शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मोदी यांच्याविरोधात १११ शेतकरी निवडणूक लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 05:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून निवडणूक लढवणार असले तरी यंदा त्यांना व मतदारांना वेगळ्याच प्रश्नाचा सामना करावा लागणार आहे. मोदी यांच्याविरोधात तब्बल १११ शेतकरी निवडणूक लढवणार आहेत.

तिरुचिरापल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून निवडणूक लढवणार असले तरी यंदा त्यांना व मतदारांना वेगळ्याच प्रश्नाचा सामना करावा लागणार आहे. मोदी यांच्याविरोधात तब्बल १११ शेतकरी निवडणूक लढवणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांच्यापुढे व जनतेपुढे मांडता यावेत, यासाठी १११ शेतकऱ्यांनी निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे. गंमत म्हणजे यापैकी एकही शेतकरी उत्तर प्रदेशातील नाही. हे सारे शेतकरी तामिळनाडूमधील असतील. तामिळनाडूतील शेतकऱ्यांचे नेते पी अय्याकन्नू यांनी ही घोषणा केली.अय्याकन्नू म्हणाले की, शेतकºयांच्या अनेक समस्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. आता तरी मोदी यांना या समस्यांची जाणीव व्हावी आणि त्यांनी त्या समस्या सोडवाव्यात, अशी आमची इच्छा आहे. कृषी मालाला नफाआधारित दर मिळावा, ही आमची महत्त्वाची मागणी आहे. आॅल इंडिया किसान संघर्ष कोआॅर्डिनेशन कमिटीतर्फे अन्य मतदारसंघांतही शेतकरी उमेदवार असतील. आमच्या मागण्या केवळ भाजपाकडेच नव्हे, तर सर्वच राजकीय पक्षांकडे आहेत. पण केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे मोदी यांच्याविरोधात उमेदवार उभे करण्याचे अय्याकन्नू यांनी ठरविले. खरोखर १0१ शेतकरी वाराणसीतून उभे राहिल्यास तिथे मतदानासाठी अनेक ईव्हीएम ठेवावी लागतील. एका ईव्हीएममध्ये केवळ १६ उमेदवारांचीच नावे असू शकतात. (वृत्तसंस्था)...तर अर्ज मागेमोदी यांनी वाराणसीमध्ये आम्हाला आमच्या मागण्या लगेचच मान्य करण्याचे आश्वासन दिले, तर आम्ही आमचे आंदोलन मागे घेऊ आणि त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे शेतकरीही आपले अर्ज मागे घेतील, असेही अय्याकन्नू यांनी सांगितले. म्हणजेच समस्यांकडे लक्ष वेधणे, एवढाच त्यांचा हेतू असल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक