शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनास १०० दिवस झाले पूर्ण; शेतकऱ्यांचा हरयाणात रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 06:22 IST

सकाळी ११ वा. सुरू झालेले हे आंदोलन सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालले. ‘संयुक्त किसान माेर्चा’च्या वतीने रास्ता रोकोचे आवाहन करण्यात आले होते.

चंदीगड/नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर पुकारलेल्या आंदोलनास शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले असून, यानिमित्त शेतकऱ्यांनी हरयाणातील कुंडली-मनेसर-पलवल (केएमपी) एक्स्प्रेसवेवर अनेक ठिकाणी रास्ता रोको केला. 

सकाळी ११ वा. सुरू झालेले हे आंदोलन सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालले. ‘संयुक्त किसान माेर्चा’च्या वतीने रास्ता रोकोचे आवाहन करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर वाहने केएमपी एक्स्प्रेसवेवरून चालू दिली जाणार नाहीत, असे भारतीय किसान युनियनचे (दाकौंडा) सरचिटणीस जगमोहनसिंग यांनी सकाळीच जाहीर केले होते. सोनिपत जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरच्या ट्राॅल्या रस्त्याच्या मधोमध पार्क करून अडथळा निर्माण केला. आंदोलनात महिलाही सहभागी होत्या. 

ज्यांची मुले सीमेवर लढताहेत त्यांच्या वाटेवर ठोकले खिळे; राहुल गांधी यांची टीकाn    ज्यांची मुले देशाच्या सीमांवर स्वत:चे प्राण धोक्यात घालून लढत आहेत, त्यांच्या मार्गात दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने खिळे ठोकले, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.  राहुल गांधी यांनी शनिवारी एक ट्विट केले. त्यात त्यांनी पुढे म्हटले की, अन्नदाता आपला हक्क मागत आहे आणि सरकार त्याच्यावर अत्याचार करीत आहे.  n    काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही सरकारवर टीका केली. त्यांनी ट्विट केले की, शेतकऱ्यांच्या संघर्षाचे, हक्काच्या लढाईचे १०० दिवस पूर्ण. अन्नदात्याच्या सन्मानाचे, गांधीजी, सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, शहीद भगतसिंग यांनी दाखवून दिलेल्या मार्गाचे शंभर दिवस पूर्ण. 

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीHaryanaहरयाणा