शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कचरा रीसायकलिंगमधून मिळणार ११ लाख नोकऱ्या; सहा वर्षांत उलाढाल जाणार ३ लाख कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:14 IST

येत्या सहा वर्षात ११ लाखू हून अधिक जणांना या उद्योगात रोजगार मिळू शकतात.

नवी दिल्ली : देशात दररोज मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होत आहे. शहरांमधून दररोज तब्बल तीन लाख टनांचा कचरा निर्माण होतो. यातील केवळ २० टक्केच कचऱ्याचे रिसायकलिंग करणे शक्य होते. सध्या कचरा रिसायकलिंगच्या उद्योगात वर्षाला ६० हजार कोटींची उलाढाल होत आहे. २०३० पर्यंत ही उलाढाल ३ लाख कोटींच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. सध्या १.२५ लाख कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह या उद्योगावर चालतो. येत्या सहा वर्षात ११ लाखू हून अधिक जणांना या उद्योगात रोजगार मिळू शकतात.

रिसायकलिंग उद्योगाशी संबंधित रिसस्टेनिबिलिटी लिमिटेड या कंपनीचे संचालक तसेच सीईओ मसूद मलिक यांनी सांगितले की, सध्या देशात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची निर्मिची होत असल्याने रिसायकलिंग उद्योगाचा विस्तार होण्यास भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

कामगारांचे आरोग्य जपण्याचे मोठे आव्हान 

कचरा व्यवस्थापन उद्योग वेगाने विकसित होत आहे. यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वाढत्या धोकादायक कचऱ्यामुळे मोठे आव्हान सध्या मानवजातीमसोर उभे राहिले आहे.

कचऱ्याची विल्हेवाट लावताना यात काम करणाऱ्यांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकाराचा धोका निर्माण होऊ नये यासाठीही काळजी घ्यावी लागणार आहे.

कचरा जमा करणे, त्याची शास्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे, प्रक्रिया करण्यायोग्य कचऱ्याचे विलगीकरण करणे याचे योग्य प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार आहे.

सरकारने राबवलेल्या स्वच्छता अभियानामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत कमालीची जागरूकता वाढली आहे. त्यांच्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. बदललेल्या या मानसिकतेचा लाभ देशातील रीसायकलिंग उद्योगाला मोठ्या प्रमाणात झाला आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीjobनोकरी