शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

स्पेक्ट्रमचा विक्रमी लिलाव पूर्ण निविदेच्या ११५ फेऱ्या : सरकारला मिळणार १.१० लाख कोटी

By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव १९ दिवसानंतर बुधवारी पूर्ण झाला. विक्रमी बोलींमुळे सरकारच्या खजिन्यात सुमारे १.१० लाख कोटी रुपये जमा होणार आहेत. दूरसंचार स्पेक्ट्रममधील चार बँडसाठी निविदांच्या एकूण ११५ फेऱ्या पार पडल्या, हे विशेष.

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव १९ दिवसानंतर बुधवारी पूर्ण झाला. विक्रमी बोलींमुळे सरकारच्या खजिन्यात सुमारे १.१० लाख कोटी रुपये जमा होणार आहेत. दूरसंचार स्पेक्ट्रममधील चार बँडसाठी निविदांच्या एकूण ११५ फेऱ्या पार पडल्या, हे विशेष.
बोलींची एकूण किंमत १,०९,८७४ कोटी एवढी होती. रिलायन्स जिओसारख्या नव्या कंपन्या स्पर्धेत उतरल्याने एअरटेल आणि व्होडाफोनसारख्या प्रस्थापित कंपन्यांनी आक्रमक बोली लावत प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून आले. आठ ऑपरेटर्सनी बोली लावण्यात आघाडी घेतल्याने काही सर्कलमध्ये दोन स्पेक्ट्रम बँडच्या किमती दुपटीने वाढल्या. २०१० मध्ये १,०६,००० कोटी रुपयांची बोली लागली होती. त्यात बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांचा वाटा ३० हजार कोटींचा होता. यावेळी या दोन्ही कंपन्या वगळून अन्य कंपन्यांकडूनच उपरोक्त पैसा मिळणार असल्याचे दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले.
--------
लक्ष सुप्रीम कोर्टाकडे
लिलावप्रकरणी एक याचिका प्रलंबित असून सवार्ेच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर दूरसंचार विभाग यशस्वी बोली लावणाऱ्यांबाबत संपूर्ण तपशील आणि निकाल जाहीर करेल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले असतानाच सवार्ेच्च न्यायालय आज गुरुवारी निर्णय देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लिलावाची मार्गदर्शक तत्त्वे आणि निकषाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक याचिका दाखल आहेत.
---------
कॉलरेट वाढणार?
स्पर्धा शिगेला पोहोचल्याने ऑपरेटर्सकडून चढ्या किमतीच्या बोली लावण्यात आल्याचा परिणाम मोबाईल आणि फोनच्या कॉलचे दर, एसएमएस आणि डाटा शुल्क वाढण्यात होऊ शकतो. उद्योगातील आर्थिक परिस्थिती आणि किमतीची संरचना पूर्णपणे बदलू शकते; कारण त्याचा परिणाम कॉलचे दर वाढण्यात होऊ शकतो, असे सीओएआय या उद्योग मंडळाचे महासंचालक राजन एस. मॅथ्यू यांनी म्हटले. सर्व मोठ्या कंपन्या कर्जबाजारी असून स्पेक्ट्रमच्या रूपात कच्च्या मालाचे दर वाढल्याचे पाहता त्यांच्याकडे फोनसेवांचे दर वाढविण्याखेरीज पर्याय उरणार नाही, असे एयूएसपीआयचे माजी सरचिटणीस एस.सी. खन्ना यांनी म्हटले.