शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
4
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
5
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
6
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
7
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
8
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
9
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
10
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
11
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
12
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
13
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
14
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
15
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
16
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
17
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
18
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
19
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

स्पेक्ट्रमचा विक्रमी लिलाव पूर्ण निविदेच्या ११५ फेऱ्या : सरकारला मिळणार १.१० लाख कोटी

By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव १९ दिवसानंतर बुधवारी पूर्ण झाला. विक्रमी बोलींमुळे सरकारच्या खजिन्यात सुमारे १.१० लाख कोटी रुपये जमा होणार आहेत. दूरसंचार स्पेक्ट्रममधील चार बँडसाठी निविदांच्या एकूण ११५ फेऱ्या पार पडल्या, हे विशेष.

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव १९ दिवसानंतर बुधवारी पूर्ण झाला. विक्रमी बोलींमुळे सरकारच्या खजिन्यात सुमारे १.१० लाख कोटी रुपये जमा होणार आहेत. दूरसंचार स्पेक्ट्रममधील चार बँडसाठी निविदांच्या एकूण ११५ फेऱ्या पार पडल्या, हे विशेष.
बोलींची एकूण किंमत १,०९,८७४ कोटी एवढी होती. रिलायन्स जिओसारख्या नव्या कंपन्या स्पर्धेत उतरल्याने एअरटेल आणि व्होडाफोनसारख्या प्रस्थापित कंपन्यांनी आक्रमक बोली लावत प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून आले. आठ ऑपरेटर्सनी बोली लावण्यात आघाडी घेतल्याने काही सर्कलमध्ये दोन स्पेक्ट्रम बँडच्या किमती दुपटीने वाढल्या. २०१० मध्ये १,०६,००० कोटी रुपयांची बोली लागली होती. त्यात बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांचा वाटा ३० हजार कोटींचा होता. यावेळी या दोन्ही कंपन्या वगळून अन्य कंपन्यांकडूनच उपरोक्त पैसा मिळणार असल्याचे दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले.
--------
लक्ष सुप्रीम कोर्टाकडे
लिलावप्रकरणी एक याचिका प्रलंबित असून सवार्ेच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर दूरसंचार विभाग यशस्वी बोली लावणाऱ्यांबाबत संपूर्ण तपशील आणि निकाल जाहीर करेल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले असतानाच सवार्ेच्च न्यायालय आज गुरुवारी निर्णय देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लिलावाची मार्गदर्शक तत्त्वे आणि निकषाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक याचिका दाखल आहेत.
---------
कॉलरेट वाढणार?
स्पर्धा शिगेला पोहोचल्याने ऑपरेटर्सकडून चढ्या किमतीच्या बोली लावण्यात आल्याचा परिणाम मोबाईल आणि फोनच्या कॉलचे दर, एसएमएस आणि डाटा शुल्क वाढण्यात होऊ शकतो. उद्योगातील आर्थिक परिस्थिती आणि किमतीची संरचना पूर्णपणे बदलू शकते; कारण त्याचा परिणाम कॉलचे दर वाढण्यात होऊ शकतो, असे सीओएआय या उद्योग मंडळाचे महासंचालक राजन एस. मॅथ्यू यांनी म्हटले. सर्व मोठ्या कंपन्या कर्जबाजारी असून स्पेक्ट्रमच्या रूपात कच्च्या मालाचे दर वाढल्याचे पाहता त्यांच्याकडे फोनसेवांचे दर वाढविण्याखेरीज पर्याय उरणार नाही, असे एयूएसपीआयचे माजी सरचिटणीस एस.सी. खन्ना यांनी म्हटले.