शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

राजौरीजवळच्या नियंत्रण रेषेवर जम्मू-काश्मीर सरकार बनवतंय 100 बंकर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 07:12 IST

जम्मू-काश्मीर, दि. 17 - गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची सेना जवळपास दररोजच शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलंय. त्याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या सरकारनं राजौरी जिल्ह्यात 100 बंकर बनवण्याचं काम सुरू केलं आहे. सीमेपलिकडून होणारा गोळीबार आणि मोर्टारच्या हल्ल्यांपासून बचावासाठी हे बंकर बनवण्यात येत असून, या बंकर्समध्ये राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळच्या गावातील लोकांना ...

जम्मू-काश्मीर, दि. 17 - गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची सेना जवळपास दररोजच शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलंय. त्याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या सरकारनं राजौरी जिल्ह्यात 100 बंकर बनवण्याचं काम सुरू केलं आहे. सीमेपलिकडून होणारा गोळीबार आणि मोर्टारच्या हल्ल्यांपासून बचावासाठी हे बंकर बनवण्यात येत असून, या बंकर्समध्ये राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळच्या गावातील लोकांना वेळप्रसंगी हलवण्यात येणार आहे. नियंत्रण रेषेजवळच्या नौशेरा सेक्टरमध्ये हे 100 बंकर बनवण्यात येत आहेत, अशी माहिती राजौरीचे पोलीस उपायुक्त शाहिद इक्बाल चौधरी यांनी दिली आहे. ते म्हणाले, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमेपलिकडून गोळीबार आणि मोर्टारचा हल्ला झालाच, तर अशा प्रसंगी जवळपासच्या गावातील 1200-1500 लोक या बंकरमध्ये आश्रय घेऊ शकतात.राजौरीचे पोलीस उपायुक्त शाहिद इक्बाल चौधरी यांनी निर्माणाधीन बंकरचा आढावा घेतला आहे. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एक टीम या बंकरांच्या बांधकामावर नजर ठेवून आहे. चौधरी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी गोळीबार आणि बॉम्बफेक झालेल्या ठिकाणांनाही भेट दिली आहे. जम्मू-काश्मीर सरकारनं 100 बंकर बनवत असल्याची माहिती राजौरीजवळच्या गावातील लोकांना दिली आहे. तसेच अशा प्रकारच्या जवळपास 6121 बंकर्सची गरज असल्याचंही जम्मू-काश्मीर मान्य केलं आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीनगरमधला 22 वर्षांपासूनचा हंडवाडा चौकातील बंकर हटवण्यात आला होता. या बंकरमध्ये एका छेडछाडीच्या प्रकरणामुळे मोठा संघर्ष निर्माण झाला होता. या संघर्षात तीन जणांचा मृत्यूही झाला होता. या छेडछाडीप्रकरणी एका व्यक्तीस अटकही करण्यात आली होती. यानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी हा बंकर हटवण्यासाठी आंदोलन छेडले होते. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आल्यानं हे बंकर हटवण्यात आले होते. आंदोलनामुळे प्रशासनानं संचारबंदीही लागू केली होती. लष्करानं बंकर रिकामे केल्यानंतर स्थानिकांनी ते तोडून टाकले. श्रीनगरमधल्या लोकांनी बंकर हटवल्यामुळे मोठा जल्लोषही केला होता.जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्याने कारवाया करून देशाच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या सात महिन्यांत लष्कराने जम्मू आणि काश्मीरमध्ये मिळून एकूण 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर अनेक दहशतवादी लष्कराच्या हिट लिस्टवर आहेत. गेल्या सात वर्षात जानेवारी ते जुलैदरम्यान चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ही सर्वाधिक संख्या आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. एकीकडे दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी आणि हल्ले करण्याचे सातत्याने प्रयत्न होत असतानाच लष्करही पूर्ण सामर्थ्याने त्यांना प्रत्युत्तर देत आहे. त्यातच दहशतवादी गटांचे कंबरडे मोडण्यासाठी लष्कराकडून जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. त्यानुसार काश्मीरमध्ये वावर असलेल्या बड्या दहशतवाद्यांना पद्धतशीररीत्या टिपण्यात येत आहे. गेल्या महिन्यात दक्षिण काश्मीरमध्ये सहा पोलिसांची हत्या करणारा लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी बशीर लष्करी तसेच हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सब्जार अहमद भट्ट यांचाही ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये समावेश आहे. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या काश्मीरमध्ये कारवाया करत असलेल्या दहशतवाद्यांची हिट लिस्ट लष्कराने तयार केली आहे. त्या हिट लिस्टच्या आधारावर लष्कराकडून ऑपरेशन हंट डाऊन अंतर्गत दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे.