शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

तेलंगणात ११ मातब्बरांचे निकाल ठरणार लक्षवेधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 04:38 IST

आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचारानंतर तेलंगणातील अनेक मातब्बर उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद झाले.

- धनाजी कांबळेहैदराबाद : आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचारानंतर तेलंगणातील अनेक मातब्बर उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद झाले. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे ११ डिसेंबरला जाहीर होणार असल्याने सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.टीआरएसचे नेते आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, टी. हरीश रावत, के. टी.रामा राव, ई. राजेंद्र, जी. जगदीश रेड्डी, जोगू रामण्णा, उत्तमकुमार रेड्डी, जेना रेड्डी कोंडूरू, के. लक्ष्मण, एम.मुरलीधर राव, अकबरूद्दिन ओवेसी यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार असून, यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.टीआरएस विरुद्ध काँग्रेस-टीडीपी-टीजेएस-सीपीआय महाआघाडी अशाच चुरशी बहुसंख्य ठिकाणी होणार असून, काही ठिकाणी भाजपाचे उमेदवारही चांगली टक्कर देतील, असे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाला राज्यात पाच जागा मिळाल्या होत्या. एमआयएमची ताकद हैदराबाद शहरातच असून, त्यांनी आठच उमेदवार उभे केले आहेत. गेल्या वेळी त्यांचे सात जण निवडून आलेच होते. यंदा आठही उमेदवार निवडून येतील, असा दावा अकबरुद्दिन ओवेसी यांनी केला आहे.अकबरुद्दिन ओवेसी यांनी टीआरएसला उघड पाठिंबाच दिला आहे. राज्यात टीआरएसचे सरकार येईल, असे ते स्वत:च सांगत आहेत. तरीही टीआरएसला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्यास ओवेसींचे आमदार मदतीला धावतील, हे स्पष्ट आहे. दुसरीकडे भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीआरएस ही काँग्रेसची बी टीम असल्याची टीका केली असली तरी प्रसंगी राज्यात काँग्रेसचे सरकार येऊ नये, यासाठी भाजपाही टीआरएसलाच बाहेरून पाठिंबा देऊ शकेल. त्यामुळे काँग्रेसच्या पुढाकाराने तयार झालेल्या आघाडीच्या नेत्यांनी भाजपा व टीआरएस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका केली होती. भाजपाने त्याचा इन्कार केला. टीआरएसच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपाने फार ताकदीचे उमेदवार दिलेले नाहीत, हेही विसरून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.>ओवेसींची लढत महत्त्वपूर्णएमआयएमचे नेते आणि असुदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरूद्दीन ओवेसी यांनी चंद्रयागुट्टा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. टीआरएसचे सहा, काँग्रेसचे दोन, भाजपचे दोन आणि एमआयएमचे १ असे ११ उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हातात असून, आता कोणाच्या पारड्यात किती मते पडली आहेत, हे मंगळवारीच कळणार असल्याने अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018