शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

काश्मिरी पंडितांसाठी 100 एकर जमीन

By admin | Updated: January 24, 2017 03:53 IST

काश्मीरच्या खोऱ्यातून जीवाच्या भीतीने १९९0 साली पळून गेलेल्या काश्मिरी पंडितांनी पुन्हा राज्यात परत यावे, यासाठी राज्य सरकारने

श्रीनगर : काश्मीरच्या खोऱ्यातून जीवाच्या भीतीने १९९0 साली पळून गेलेल्या काश्मिरी पंडितांनी पुन्हा राज्यात परत यावे, यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना काश्मीर खोऱ्यात राहण्यासाठी सरकारने १00 एकर जमिनीचीही व्यवस्था केली आहे.काश्मीरमध्ये १0८९-९0 साली दहशतवादी कारवायांना उत आला होता. त्या काळात अनेक काश्मिरी पंडितांना त्रास देण्यात आला आणि काहींना हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे घाबरून हजारो कुटुंबे काश्मीरमधून पलायन करून अन्य राज्यांत राहायला गेली होती. मात्र त्यांची दिल्लीसह सर्व ठिकाणी अवस्था विस्थापितांसारखीच होती. या काश्मिरी पंडितांना पुन्हा काश्मीरमध्ये परत यायचे आहे आणि राज्य सरकारचीही तशी इच्छा आहे. मात्र आपल्याला पुन्हा त्रास दिला जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती. आता मात्र राज्य सरकारनेच या पंडितांनी पुन्हा यावे, यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्याच आठवड्यात पंडितांनी पुन्हा परत यावे, असे आवाहन करणारा ठराव एकमताने मंजूर झाला.त्यानंतर त्यांना काश्मीर खोऱ्यातच राहता यावे, यासाठी सरकारने १00 एकर जमीन पाहून ठेवली. ते आल्यास त्यांना तिथे राहता येईल. तसेच त्यांच्यापैकी अनेकांना तिथे रोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान सहा हजार काश्मिरी पंडित तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी मेहबुबा मुफ्ती सरकार प्रयत्नशील आहे. त्यांच्या सरकारमधील भाजपाही पंडितांच्या पुनरागमनासाठी आग्रही आहे. याबाबत मेहबुबा मुफ्ती आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचीही अनेकदा चर्चा झाली. (वृत्तसंस्था)