शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

आफ्रिकी देशांना दहा अब्ज डॉलर्सचे सुलभ कर्ज

By admin | Updated: October 29, 2015 22:19 IST

आफ्रिकी देशांना पुढील पाच वर्षांत १० अब्ज डॉलर्सचे सुलभ कर्ज, ६० कोटी डॉलर्सचे अनुदान साहाय्य व ५० हजार नव्या शिष्यवृत्त्या देण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली

नवी दिल्ली : आफ्रिकी देशांना पुढील पाच वर्षांत १० अब्ज डॉलर्सचे सुलभ कर्ज, ६० कोटी डॉलर्सचे अनुदान साहाय्य व ५० हजार नव्या शिष्यवृत्त्या देण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भारत आणि आफ्रिकी देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची एकमुखी मागणी करायला पाहिजे, असे मोदी म्हणाले. त्याचबरोबर दहशतवादाचा विरोध, हवामान बदल आणि संयुक्त राष्ट्र सुधार यांसारख्या मुद्यांवर परस्पर सहकार्य बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.नवी दिल्ली येथे गुरुवारी तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर संमेलनाच्या उद्घाटन सत्रात मोदी बोलत होते. हे संमेलन म्हणजे ‘एका छताखाली एक तृतीयांश मानवतेच्या स्वप्नांची बैठक’ असल्याचे स्पष्ट करून मोदी म्हणाले, १.२५ अब्ज भारतीय आणि १.२५ अब्ज आफ्रिकींच्या हृदयांची स्पंदने एक झाली आहेत. ही भागीदारी सामरिक चिंता आणि आर्थिक लाभाच्या पलीकडची आहे. जगातील एक मोठा भागीदार एकीकृत आणि वैभवशाली आफ्रिकेचे स्वप्न साकार करण्यासाठी भारत आपल्या समर्थनाचा स्तर वाढवेल, असेही मोदी म्हणाले.मुगाबे यांची खंतझिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगत या संदर्भातील भारताच्या मागणीला पाठिंबा दिला. या वैश्विक संस्थेच्या शक्तिशाली सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आफ्रिकी देशांना तुच्छ समजतात, असा आरोप मुगाबे यांनी यावेळी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘आम्ही ६० कोटी डॉलर्सच्या अनुदान साहाय्याचा प्रस्ताव देत आहोत. त्यात १० कोटी डॉलर्स भारत-आफ्रिका विकास निधी आणि एक कोटी डॉलर भारत-आफ्रिका आरोग्य निधीचा समावेश आहे. यामध्ये पुढील पाच वर्षांत भारतात आफ्रिकन देशांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचाही समावेश आहे. भारत संपूर्ण आफ्रिकेत १०० क्षमता निर्माण संस्था स्थापन करणार आणि पायाभूत सुविधांचा विकास, सार्वजनिक परिवहन, स्वच्छ ऊर्जा, सिंचन, कृषी आणि उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी सहकार्य करेल, असे मोदी यांनी जाहीर केले. या संमेलनाला ४१ आफ्रिकी देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि ५४ आफ्रिकी देशांचे शेकडो वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बदलत्या काळानुसार बदलले पाहिजेसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणेवर भर देताना मोदी म्हणाले, सुरक्षा परिषदेने बदलत्या जगानुरूप स्वत:ला बदलले नाही तर परिषद अप्रासंगिक ठरेल. या संस्थांनी आमची चांगली सेवा केली आहे; परंतु बदलत्या काळानुसार जे बदलत नाही ते अप्रासंगिक होण्याचा धोका असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.भारत आणि आफ्रिका शांतता, प्रगती आणि समृद्धीच्या आपल्या एकसमान ध्येयाच्या माध्यमातून एकामेकांशी जुळलेले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेच्या आधारावर उभय देशांमध्ये सहकार्य व भागीदारी असली पाहिजे, असे आवाहन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या संमेलनात केले.आफ्रिकी देशांना आवाहनपंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात आफ्रिकी देशांना सौर ऊर्जा संपन्न देशांच्या आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव दिला. मोदी ३० नोव्हेंबरला पॅरिसमध्ये आयोजित हवामान बदल शिखर परिषदेत याबाबत घोषणा करतील.