शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

संघर्षमय आयुष्यातही न खचता १०५ वर्षीय आजीने दिली चौथीची परीक्षा; रचला 'हा' इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 16:55 IST

या कठीण संघर्षातून उभं राहतात भागीरथी यांनी घर संसार सांभाळलं मात्र दुर्दैवाने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

दिल्ली - सर्व शिक्षा अभियान हे देशभरात व्हायरल झालेल्या शिक्षणाच्या टॅगलाइनला विशेष महत्व आहे. शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही वयाचं बंधन नसतं. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही शिक्षण घेऊ शकता. याचचं उदाहरण पाहायला मिळालं आहे केरळच्या भागीरथी अम्मा यांच्याकडे पाहून. लहानपणापासून शिक्षणाची गोडी असणाऱ्या भागीरथी यांनी वयाच्या १०५ व्या वर्षी आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. 

केरळमध्ये राज्य साक्षरता अभियानद्वारे चौथी वर्गाच्या परीक्षेत भागीरथी यांनी सहभाग घेतला होता. माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी नेहमी शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहत होती. मात्र लहानपणी आईचा मृत्यू झाला, त्यानंतर घरातील भावंडाची जबाबदारी माझ्यावर आली त्यामुळे माझं स्वप्न अपूर्ण राहिलं. 

या कठीण संघर्षातून उभं राहतात भागीरथी यांनी घर संसार सांभाळलं मात्र दुर्दैवाने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. वयाच्या ३० व्या वर्षी भागीरथी यांच्या पतीचा मृत्यू झाला. घरातील मुलाबाळांचा सांभाळ करणं त्यांच्यासमोर आव्हान बनलं होतं. आयुष्यातील या संघर्षमय प्रवासात शिक्षणापासून त्यांना लांब राहावं लागलं. मात्र उतारवयात त्यांना पूर्ण अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. भागीरथी यांनी चौथीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही जिद्द इतरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. 

पीटीआयच्या वृत्तानुसार साक्षरता मिशनचे निर्देशक पीएस श्रीकला यांनी सांगितले की, भागीरथी आम्मा या केरळ साक्षरता अभियानातील आतापर्यंतच्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे जे शिक्षण घेत आहेत. भागीरथी आम्मा यांना लिहिण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. मात्र त्यांच्या मुलीने यासाठी त्यांना मदत केली. पर्यावरण, गणित आणि मल्ल्याळम असे पेपर त्यांनी दिले. 

भागीरथी आम्मा यांना परीक्षा देताना अतिशय आनंद झाला. वयाच्या ९ व्या वर्षी भागीरथी आम्मा यांनी तिसरीत असताना शिक्षण सोडलं. इतक्या मेहनतीने शिक्षण घेत असलेल्या भागीरथी आम्माकडे आधारकार्ड नाही त्यामुळे त्यांना विधवा पेन्शन अथवा ज्येष्ठ नागरिक पेन्शनही मिळत नाही. मागच्या वर्षी ९६ वर्षाच्या कार्तियानी आम्मा यांनी साक्षरता अभियानात सर्वात जास्त मार्क मिळविले होते. त्यांना १०० पैकी ९८ गुण मिळाले होते.  

टॅग्स :Educationशिक्षणKeralaकेरळ