शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

अमेरिकेतून १४५ भारतीयांची मायदेशी रवानगी, हात-पाय बांधलेल्या अवस्थेत केली पाठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 12:59 IST

अमेरिकेतील उच्च राहणीमानाचे आणि मोठ्या पगाराच्या नोकरीचे आकर्षण १४५ भारतीयांसाठी दु:स्वप्न ठरले.

नवी दिल्ली - अमेरिकेसारख्या अतिश्रीमंत देशातील उच्च राहणीमानाचे अनेकांना आकर्षण आहे. त्यासाठी अमेरिकेत जाऊन मोठ्या पगाराची नोकरी मिळवावी, तिकडेच स्थायिक व्हावे, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात. मात्र अमेरिकेचे हे आकर्षण आणि तेथील नोकरीचे स्वप्न १४५ भारतीयांसाठी दु:स्वप्न ठरले आहे. अमेरिकेत अवैधरीत्या घुसल्याच्या आरोपाखाली या भारतीय नागरिकांना अमेरिकेतील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्यांची भारतात परत पाठवणी केली आहेत . अनेक दिवसांची उपासमार्, फाटलेले कपडे आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत हे भारतीय नागरिक बुधवारी सकाळी विमानातून  दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

या तरुणांपैकी बहुतांश तरुण हे उच्चशिक्षित आहेत. अमेरिकेत जाऊन काम करणे हे त्यांचे स्वप्न होते. अमेरिकेत जाण्यासाठी त्यांनी एजंटांना सुमारे २५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम एजंटांना दिली होती. एजंटांमार्फत अमेरिकेत पोहोचलेल्या या तरुणांपैकी काही जणांना तर काम करण्यासही सुरुवात केली होती. मात्र अमेरिकेत सुखी जीवनाचे स्वप्न रंगवत असतानाचा तेथील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अवैधरीत्या अमेरिकेत घुसल्याचा आरोप ठेवत या तरुणांना पकडले. त्यानंतर अवैधरीत्या देशात घुसणाऱ्या व्यक्तींना ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या डिटेन्शन सेंटरमध्ये या तरुणांची रवानगी करण्यात आली. अखेरीस सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या तरुणांना मायदेशी पाठवण्यात आले.

भारतात परतले तेव्हा या तरुणांची स्थिती फारशी चांगली नव्हती. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळार फाटलेले कपडे आणि उदास चेहऱ्याने ते बाहेर येत होते. अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या १४५ जणांमध्ये तीन भारतीयांचाही समावेश होता. या सर्वांना अमेरिकेतील अॅरिझोना येथून माघारी धाडण्यात आले होते.  १४५ भारतीयांबरोबरच २५ बांगलादेशी नागरिकांनाही परत पाठवण्यात आले होते.

दरम्यान, अमेरिकेतील डिटेन्शन कॅम्पमध्ये या भारतीयांवर विविध प्रकारचे निर्बंध लादले गेले होते. तिथे खाण्यापिण्याची अबाळ होती. त्यामुळे हे भारतीय नागरिक मानसिकदृष्ट्या खचले होते. दरम्यान, डिटेंशन सेंटरमध्ये आपल्याला नावाने नाहीतर नंबरवरून हाक मारली जात असे. आमच्यासोबत गुन्हेगारांसारखे वर्तन केले जाई. कधी कधी उपाशी राहावे लागे, कारण जेवणात बीफ दिले जायचे, अशी माहिती अमेरिकेतून परत पाठवलेल्यांपैकी काही जणांनी दिली.

इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला का ताब्यात घेतले आहे हे काही आठवड्यांपर्यंत सांगण्यात आले नव्हते. अखेर अमेरिकेत येण्यासाठी आणि येथे राहण्यासाठी योग्य ती कागदपत्रे आमच्याकडे नाहीत, अशी माहिती आम्हाला अनेक दिवसांनंतर देण्यात आली, असे या तरुणांपैकी एकाने सांगितले.

टॅग्स :IndiaभारतUnited Statesअमेरिका