शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 09:47 IST

तक्रारदाराने फुटिरतावादी गुरपतवंत सिंगच्या एका व्हिडिओचा संदर्भ देत केजरीवालांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला २०१४ ते २०२२ या काळात विविध समुहांकडून १६ मिलियन अमेरिकन डॉलर मिळाल्याचा दावा केला

नवी दिल्ली - दिल्लीचे उपराज्यपाल वी.के सक्सेना यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात एनआयए तपास करण्याची शिफारस केली आहे. उपराज्यपालांना मिळालेल्या तक्रारीनुसार, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी पक्षासाठी निर्बंध लावलेल्या दहशतवादी संघटना सिख फॉर जस्टिसकडून फंडिंग घेतले. १ एप्रिल २०२४ रोजी याबाबत वर्ल्ड हिंदू फेडरेशन ऑफ इंडिया नावाच्या संस्थेने उपराज्यपालांना तक्रार दिली होती. त्यात आम आदमी पार्टीला मिळणाऱ्या फंडची आणि आयकर स्त्रोताची चौकशी करण्याची मागणी केली होती. 

या तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन उपराज्यपालांनी ३ मे रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहिलं. त्यात प्राप्त तक्रारीनुसार संबंधित प्रकरणाची NIA चौकशी करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीला अतिरेकी फुटीरतावादी गटांकडून १६ मिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे १३० कोटी रुपये) इतकी मोठी रक्कम मिळाली होती. ही तक्रार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात करण्यात आली आहे आणि ती प्रतिबंधित दहशतवादी संघटनेकडून मिळालेल्या राजकीय निधीशी संबंधित आहे. अशा स्थितीत तक्रारदाराने दिलेल्या इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या फॉरेन्सिक तपासणीसह अन्य पातळ्यांवर सखोल तपास करण्याची गरज आहे असं उपराज्यपालांनी म्हटलं.

उपराज्यपालांनी शिफारस पत्रात केजरीवालांकडून २०१४ मध्ये इकबाल सिंह यांना लिहिलेल्या पत्राचा हवाला देण्यात आला. केजरीवाल यांनी या पत्रातून सिखांबद्दल अनेक मुद्द्यांवर सहानुभूती व्यक्त केली होती. इतके नाही तर त्यांच्या सरकारने भुल्लर यांच्या सुटकेसाठी राष्ट्रपतींना शिफारस केली आहे. भुल्लर यांच्या सुटकेसाठी इकबाल सिंह जंतर मंतरवर उपोषणाला बसले होते. अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. तक्रारदाराने फुटिरतावादी गुरपतवंत सिंगच्या एका व्हिडिओचा संदर्भ देत केजरीवालांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला २०१४ ते २०२२ या काळात विविध समुहांकडून १६ मिलियन अमेरिकन डॉलर मिळाल्याचा दावा केला. त्यात आपचे माजी नेते डॉ. मुनीश रायजादा यांच्या सोशल मीडियातील पोस्टचाही हवाला दिला.

'आप'ने फेटाळले आरोप, भाजपा टार्गेट

आम आदमी पक्षाकडून फंडिंगबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील आरोप हे भाजपाचे षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. आपचे नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं की, प्रत्येक निवडणुकीवेळी अशाप्रकारचे बिनबुडाचे आरोप लावणे हे भाजपाचे राजकीय षडयंत्र आहे. भाजपाने २०२२ मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीवेळीही हेच आरोप केले होते. त्यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी तपासही केला. परंतु त्यात काही हाती आलं नाही. आता पुन्हा एकदा तेच आरोप केले जात आहेत असं सांगत आम आदमी पार्टीने आरोप फेटाळले.

दरम्यान, भाजपाच्या इशाऱ्यावर उपराज्यपालांनी केजरीवालांविरोधात NIA तपासाची शिफारस केली आहे कारण लोकसभा निवडणुकीत भाजपाला त्यांचा पराभव स्पष्ट दिसत आहे. उपराज्यपाल हे भाजपाच्या हातातील बाहुलं आहे. जेव्हा निवडणुकीत पराभव दिसतो तेव्हा भाजपा आरोप करते जेणेकरून जनतेची दिशाभूल होईल. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील चौकशीत याआधीही काही निघाले नाही आणि आताही काही निघणार नाही असंही सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं. 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालHome Ministryगृह मंत्रालयBJPभाजपा