शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

‘इंडिया’त आणखी १३ पक्ष, मुंबईच्या बैठकीत दिसणार ताकद; पवार-ठाकरेंच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 09:42 IST

प्रागतिक विकास मंचाचे ‘इंडिया आघाडी’च्या मुंबईतील बैठकीत जयंत पाटील प्रतिनिधित्व करत आहेत.  

- सुनील चावके/एस.पी. सिन्हा 

नवी दिल्ली : शेकापचे जयंत पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील १३ छोटे-मोठे पक्ष आणि सामाजिक संघटनांचा समावेश असलेला ‘प्रागतिक विकास मंच’ मुंबईत होत असलेल्या ‘इंडिया आघाडी’मध्ये सामील होणार आहे. याचवेळी एनडीएच्या बैठकीत सहभागी ३८ पक्षांपैकी चार पक्ष विरोधी आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.

प्रागतिक विकास मंचाचे ‘इंडिया आघाडी’च्या मुंबईतील बैठकीत जयंत पाटील प्रतिनिधित्व करत आहेत.  राजकारणात काही महिन्यांपासून सत्ताधारी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युती तसेच महाविकास आघाडीपासून ‘प्रागतिक विकास मंचा’ने  समान अंतर राखले होते; पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना-ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘प्रागतिक विकास मंचा’ने आता ‘इंडिया आघाडी’च्या व्यासपीठावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

२०१९ मध्ये बजावली महत्त्वाची भूमिका...- २०१९ साली महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यातही ‘प्रागतिक विकास मंचा’ने महत्त्वाची भूमिका बजावली होती. - महाराष्ट्रात २०२४ ची लोकसभा निवडणूक अतिशय अटीतटीची होण्याची चिन्हे असून, महाराष्ट्राच्या पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये प्रभाव असलेल्या या १३ पक्षांच्या समूहामुळे राज्यभर विखुरलेल्या पुरोगामी मतांचा ‘इंडिया आघाडी’ला लाभ होईल, असे गणित मांडले जात आहे. 

देशपातळीवर ‘इंडिया’ महाराष्ट्रात ‘मविआ’समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, डॉ. सुरेश माने यांची बहुजन विकास पार्टी तसेच डाव्या आणि रिपब्लिकन विचारांचे नेते आणि सामाजिक संघटनांचा त्यात समावेश आहे. तेरा पक्षांचा हा मंच राष्ट्रीय राजकारणात ‘इंडिया आघाडी’चा, तर राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचा घटक असेल. 

‘मला फक्त सर्वांना एकत्र आणायचे आहे’- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची ‘इंडिया’च्या संयोजकपदी नियुक्ती करण्यावरून बरेच राजकारण होत आहे. - अशा स्थितीत समन्वयक बनविण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले की, मला काहीही बनायचे नाही आणि कोणतीही इच्छा नाही. - मी ही बाब पुन्हा पुन्हा सांगत आहे आणि पुन्हा सांगतो की, मला फक्त सर्वांना एकत्र आणायचे आहे.

डिसेंबरमध्ये लोकसभा? भाजपने सर्व हेलिकॉप्टर घेतली भाड्याने...केंद्रातील सत्ताधारी भाजप येत्या डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुका घेण्याची शक्यता असल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.  भाजपने सर्व हेलिकॉप्टर भाड्याने घेतली असून त्यांचा लोकसभा निवडणुकांतील प्रचारासाठी उपयोग करणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेवर आला तर देशाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टरचा वापर करता येऊ नये यासाठी भाजपने ही खेळी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये होणे अपेक्षित असताना त्याआधी भाजप निवडणुका घेऊ शकतो. आम्ही आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपला पराभूत करू.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडी