शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मुर्शिदाबात हिंसाचारात हल्ला झालेले १३ जण झारखंडला पळून गेले; मारहाणीची दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:23 IST

मुर्शिदाबाद हिंसाचारानंतर, गोविंद दास यांच्या कुटुंबातील १३ सदस्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी झारखंडला पळून गेले.

वक्फ कायद्याच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये उसळलेल्या हिंसाचाराने अनेक कुटुंबांवर संकट ओढवले. या हिंसाचारात अनेकांवर हल्ले झाले आहेत. यात गोविंद दास आणि त्यांचा मुलगा चंदन दास यांच्या कुटुंबियांनी झारखंडमध्ये आश्रय घेतला आहे.

भारतासोबतच्या मैत्रीला ७८ वर्ष पूर्ण होताच रशियानं केली मोठी मागणी; चीनला मान्य होणार?

मुर्शिदाबाद हिंसाचारानंतर, गोविंद दास यांच्या कुटुंबातील १३ सदस्यांनी आपला जीव वाचवला. यासाठी त्यांनी झारखंडमध्ये पलायन केले. या कुटुंबाने झारखंडमधील साहिबगंजच्या राजवाड्यात आश्रय घेतला. मुर्शिदाबादमध्ये नाश्त्याचे दुकान चालवणारे गोविंद दास (७२) आणि त्यांचा ४० वर्षांचा मुलगा हिंसाचारात मारला गेला.

दुपारी सुरू झालेला हिंसाचार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. जेव्हा मालदा आणि बहरामपूर येथून सैन्य आले आणि या भागात पोहोचले तेव्हा हिंसाचार नियंत्रणात आणता आला. जमावाने आधी राष्ट्रीय महामार्ग ३४ रोखला. पोलिसांनी त्यांना हटवण्यास सुरुवात केली तेव्हा दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी पुन्हा अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. लाठीचार्ज झाला. दोन दिवसांपूर्वीही मुर्शिदाबाद पोलिसांवर हल्ला झाला होता. त्यानंतर आंदोलकांनी दोन वाहने पेटवून दिली. एनआरसीच्या काळातही मुर्शिदाबादमध्ये प्रचंड हिंसाचार झाला.

या कुटुंबातील सदस्य हृदय दास यांनी सांगितले की, १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुमारे ५०० दंगलखोरांनी त्यांच्या काका आणि भावाला दुकानाबाहेर ओढले आणि धारदार शस्त्रांनी त्यांची निर्घृण हत्या केली. यानंतर, दंगलखोरांनी बाजारपेठेतील सर्व दुकाने आणि आजूबाजूच्या परिसरातील ७० ते ८० घरांची तोडफोड केली. एवढेच नाही तर महिलांशीही गैरवर्तन केले.

शुक्रवारी मुर्शिदाबादच्या सुती येथे पहिल्यांदा हिंसाचार सुरू झाला. त्यानंतर जांगीपूर येथील पोलिस दल घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली. दरम्यान, सुतीपासून १० किमी दूर असलेल्या समशेरगंजमधूनही दंगलीची बातमी आली. सुती येथील महामार्गावरील जाम हटवण्यात पोलिस अडकून राहिले. पोलीस शमशेरगंजपर्यंत पोहोचू शकले नाहीत, तिथे हिंसाचार सुरूच राहिला. अशा परिस्थितीत, केंद्रीय दल बीएसएफला उतरावे लागले, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालwaqf board amendment billवक्फ बोर्ड