शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

अमेरिकेतून १४५ भारतीयांची मायदेशी रवानगी, हात-पाय बांधलेल्या अवस्थेत केली पाठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 12:59 IST

अमेरिकेतील उच्च राहणीमानाचे आणि मोठ्या पगाराच्या नोकरीचे आकर्षण १४५ भारतीयांसाठी दु:स्वप्न ठरले.

नवी दिल्ली - अमेरिकेसारख्या अतिश्रीमंत देशातील उच्च राहणीमानाचे अनेकांना आकर्षण आहे. त्यासाठी अमेरिकेत जाऊन मोठ्या पगाराची नोकरी मिळवावी, तिकडेच स्थायिक व्हावे, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात. मात्र अमेरिकेचे हे आकर्षण आणि तेथील नोकरीचे स्वप्न १४५ भारतीयांसाठी दु:स्वप्न ठरले आहे. अमेरिकेत अवैधरीत्या घुसल्याच्या आरोपाखाली या भारतीय नागरिकांना अमेरिकेतील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्यांची भारतात परत पाठवणी केली आहेत . अनेक दिवसांची उपासमार्, फाटलेले कपडे आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत हे भारतीय नागरिक बुधवारी सकाळी विमानातून  दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

या तरुणांपैकी बहुतांश तरुण हे उच्चशिक्षित आहेत. अमेरिकेत जाऊन काम करणे हे त्यांचे स्वप्न होते. अमेरिकेत जाण्यासाठी त्यांनी एजंटांना सुमारे २५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम एजंटांना दिली होती. एजंटांमार्फत अमेरिकेत पोहोचलेल्या या तरुणांपैकी काही जणांना तर काम करण्यासही सुरुवात केली होती. मात्र अमेरिकेत सुखी जीवनाचे स्वप्न रंगवत असतानाचा तेथील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अवैधरीत्या अमेरिकेत घुसल्याचा आरोप ठेवत या तरुणांना पकडले. त्यानंतर अवैधरीत्या देशात घुसणाऱ्या व्यक्तींना ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या डिटेन्शन सेंटरमध्ये या तरुणांची रवानगी करण्यात आली. अखेरीस सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या तरुणांना मायदेशी पाठवण्यात आले.

भारतात परतले तेव्हा या तरुणांची स्थिती फारशी चांगली नव्हती. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळार फाटलेले कपडे आणि उदास चेहऱ्याने ते बाहेर येत होते. अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या १४५ जणांमध्ये तीन भारतीयांचाही समावेश होता. या सर्वांना अमेरिकेतील अॅरिझोना येथून माघारी धाडण्यात आले होते.  १४५ भारतीयांबरोबरच २५ बांगलादेशी नागरिकांनाही परत पाठवण्यात आले होते.

दरम्यान, अमेरिकेतील डिटेन्शन कॅम्पमध्ये या भारतीयांवर विविध प्रकारचे निर्बंध लादले गेले होते. तिथे खाण्यापिण्याची अबाळ होती. त्यामुळे हे भारतीय नागरिक मानसिकदृष्ट्या खचले होते. दरम्यान, डिटेंशन सेंटरमध्ये आपल्याला नावाने नाहीतर नंबरवरून हाक मारली जात असे. आमच्यासोबत गुन्हेगारांसारखे वर्तन केले जाई. कधी कधी उपाशी राहावे लागे, कारण जेवणात बीफ दिले जायचे, अशी माहिती अमेरिकेतून परत पाठवलेल्यांपैकी काही जणांनी दिली.

इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला का ताब्यात घेतले आहे हे काही आठवड्यांपर्यंत सांगण्यात आले नव्हते. अखेर अमेरिकेत येण्यासाठी आणि येथे राहण्यासाठी योग्य ती कागदपत्रे आमच्याकडे नाहीत, अशी माहिती आम्हाला अनेक दिवसांनंतर देण्यात आली, असे या तरुणांपैकी एकाने सांगितले.

टॅग्स :IndiaभारतUnited Statesअमेरिका