शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

आफ्रिकी देशांना दहा अब्ज डॉलर्सचे सुलभ कर्ज

By admin | Updated: October 29, 2015 22:19 IST

आफ्रिकी देशांना पुढील पाच वर्षांत १० अब्ज डॉलर्सचे सुलभ कर्ज, ६० कोटी डॉलर्सचे अनुदान साहाय्य व ५० हजार नव्या शिष्यवृत्त्या देण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली

नवी दिल्ली : आफ्रिकी देशांना पुढील पाच वर्षांत १० अब्ज डॉलर्सचे सुलभ कर्ज, ६० कोटी डॉलर्सचे अनुदान साहाय्य व ५० हजार नव्या शिष्यवृत्त्या देण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भारत आणि आफ्रिकी देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची एकमुखी मागणी करायला पाहिजे, असे मोदी म्हणाले. त्याचबरोबर दहशतवादाचा विरोध, हवामान बदल आणि संयुक्त राष्ट्र सुधार यांसारख्या मुद्यांवर परस्पर सहकार्य बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.नवी दिल्ली येथे गुरुवारी तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर संमेलनाच्या उद्घाटन सत्रात मोदी बोलत होते. हे संमेलन म्हणजे ‘एका छताखाली एक तृतीयांश मानवतेच्या स्वप्नांची बैठक’ असल्याचे स्पष्ट करून मोदी म्हणाले, १.२५ अब्ज भारतीय आणि १.२५ अब्ज आफ्रिकींच्या हृदयांची स्पंदने एक झाली आहेत. ही भागीदारी सामरिक चिंता आणि आर्थिक लाभाच्या पलीकडची आहे. जगातील एक मोठा भागीदार एकीकृत आणि वैभवशाली आफ्रिकेचे स्वप्न साकार करण्यासाठी भारत आपल्या समर्थनाचा स्तर वाढवेल, असेही मोदी म्हणाले.मुगाबे यांची खंतझिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगत या संदर्भातील भारताच्या मागणीला पाठिंबा दिला. या वैश्विक संस्थेच्या शक्तिशाली सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आफ्रिकी देशांना तुच्छ समजतात, असा आरोप मुगाबे यांनी यावेळी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘आम्ही ६० कोटी डॉलर्सच्या अनुदान साहाय्याचा प्रस्ताव देत आहोत. त्यात १० कोटी डॉलर्स भारत-आफ्रिका विकास निधी आणि एक कोटी डॉलर भारत-आफ्रिका आरोग्य निधीचा समावेश आहे. यामध्ये पुढील पाच वर्षांत भारतात आफ्रिकन देशांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचाही समावेश आहे. भारत संपूर्ण आफ्रिकेत १०० क्षमता निर्माण संस्था स्थापन करणार आणि पायाभूत सुविधांचा विकास, सार्वजनिक परिवहन, स्वच्छ ऊर्जा, सिंचन, कृषी आणि उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी सहकार्य करेल, असे मोदी यांनी जाहीर केले. या संमेलनाला ४१ आफ्रिकी देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि ५४ आफ्रिकी देशांचे शेकडो वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बदलत्या काळानुसार बदलले पाहिजेसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणेवर भर देताना मोदी म्हणाले, सुरक्षा परिषदेने बदलत्या जगानुरूप स्वत:ला बदलले नाही तर परिषद अप्रासंगिक ठरेल. या संस्थांनी आमची चांगली सेवा केली आहे; परंतु बदलत्या काळानुसार जे बदलत नाही ते अप्रासंगिक होण्याचा धोका असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.भारत आणि आफ्रिका शांतता, प्रगती आणि समृद्धीच्या आपल्या एकसमान ध्येयाच्या माध्यमातून एकामेकांशी जुळलेले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेच्या आधारावर उभय देशांमध्ये सहकार्य व भागीदारी असली पाहिजे, असे आवाहन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या संमेलनात केले.आफ्रिकी देशांना आवाहनपंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात आफ्रिकी देशांना सौर ऊर्जा संपन्न देशांच्या आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव दिला. मोदी ३० नोव्हेंबरला पॅरिसमध्ये आयोजित हवामान बदल शिखर परिषदेत याबाबत घोषणा करतील.