शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धोक्याची घंटा : मरकजसाठी 'या' राज्यातून आले होते तब्बल 1000 लोक, देशभरात 2100 लोकांची ओळख पटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 21:30 IST

केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहतीनुसार निजामुद्दीन मरकजमध्ये 21 मार्चपर्यंत तब्बल 1746 लोक उपस्थित होते. यात 216 परदेशी नागरिक होते. याशिवाय तबलिगी जमातच्या देशातील इतर मरकजांमध्ये 824 परदेशी लोक होते.

ठळक मुद्देनिजामुद्दीन मरकजमध्ये 21 मार्चपर्यंत होते 1746 लोक  216 परदेशी लोकांचाही होता समावेश यावर्षी तब्बल 2100 परदेशी लोक तबलिगी जमातच्या कार्यक्रमांसाठी भारतात आले होते

नवी दिल्ली - निजामुद्दीन तबलिगी जमातच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर आता देशातील ज्या-ज्या राज्यांतून या जमातसाठी लोक आले होते, त्या सर्व राज्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे लोक मार्च मिहिण्यात जमातसाठी आले होते. या मरकजसाठी आलेल्या 2100 हून अधिक लोकांची ओळख पटली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, एकट्या तेलंगणातून या जमातमध्ये तब्बल 1000 लोकांनी सहभाग घेतल्याचा अंदाज तेलंगणा सरकारने व्यक्त केला आहे.

निजामुद्दीन मरकजमध्ये 21 मार्चपर्यंत होते 1746 लोक -केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहतीनुसार निजामुद्दीन मरकजमध्ये 21 मार्चपर्यंत तब्बल 1746 लोक उपस्थित होते. यात 216 परदेशी नागरिक होते. याशिवाय तबलिगी जमातच्या देशातील इतर मरकजांमध्ये 824 परदेशी लोक होते. एवढेच नाही, तर यावर्षी तब्बल 2100 परदेशी लोक तबलिगी जमातच्या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. यात इंडोनेशिया, मलेशिया, थाइलंड, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि किर्गिस्तानमधील लोकांचा समावेश आहे. 

तबलिगी कार्यांत भाग घेण्यासाठी भारतात येणारे परदेशी लोक साधारणपणे सर्वप्रथम दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी मरकजाला रिपोर्ट करतात. यानंतरच ते इतर मरकजमध्ये जातात, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. 

निजामुद्दीनमधील 2,137 जणांची ओळख पटली -गृह मंत्रालयाने म्हटले आहे, की 28 मार्चलाच केंद्राने सर्व राज्यांतील पोलिसांना, तबलिगी जमातमध्ये भाग घेणाऱ्या लोकांचा शोध घ्यावा, आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करावी. तसेच आवश्यकता असेल तर त्यांना क्वारंटइन करण्यात यावे, अशा सूचनाही दिल्या आहेत. देशभरात मंगळवारी 2,137 लोकांची ओळख पटली आहे. या लोकांची वैद्यकीय चाचणी करणे सुरू आहे. तसेच त्यांना क्वारंटानमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच असे आणखीही लोक शोधले जात आहेत.

एकट्या तेलंगणातून 1000 लोक सहभागी झाल्याचा अंदाज -  निजामुद्दीन मरकजमध्ये झालेल्या बैठकीत सहभागी झालेल्या 6 जणांचा मृत्यू झाल्यानंतर तेलंगणा सरकार चिंतीत आहे. यामुळे तेलंगणा सरकार निजामुद्दीन येथील मरकजमध्ये भाग घेतलेल्या लोकांचा कसून शोध घेत आहे. एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीत, 'या मरकजमध्ये तेलंगणातील 1000 लोक दिल्लीला गेल्याचा अंदाज असल्याचे म्हटले आहे. संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचाही शोध घेत आहे.

याशिवाय हिमाचल पर्देशातून 17, तर पदुच्चेरीतील 6 जणांनी या मरकजमध्ये भाग घेतला होता, अशी माहिती तेथील सरकारांनी दिली आहे. तसेच उत्तर प्रदेशातील तब्बल 19 जिल्ह्यांतील लोक या जमातमध्ये सहभागी झाले होते असे समजते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIslamइस्लामMuslimमुस्लीमMosqueमशिदdelhiदिल्लीIndiaभारत