शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

काश्मिरी पंडितांसाठी 100 एकर जमीन

By admin | Updated: January 24, 2017 03:53 IST

काश्मीरच्या खोऱ्यातून जीवाच्या भीतीने १९९0 साली पळून गेलेल्या काश्मिरी पंडितांनी पुन्हा राज्यात परत यावे, यासाठी राज्य सरकारने

श्रीनगर : काश्मीरच्या खोऱ्यातून जीवाच्या भीतीने १९९0 साली पळून गेलेल्या काश्मिरी पंडितांनी पुन्हा राज्यात परत यावे, यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना काश्मीर खोऱ्यात राहण्यासाठी सरकारने १00 एकर जमिनीचीही व्यवस्था केली आहे.काश्मीरमध्ये १0८९-९0 साली दहशतवादी कारवायांना उत आला होता. त्या काळात अनेक काश्मिरी पंडितांना त्रास देण्यात आला आणि काहींना हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे घाबरून हजारो कुटुंबे काश्मीरमधून पलायन करून अन्य राज्यांत राहायला गेली होती. मात्र त्यांची दिल्लीसह सर्व ठिकाणी अवस्था विस्थापितांसारखीच होती. या काश्मिरी पंडितांना पुन्हा काश्मीरमध्ये परत यायचे आहे आणि राज्य सरकारचीही तशी इच्छा आहे. मात्र आपल्याला पुन्हा त्रास दिला जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती. आता मात्र राज्य सरकारनेच या पंडितांनी पुन्हा यावे, यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्याच आठवड्यात पंडितांनी पुन्हा परत यावे, असे आवाहन करणारा ठराव एकमताने मंजूर झाला.त्यानंतर त्यांना काश्मीर खोऱ्यातच राहता यावे, यासाठी सरकारने १00 एकर जमीन पाहून ठेवली. ते आल्यास त्यांना तिथे राहता येईल. तसेच त्यांच्यापैकी अनेकांना तिथे रोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान सहा हजार काश्मिरी पंडित तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी मेहबुबा मुफ्ती सरकार प्रयत्नशील आहे. त्यांच्या सरकारमधील भाजपाही पंडितांच्या पुनरागमनासाठी आग्रही आहे. याबाबत मेहबुबा मुफ्ती आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचीही अनेकदा चर्चा झाली. (वृत्तसंस्था)