शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

जगातील सर्वात प्रदूषित 15 शहरांमध्ये भारताच्या 14 शहरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 09:34 IST

लिस्टमध्ये सगळ्यात टॉपवर कानपूर शहर आहे.

नवी दिल्ली- जिनीवामध्ये ग्लोबल एअर पॉल्यूशनकडून (डब्ल्यूएचओ)  2016साठी जगातील सगळ्यात 15 प्रदूषित शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील 14 शहरांचा समावेश आहे. या लिस्टमध्ये सगळ्यात टॉपवर कानपूर शहर आहे. तर दिल्ली सहाव्या स्थानी आहे. डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, 2010 ते 2014 मध्ये दिल्लीमध्ये प्रदूषण पातळीत सुधारणा झाली होती पण त्यामध्ये 2015मध्ये परिस्थिती पुन्हा बिघडली. कानपूर, फरिदाबाद, गया, पाटणा, आग्रा, मुझ्झफरपूर, श्रीनगर, जयपुर, जोधपुर यासारख्या शहरात प्रदूषणाची पातळी सर्वाधिक आहेत. भारताबरोबरच कुवेत, चीन, मंगोलिया या देशातील शहरांचाही समावेश आहे.

2016च्या तुलनेत 2017 मध्ये वायू प्रदूषणमध्ये सुधारणा झाली, असा दावा सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्डाने केला आहे. पण अजूनही बोर्डाने 2017 च्या हवेत असलेल्या पीएम 2.5 चा डेटा जारी केला आहे. 2016च्या शेवटी वायू प्रदूषणची समस्या सोडविण्यासाठी अनेक पावलं उचलली गेली. ऑक्टोबरमध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन, डिसेंबर 2015मध्ये इन्वारमेंटल कंपनसेशन चार्ज आणि प्रदूषण नियंत्रणासाठी एनसीआर शहरांमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे उपाय अशा विविध गोष्टी सहभागी आहेत. डब्ल्यूएचओचा रिपोर्ट 2016 पर्यंतचा असल्याने प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपायांच्या परिणामाची नेमकी माहिती समोर आली नाही.  2010च्या रिपोर्टनुसार दिल्ली दुनियेतील सर्वात प्रदूषित शहर होतं. त्यानंतर पेशावर आणि रावलपिंडीचा नंबर होता. त्यावेळी दुनियेतील 10 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या इतर शहरांमध्ये फक्त आगराचा समावेश होता. 2011 च्या रिपोर्टमध्येही दिल्ली व आगरा प्रदूषित शहरांच्या यादीत होतं व उलानबाटर दुनियेतील सर्वात प्रदूषित शहर होतं. 2012मध्ये परिस्थिती बदलायला सुरूवात झाली. दुनियेतील 20 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये एकट्या भारताच्या 15 शहरांचा सहभाग आहे. 2013, 2014 आणि 2015मध्ये दुनियेतील 20 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या चार ते सात शहरांचा समावेश होता.