शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

तेलंगणात १२0 कोटी जप्त; मतदारांना वाटण्यासाठी आला होता बेहिशेबी पैसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 06:44 IST

मतदानाला २४ तास शिल्लक असताना गुरुवारी सकाळी तेलंगणात पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून तीन कोटी रुपये जप्त केले.

हैदराबाद : मतदानाला २४ तास शिल्लक असताना गुरुवारी सकाळी तेलंगणात पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून तीन कोटी रुपये जप्त केले. या प्रकरणात आठ जणांना पोलिसांनी अटक केली. ही रक्कम कर्नाटकातून आली होती, अशी प्राथमिक आहे. पण ती कोणी व कोणासाठी पाठवली हे स्पष्ट झालेले नाही.सराफ व हिरे व्यापारी यांची ही रक्कम असल्याचा अंदाज आहे. पण हे खरे नाही. सराफ व हिरे व्यापारी इतके चाणाक्ष असतात की निवडणुकांच्या काळात आपल्याकडील काळाच काय, पण पांढरा पैसाही रोखीच्या स्वरूपात कुठे पाठवत नाहीत. त्यामुळे ही रक्कम मतदारांना वाटण्यासाठीच आली असणार, हे उघड आहे. ही एवढीच रक्कम नाही. आतापर्यंत तेलंगणात १२0 कोटी रुपये या पद्धतीने जप्त करण्यात आले. विधानसभेच्या ११९ मतदारसंघांत जप्त करण्यात आलेली रक्कम आहे १२0 कोटी रुपये. म्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी १ कोटींहून अधिक काळा पैसा आला आहे. पण ही जप्त करण्यात आलेली रक्कम आहे. जी रक्कम पकडली गेली नाही, ती याहून अधिक असावी, असा अंदाज आहे.विधानभा निवडणुकांच्या काळातच ही रक्कम आली, याचाच अर्थ ती मतदारांना थेट वाटण्यासाठी वा निवडणुकांवर खर्च करण्यासाठी होती, हे उघड आहे. निवडणूक अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सप्टेंबरमध्ये विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच आपले १0५ उमेदवार जाहीर केले. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला आणि त्यामुळे काळा पैसाही या काळात अधिक आला.मात्र राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीसाठी हा पैसा आला का, याचे उत्तर मात्र कोणीच द्यायला तयार नाही.>मध्यप्रदेशात २९ कोटी,राजस्थानात ३५ कोटीमध्य प्रदेशातील मतदानआधीच झाले आहे. तिथे २३0 विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणूक काळात मध्यप्रदेशात २९ कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली होती, तर राजस्थानात उद्या, शुक्रवारी मतदान व्हायचे आहे. तिथे आतापर्यंत ३५ कोटी रुपये पकडण्यात आले आहेत.>नोटाबंदीचा हेतू साध्य झाला नाहीनोटाबंदी जाहीर करताना मोदी यांनी काळ्या पैशाला आळा घालणे हाही एक हेतू असल्याचे जाहीर केले होते. पण तसे घडले नाही. नोटाबंदीमुळे निवडणुकांतील काळा पैसा कमी झाला नाही, असे निवृत्त निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी तीनच दिवसांपूर्वी सांगितले. त्यांचे म्हणणे खरे असल्याचे दिसते.कोट्यवधींची दारूही पकडली गेलीकेवळ पैशाचेच वाटप होत आहे, असे नसून, तेलंगणात उमेदवारांनी मतदारांना साड्या, शर्ट व पँटचे कापड, भांडी, धान्य याचेही वाटप केले आहे. दारू तर या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात वाटली गेली की विचारता सोय नाही. मतांसाठी लोकांना दारू प्यायला लावणे, हे फारच झाले. पण निवडणूक जिंकण्यासाठी तेलंगणात सर्व मार्गांचा सर्व पक्ष आणि उमेदवारांनी अवलंब केला आहे. काही कोटींची दारूही तेलंगणातील बहुसंख्य मतदारसंघांत पकडली गेली आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018