शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

जगातील सर्वात प्रदूषित 15 शहरांमध्ये भारताच्या 14 शहरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 09:34 IST

लिस्टमध्ये सगळ्यात टॉपवर कानपूर शहर आहे.

नवी दिल्ली- जिनीवामध्ये ग्लोबल एअर पॉल्यूशनकडून (डब्ल्यूएचओ)  2016साठी जगातील सगळ्यात 15 प्रदूषित शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील 14 शहरांचा समावेश आहे. या लिस्टमध्ये सगळ्यात टॉपवर कानपूर शहर आहे. तर दिल्ली सहाव्या स्थानी आहे. डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, 2010 ते 2014 मध्ये दिल्लीमध्ये प्रदूषण पातळीत सुधारणा झाली होती पण त्यामध्ये 2015मध्ये परिस्थिती पुन्हा बिघडली. कानपूर, फरिदाबाद, गया, पाटणा, आग्रा, मुझ्झफरपूर, श्रीनगर, जयपुर, जोधपुर यासारख्या शहरात प्रदूषणाची पातळी सर्वाधिक आहेत. भारताबरोबरच कुवेत, चीन, मंगोलिया या देशातील शहरांचाही समावेश आहे.

2016च्या तुलनेत 2017 मध्ये वायू प्रदूषणमध्ये सुधारणा झाली, असा दावा सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्डाने केला आहे. पण अजूनही बोर्डाने 2017 च्या हवेत असलेल्या पीएम 2.5 चा डेटा जारी केला आहे. 2016च्या शेवटी वायू प्रदूषणची समस्या सोडविण्यासाठी अनेक पावलं उचलली गेली. ऑक्टोबरमध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन, डिसेंबर 2015मध्ये इन्वारमेंटल कंपनसेशन चार्ज आणि प्रदूषण नियंत्रणासाठी एनसीआर शहरांमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे उपाय अशा विविध गोष्टी सहभागी आहेत. डब्ल्यूएचओचा रिपोर्ट 2016 पर्यंतचा असल्याने प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपायांच्या परिणामाची नेमकी माहिती समोर आली नाही.  2010च्या रिपोर्टनुसार दिल्ली दुनियेतील सर्वात प्रदूषित शहर होतं. त्यानंतर पेशावर आणि रावलपिंडीचा नंबर होता. त्यावेळी दुनियेतील 10 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या इतर शहरांमध्ये फक्त आगराचा समावेश होता. 2011 च्या रिपोर्टमध्येही दिल्ली व आगरा प्रदूषित शहरांच्या यादीत होतं व उलानबाटर दुनियेतील सर्वात प्रदूषित शहर होतं. 2012मध्ये परिस्थिती बदलायला सुरूवात झाली. दुनियेतील 20 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये एकट्या भारताच्या 15 शहरांचा सहभाग आहे. 2013, 2014 आणि 2015मध्ये दुनियेतील 20 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या चार ते सात शहरांचा समावेश होता.