शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

१२२ पैकी ११९ ‘आयपीएस’ अधिकारी नापास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 06:29 IST

सन २०१६ च्या नियमित बॅचमध्ये निवड झाल्यानंतर येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयपीएस) बहुतांश भावी अधिकारी पूर्ण उत्तीर्ण न होता बाहेर पडले आहेत.

हैदराबाद - सन २०१६ च्या नियमित बॅचमध्ये निवड झाल्यानंतर येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयपीएस) बहुतांश भावी अधिकारी पूर्ण उत्तीर्ण न होता बाहेर पडले आहेत.या बॅचमधील १२२ पैकी तब्बल ११९ अधिकारी एका वा अनेक विषयांत अनुत्तीर्ण झाले. भूतान, नेपाळ व मालदीवमधील १४ प्रशिक्षणार्थींसह ही बॅच एकूण १३४ जणांची होती. अकादमीच्या अंतिम परीक्षेत पूर्ण उत्तीर्ण झाले नसले, तरी हे ११९ अधिकारी आपापल्या नेमलेल्या कॅडरमध्ये ‘प्रोबेशनर’ म्हणून रुजू झाले आहेत, परंतु अनुत्तीर्ण झालेल्या विषयांमध्ये त्यांना पुढील तीन प्रयत्नांत उत्तीर्ण व्हावे लागेल. अन्यथा त्यांना ‘आयपीएस’ सोडावे लागेल. या बॅचमधील जे दोन अधिकारी पूर्णपणे अनुत्तीर्ण झाले, ते या आधीच सेवेतून गेले आहेत. या बॅचमध्ये २१ महिला अधिकारीही होत्या.या अकादमीत एखाद्या बॅचमधील ९० टक्के प्रशिक्षार्थी पूर्ण अनुत्तीर्ण न होणे हे ‘न भूतो’ आहे. विशेष म्हणजे गेल्या आॅक्टोबरमध्ये झालेल्या दीक्षान्त समारंभात ज्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पदके व चषक घेतले, त्यांच्यापैकी काही अधिकारीही सर्व विषयांत उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत. परदेशी प्रशिक्षार्थींपैकी एकही उत्तीर्ण झाला नाही. (वृत्तसंस्था)मुख्य विषयांतच ‘दांडी’बॅचमधील काही अधिकाऱ्यांचा एखाद-दुसरा विषय न सुटणे हे नवे नाही, परंतु ९० टक्के प्रशिक्षर्थी पूर्ण उत्तीर्ण न होणे असे अकादमीच्या इतिहासात कधी घडले नव्हते. विशेष म्हणजे, पोलिसांच्या दैनंदिन कामाशी निगडित अशा कायदा व सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षा यासारख्या विषयांत अनुत्तीर्ण व्हावे, यावरून देशाचे भावी ‘आयपीएस’ अधिकारी कोणत्या दर्जाचे असणार आहेत, हेच दिसते.45 आठवड्यांच्या एकूण प्रशिक्षणात वर्गात बसून शिकण्याच्या व मैदानी अशा दोन प्रकारच्या विषयांचे प्रशिक्षण असते. साक्षीचा कायदा, भारतीय दंड संहिता, दंड प्रक्रिया संहिता, न्यायवैद्यक, फॉरेन्सिक सायन्स आणि तपासाची तंत्रे हे विषय वर्गखोलीत शिकविले जातात.मैदानावर घेतली जाते परीक्षा!शस्त्रांची हाताळणी, पोहणे, योगाभ्यास, अश्वारोहण, नि:शस्त्र युद्धकला व कवायत मैदानावर घेतले जाते.दर चार महिन्यांनी सत्र परीक्षादर चार-पाच महिन्यांनी सत्र परीक्षा होते व त्यातील प्रश्न बहुपर्यायी असतात. अंतिम परीक्षेत दीर्घोत्तरी प्रश्न सोडवावे लागतात.

टॅग्स :Policeपोलिसexamपरीक्षाnewsबातम्या