शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनअभावी 12 रुग्णांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 04:26 IST

ऑक्सिजनअभावी कधीपर्यंत असे मृत्यू होत राहणार आहेत? राज्यात ऑक्सिजनची कमतरता आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचीही हीच स्थिती आहे. 

शहडोल : मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मिलिंद शिरालकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, ऑक्सिजनची कमतरता आहे. मात्र, शहडोलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या मृत्यूंमागे ऑक्सिजनची कमतरता असल्याचे वृत्त फेटाळले आहे. मृतांच्या नातेवाईकांनीही असा आरोप केला आहे की, सिलिंडरच्या कमतरतेमुळेच हे मृत्यू झाले आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत, शिवराज सिंह चौहान सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, भोपाळ, इंदौर, येथे ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्यानंतरही सरकारला जाग आली नाही. 

उपचाराअभावी डॉक्टरचा मृत्यूएस.पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये कोरोनामुळे शनिवारी ५१ जणांचा मृत्यू झाला. त्यात ११ जण पाटण्यातील, तर इतर जिल्ह्यांतील ४० जण होते. पीएमसीएचचे डॉक्टर डॉ. ललन प्रसाद यांचा मृत्यू त्यांना वेळेवर रुग्णालयात खाट व प्राणवायू न मिळाल्यामुळे झाला.प्रसाद यांचे कुटुंबीय त्यांना सरकारी किंवा खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी इकडून तिकडे फिरत राहिले; पण व्यर्थ. रात्री प्रसाद यांचा मृत्यू झाला. आयएमएचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजय कुमार यांनी सांगितले की, आमच्याशी संपर्क साधल्यावर आम्ही प्रयत्न केले; परंतु यश मिळाले नाही. उपचारांविनाच एक डॉक्टर मरण पावला. नालंदा जिल्ह्यातील नूरसराय विभागाचे गटविकास अधिकारी राहुल कुमार यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. राहुल कुमार यांचा पाटण्यातील फोर्ड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. ७ एप्रिल रोजी ते अँटिजन तपासणीत सकारात्मक निघाले होते. शेखपुरा जिल्ह्यात पंकज चौरसिया (२८)  यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबीय कोरोनाच्या भीतीने मृतदेह हॉटेलजवळ सोडून पळून गेले. हा प्रकार पोलिसांना समजल्यावर त्यांनी कुटुंबीयांची समजून काढल्यावर अंत्यसंस्कार केले गेले. कोरोनाची बाधा या जिल्ह्यात आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झाली आहे. याशिवाय अर्धा डझन बँक कर्मचारी मरण पावले आहेत.

 बँकव्यवस्थेवर परिणाम झाला असून, बँकांच्या अनेक शाखा बंद कराव्या लागल्या आहेत.एनएमसीएचमध्ये प्राणवायूच्या टंचाईमुळे कोविड कक्षातील रुग्णांत घबराट निर्माण झाली आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनोद कुमार सिंह यांनी विभागीय प्रधान सचिवांना पत्र पाठवून अधीक्षकपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने नाराज सिंह यांचे म्हणणे असे की, या रुग्णालयाचा प्राणवायूचा साठा दुसऱ्या ठिकाणी पा‌ठवला जात आहे. यामुळे रुग्णालयात अप्रिय घटना होऊ शकते व सगळा दोष मला दिला जाईल. कोरोना संक्रमितांची संख्या सतत वाढत असल्यामुळे येथे ४०० ते ४५० ऑक्सिजन सिलिंडर्सची गरज आहे. प्रत्यक्षात १०० सिलिंडर्सच उपलब्ध होत आहेत, असे सिंह म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या