शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

'तृणमूलचे १०० आमदार भाजपमध्ये होणार सामील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 11:26 IST

अर्जुन सिंह यांनी केलेल्या दाव्याची तृणमूल काँग्रेसकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. तसेच अर्जुन सिंह यांनी डॉक्टरांकडून स्वत:वर उपचार करून घ्यावे, असंही तृणमूलच्या वतीने म्हटले आहे.

कोलकाता - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. यावेळची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालमध्ये चुरशीची होणार असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे. त्यातच आता तृणमूल काँग्रेसचे १०० आमदार आपल्या संपर्कात असून ते कधीही भाजपमध्ये सामील होतील, असा दावा भाजप नेते अर्जुन सिंह यांनी केला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. अर्जुन सिंह यांनी खुद्द तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. अर्जुन सिंह यांनी केलेल्या दाव्याची तृणमूल काँग्रेसकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. तसेच अर्जुन सिंह यांनी डॉक्टरांकडून स्वत:वर उपचार करून घ्यावे, असंही तृणमूलच्या वतीने म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसचे १०० आमदार आमच्या संपर्कात आहेत. तसेच ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहेत. काही आमदार निवडणुकीपूर्वी आणि काही निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार असल्याचे अर्जुन सिंह यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या भाटपुरी मतदार संघातून आमदार राहिलेले अर्जुन सिंह यांचे उत्तर कोलकातापासून नादिया भागात वर्चस्व आहे. आपल्या स्थानिक संपर्कामुळे अर्जुन सिंह आगामी काळात तृणमूल काँग्रेससाठी अडचणीचे ठरू शकतात, असंही समजते.

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये २२ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ठेवलेले आहे. यासाठी भाजपकडून पूर्ण तयारी सुरू आहे. पश्चिम बंगालमधील ४० लोकसभा जागांवर सात टप्प्यात मतदान होणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकtmcठाणे महापालिकाBJPभाजपा