शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मोदी यांच्याविरोधात १११ शेतकरी निवडणूक लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 05:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून निवडणूक लढवणार असले तरी यंदा त्यांना व मतदारांना वेगळ्याच प्रश्नाचा सामना करावा लागणार आहे. मोदी यांच्याविरोधात तब्बल १११ शेतकरी निवडणूक लढवणार आहेत.

तिरुचिरापल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून निवडणूक लढवणार असले तरी यंदा त्यांना व मतदारांना वेगळ्याच प्रश्नाचा सामना करावा लागणार आहे. मोदी यांच्याविरोधात तब्बल १११ शेतकरी निवडणूक लढवणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांच्यापुढे व जनतेपुढे मांडता यावेत, यासाठी १११ शेतकऱ्यांनी निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे. गंमत म्हणजे यापैकी एकही शेतकरी उत्तर प्रदेशातील नाही. हे सारे शेतकरी तामिळनाडूमधील असतील. तामिळनाडूतील शेतकऱ्यांचे नेते पी अय्याकन्नू यांनी ही घोषणा केली.अय्याकन्नू म्हणाले की, शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. आता तरी मोदी यांना या समस्यांची जाणीव व्हावी आणि त्यांनी त्या समस्या सोडवाव्यात, अशी आमची इच्छा आहे. कृषी मालाला नफाआधारित दर मिळावा, ही आमची महत्त्वाची मागणी आहे. आॅल इंडिया किसान संघर्ष कोआॅर्डिनेशन कमिटीतर्फे अन्य मतदारसंघांतही शेतकरी उमेदवार असतील. आमच्या मागण्या केवळ भाजपाकडेच नव्हे, तर सर्वच राजकीय पक्षांकडे आहेत. पण केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे मोदी यांच्याविरोधात उमेदवार उभे करण्याचे अय्याकन्नू यांनी ठरविले. खरोखर १0१ शेतकरी वाराणसीतून उभे राहिल्यास तिथे मतदानासाठी अनेक ईव्हीएम ठेवावी लागतील. एका ईव्हीएममध्ये केवळ १६ उमेदवारांचीच नावे असू शकतात. (वृत्तसंस्था)...तर अर्ज मागेमोदी यांनी वाराणसीमध्ये आम्हाला आमच्या मागण्या लगेचच मान्य करण्याचे आश्वासन दिले, तर आम्ही आमचे आंदोलन मागे घेऊ आणि त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे शेतकरीही आपले अर्ज मागे घेतील, असेही अय्याकन्नू यांनी सांगितले. म्हणजेच समस्यांकडे लक्ष वेधणे, एवढाच त्यांचा हेतू असल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक