शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

100 पूल जीर्ण अवस्थेत, कधीही कोसळू शकतात - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 16:16 IST

देशभरातील एकूण 100 पूल अत्यंत दयनीय अवस्थेत असून ते कधीही कोसळू शकतात अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे

ठळक मुद्देदेशभरातील एकूण 100 पूल अत्यंत दयनीय अवस्थेत असून ते कधीही कोसळू शकतातलोकसभेत बोलत असताना नितीन गडकरी यांनी माहिती दिलीजमीन अधीग्रहण, पर्यावरण मंजुरींमुळे रस्ते प्रकल्पाच्या कामांमध्ये उशीर होत आहे

नवी दिल्ली, दि. 3 - देशभरातील एकूण 100 पूल अत्यंत दयनीय अवस्थेत असून ते कधीही कोसळू शकतात अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या पुलांकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज असल्याचंही ते बोलले आहेत. लोकसभेत बोलत असताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. 

आपल्या मंत्रालयाने देशभरातील 1.6 लाख पुलांचं सेफ्टी ऑडिट केलं असून, 100 हून अधिक बांधकामं जीर्ण मोडकळीच्या अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे. हे 100 पूल कधीही कोसळण्याची भीती असून, त्यांच्याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे असं गडकरी बोलले आहेत. प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना त्यांनी ही माहिती उघड केली.

यावेळी नितीन गडकरी यांनी सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेचा उल्लेख केला. सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेला  बुधवारी एक वर्ष पूर्ण झालं. गतवर्षी २ ऑगस्टला महाड परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला होता. त्यात दोन एसटी बस आणि एक टव्हेरा गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. यात ४२ जणांचा मृत्यू झाला होता.  

'यापुढे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी माझ्या मंत्रालयाने सर्व पुलांची माहिती घेण्यासाठी विशेष प्रोजक्ट लाँच केला होता',  अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. रस्ते प्रकल्पाच्या कामांमध्ये होत असलेला उशीर यावर बोलताना गडकरींनी हा उशीर जमीन अधीग्रहण, पर्यावरण मंजुरींमुळे होत असल्याचं सांगितलं. 

सावित्री पूल पाच महिन्यात पुन्हा उभा राहिलासावित्री पूल दुर्घटनेची दखल घेऊन भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी याच ठिकाणी सहा महिन्यांत नवीन पूल बांधण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे पुलाचे काम पाच महिन्यांमध्येच पुर्ण करण्यात आले. तीन पदरी आणि 239 मीटर लांबीच्या या पुलाचं नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 

हा पूल बारा गाळ्यांचा, तीन पदरी आणि पदपथासह सोळा मीटर रुंदीचा आहे. साधारणत: या मोजमापाचा पूल पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागतो. मात्र या पुलाचे महत्त्व विचारात घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १८० दिवसांत पूल उभा करण्यात येईल असे जाहीर केले होते. निविदेमध्येही तशी अट टाकण्यात आली होती. एल अँड टी या ठेकेदार कंपनीने हे आव्हान स्वीकारत तीन पाळ्यांमध्ये रात्रंदिवस काम करून पाच महिन्यांमध्येच हे काम पूर्ण केले. या पुलाच्या बांधकामासाठी 35.77 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.