शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

समाधानकारक : भारतात कोरोनाशी यशस्वी लढा, उपचारानंतर 11 रुग्ण ठणठणीत बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 12:56 IST

केरळातील 3 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जदेखील देण्यात आला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार याशिवाय दिल्लीतील 7 आणि तेलंगानातील एकमात्र कोरोना बाधित रुग्णही बरा झाला आहे.

ठळक मुद्देभारतात उपचारानंतर 11 कोरोनाग्रस्त ठणठणीत बरेसंपूर्ण देशात आतापर्यंत 80 हून अधिक लोकांना कोरोनाची लागणबऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये केरळ, तेलंगाना आणि दिल्लीतील रुग्णांचा समावेश

नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच एक आनंदाची बातमी आली आहे. देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 11 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून ते ठणठणीत बरेही झाले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

संपूर्ण देशात आतापर्यंत 80 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 11 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. यात समावेश असलेल्या केरळातील 3 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जदेखील देण्यात आला आहे. लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार याशिवाय दिल्लीतील 7 आणि तेलंगानातील एकमात्र कोरोना बाधित रुग्णही बरा झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 65 भारतीय, 16 इटालीयन आणि एका कॅनाडाच्या नागरिकाचा समावेश आहे. यो कोरोना बाधितांच्या  संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या 4,000 हून अधिक जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या शिवाय प्रमुख आणि छोट्या बंदरांवर एकूण 25 हजार 504 प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त लँडपोर्टवर 14 लाखाहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.

सामुहिक देखरेखीअंतर्गत 42 हजार 296 प्रवाशांची तपासणी -

भारत सरकारने सामुहिक देखरेखीअंतर्गत जवळपास 42,296 प्रवाशांची तपासणी केली आहे. यातील 2,559 लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली तर 522 लोकांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यात 17 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या शिवाय देशातील 30 विमानतळांवर एकूण 10 हजार 876 उड्डानांमध्ये 11 लाख 71 हजार 061 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. 3,062 प्रवाशांसह 583 संपर्कात आलेल्या लोकांची ओळख करून त्यांच्यावरही लक्ष ठेवण्यात येत आहे.

चार डॉक्टरांचे एक पथ रोमला रवाणा

कोरोना व्हायरसचा मोठा संसर्ग झालेल्या चीन, इरान आणि जपानसारख्या देशांमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकलेले आहेत. त्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठीदेखील सरकार प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून इराणमधून 1 हजार 199 जणांचे नमूने कोरोना चाचणीसाठी भारतात आणण्यात आले आहेत. या शिवाय आरोग्य मंत्रालयाने चार डॉक्टरांचे एक पथकही रोमला पाठवले आहे. त्यांना तेथे चाचणीसाठी भारतीयांचे नमुने गोळा करण्यास सांगण्यात आले आहेत. त्यानंतर तेथील भारतीयांना परत आणले जाणार आहे.

याशिवाय राज्यात नागपूर येथे तीन आणि पुणे, नगर आणि मुंबईत प्रत्येकी एक मिळून आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २० झाली आहे.