलेल्या अवस्थेत केली पाठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 12:59 IST

अमेरिकेतील उच्च राहणीमानाचे आणि मोठ्या पगाराच्या नोकरीचे आकर्षण १४५ भारतीयांसाठी दु:स्वप्न ठरले.

नवी दिल्ली - अमेरिकेसारख्या अतिश्रीमंत देशातील उच्च राहणीमानाचे अनेकांना आकर्षण आहे. त्यासाठी अमेरिकेत जाऊन मोठ्या पगाराची नोकरी मिळवावी, तिकडेच स्थायिक व्हावे, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात. मात्र अमेरिकेचे हे आकर्षण आणि तेथील नोकरीचे स्वप्न १४५ भारतीयांसाठी दु:स्वप्न ठरले आहे. अमेरिकेत अवैधरीत्या घुसल्याच्या आरोपाखाली या भारतीय नागरिकांना अमेरिकेतील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्यांची भारतात परत पाठवणी केली आहेत . अनेक दिवसांची उपासमार्, फाटलेले कपडे आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत हे भारतीय नागरिक बुधवारी सकाळी विमानातून  दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

या तरुणांपैकी बहुतांश तरुण हे उच्चशिक्षित आहेत. अमेरिकेत जाऊन काम करणे हे त्यांचे स्वप्न होते. अमेरिकेत जाण्यासाठी त्यांनी एजंटांना सुमारे २५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम एजंटांना दिली होती. एजंटांमार्फत अमेरिकेत पोहोचलेल्या या तरुणांपैकी काही जणांना तर काम करण्यासही सुरुवात केली होती. मात्र अमेरिकेत सुखी जीवनाचे स्वप्न रंगवत असतानाचा तेथील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अवैधरीत्या अमेरिकेत घुसल्याचा आरोप ठेवत या तरुणांना पकडले. त्यानंतर अवैधरीत्या देशात घुसणाऱ्या व्यक्तींना ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या डिटेन्शन सेंटरमध्ये या तरुणांची रवानगी करण्यात आली. अखेरीस सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या तरुणांना मायदेशी पाठवण्यात आले.

भारतात परतले तेव्हा या तरुणांची स्थिती फारशी चांगली नव्हती. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळार फाटलेले कपडे आणि उदास चेहऱ्याने ते बाहेर येत होते. अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या १४५ जणांमध्ये तीन भारतीयांचाही समावेश होता. या सर्वांना अमेरिकेतील अॅरिझोना येथून माघारी धाडण्यात आले होते.  १४५ भारतीयांबरोबरच २५ बांगलादेशी नागरिकांनाही परत पाठवण्यात आले होते.

दरम्यान, अमेरिकेतील डिटेन्शन कॅम्पमध्ये या भारतीयांवर विविध प्रकारचे निर्बंध लादले गेले होते. तिथे खाण्यापिण्याची अबाळ होती. त्यामुळे हे भारतीय नागरिक मानसिकदृष्ट्या खचले होते. दरम्यान, डिटेंशन सेंटरमध्ये आपल्याला नावाने नाहीतर नंबरवरून हाक मारली जात असे. आमच्यासोबत गुन्हेगारांसारखे वर्तन केले जाई. कधी कधी उपाशी राहावे लागे, कारण जेवणात बीफ दिले जायचे, अशी माहिती अमेरिकेतून परत पाठवलेल्यांपैकी काही जणांनी दिली.

इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला का ताब्यात घेतले आहे हे काही आठवड्यांपर्यंत सांगण्यात आले नव्हते. अखेर अमेरिकेत येण्यासाठी आणि येथे राहण्यासाठी योग्य ती कागदपत्रे आमच्याकडे नाहीत, अशी माहिती आम्हाला अनेक दिवसांनंतर देण्यात आली, असे या तरुणांपैकी एकाने सांगितले.

टॅग्स :IndiaभारतUnited Statesअमेरिका