शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

Pulwama Attack : शहिदांसाठी मोठं योगदान; माती गोळा करण्यासाठी झटला मराठमोळा तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 13:35 IST

काश्मिरच्या लेथपोरा सेक्टरमधील सीआरपीएफ कॅम्पसमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे उमेश गोपीनाथ जाधव यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. 

ठळक मुद्देउमेश गोपीनाथ जाधव यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी भारतभर तब्बल 61 हजार किलोमीटरचा प्रवास केला.उमेश यांनी शहिदांच्या मूळ गावी जाऊन तेथील माती जमा केली आहे. उमेश जाधव यांच्या या अनोख्या कार्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांनाही गर्व आहे.

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला. या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफनेही आपल्या शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. काश्मिरच्या लेथपोरा सेक्टरमधील सीआरपीएफ कॅम्पसमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे उमेश गोपीनाथ जाधव यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. 

उमेश गोपीनाथ जाधव यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी भारतभर तब्बल 61 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. उमेश यांनी शहिदांच्या मूळ गावी जाऊन तेथील माती जमा केली आहे. प्रत्येक जवानाच्या गावी जाऊन तेथील माती एका कलशामध्ये जमा करुन सर्व कलश एकत्र करुन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. हे सर्व कलश सीआरपीएफ तळावर शहीद जवानांची आठवण म्हणून ठेवण्यात येणार आहेत. भारतभर केलेल्या प्रवासादरम्यान उमेश यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 

उमेश जाधव यांच्या या अनोख्या कार्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांनाही गर्व आहे. 'माझी पत्नी आणि मुलांना माझा अभिमान वाटतो यातच सर्व आलं. भविष्यात माझीही मुलं सैन्यात भरती होतील आणि इतरही मुलांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे' असं उमेश यांनी सांगितलं. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांचं राहतं घर शोधणं सोपं नव्हतं. काही जण अत्यंत दुर्गम भागात राहतात. तसेच अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

उमेश जाधव हे फार्माकॉलजिस्ट आणि उत्तम संगीतकार आहेत. उमेश यांनी हा संपूर्ण प्रवास त्यांच्या एका खासगी कारमधून केला आहे. त्यांच्या कारवरही देशभक्तीवर घोषवाक्य लिहीली आहेत. ते रोज याच गाडीत झोपायचे. उमेश यांनी शहिदांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी  भारतभर 61 हजार किमीचा प्रवास केला. त्यांचा हा प्रवास गेल्या आठवड्यात संपला, ज्याला ते 'तीर्थयात्रा' मानतात. सीआरपीएफनेही आपल्या शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. गर्व इतना था कि हम देर तक रोये नही... असं म्हणत CRPF ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली. त्यांनी आपले जीवन आपल्या देशाच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी वाहिले. पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान देश कधीच विसरणारही नाही' असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. गृह मंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी ट्विट केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Raj Thackeray: 'हिंदूजननायक' उपाधीवर राज ठाकरेंनी हातच जोडले, जरा चिडूनच म्हणाले...  

पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवाल

Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधानांसह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्य

Delhi Election Results : ...म्हणून केजरीवालांच्या शपथविधीला इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानNarendra Modiनरेंद्र मोदी