शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

आंदोलनास १०० दिवस झाले पूर्ण; शेतकऱ्यांचा हरयाणात रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 06:22 IST

सकाळी ११ वा. सुरू झालेले हे आंदोलन सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालले. ‘संयुक्त किसान माेर्चा’च्या वतीने रास्ता रोकोचे आवाहन करण्यात आले होते.

चंदीगड/नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर पुकारलेल्या आंदोलनास शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले असून, यानिमित्त शेतकऱ्यांनी हरयाणातील कुंडली-मनेसर-पलवल (केएमपी) एक्स्प्रेसवेवर अनेक ठिकाणी रास्ता रोको केला. 

सकाळी ११ वा. सुरू झालेले हे आंदोलन सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालले. ‘संयुक्त किसान माेर्चा’च्या वतीने रास्ता रोकोचे आवाहन करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर वाहने केएमपी एक्स्प्रेसवेवरून चालू दिली जाणार नाहीत, असे भारतीय किसान युनियनचे (दाकौंडा) सरचिटणीस जगमोहनसिंग यांनी सकाळीच जाहीर केले होते. सोनिपत जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरच्या ट्राॅल्या रस्त्याच्या मधोमध पार्क करून अडथळा निर्माण केला. आंदोलनात महिलाही सहभागी होत्या. 

ज्यांची मुले सीमेवर लढताहेत त्यांच्या वाटेवर ठोकले खिळे; राहुल गांधी यांची टीकाn    ज्यांची मुले देशाच्या सीमांवर स्वत:चे प्राण धोक्यात घालून लढत आहेत, त्यांच्या मार्गात दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने खिळे ठोकले, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.  राहुल गांधी यांनी शनिवारी एक ट्विट केले. त्यात त्यांनी पुढे म्हटले की, अन्नदाता आपला हक्क मागत आहे आणि सरकार त्याच्यावर अत्याचार करीत आहे.  n    काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही सरकारवर टीका केली. त्यांनी ट्विट केले की, शेतकऱ्यांच्या संघर्षाचे, हक्काच्या लढाईचे १०० दिवस पूर्ण. अन्नदात्याच्या सन्मानाचे, गांधीजी, सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, शहीद भगतसिंग यांनी दाखवून दिलेल्या मार्गाचे शंभर दिवस पूर्ण. 

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीHaryanaहरयाणा