शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

० ते १६१ आमदार, १३ खासदार, २ राज्यात सरकार...; १२ वर्षात कसा होता 'आप'चा प्रवास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 13:54 IST

दिल्लीत सध्या आम आदमी पक्षात नवा चेहरा पुढे आला आहे. अरविंद केजरीवालांनी अतिशी यांना मुख्यमंत्रिपदाची धुरा दिली आहे. 

नवी दिल्ली - भ्रष्टाचाराविरोधातील लढाईतून जन्म झालेल्या आम आदमी पक्षाला आता भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे १५६ दिवस जेलमध्ये होते. जामीनावर बाहेर आलेले केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा कली आता जोवर जनता मला खुर्चीवर बसवणार नाही तोवर मी मुख्यमंत्री होणार नाही असंही त्यांनी सांगितले. 

आजपासून १२ वर्षापूर्वी अरविंद केजरीवाल त्या हजारोंच्या गर्दीतील एक घटक होते, जी दिल्लीच्या जंतर मंतरवर अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी होते. परंतु आज अरविंद केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वाचा चेहरा बनले आहेत. भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंचं आंदोलन झालं होते. त्यावेळी अरविंद केजरीवाल सक्रीयपणे या लढ्यात उतरले होते. अण्णा हजारेंचं आंदोलन दिर्घकाळ चालले. 

२ ऑक्टोबर २०१२...

ही तीच तारीख आहे ज्यादिवशी अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. केजरीवाल यांनी अण्णांच्या आंदोलनाचा वापर राजकीय फायद्यासाठी केला असा आरोपही त्यांच्यावर झाला. मात्र देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी राजकारणात आलोय, सिस्टममध्ये घुसून आतील साफसफाई करू असं केजरीवाल आणि त्यांचे समर्थक बोलत होते. अखेर २६ नोव्हेंबर २०१२ रोजी अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी नावाच्या राजकीय पक्ष स्थापन केली. सर्व पक्षांनी विश्वासघात केला, सर्व पक्ष एकमेकांना मदत करतात. जोपर्यंत राजकारण बदलणार नाही तोपर्यंत भ्रष्टाचारमुक्त होणार नाही. त्यासाठी आम्ही आम आदमी पार्टीची स्थापन केली असं केजरीवालांनी म्हटलं.

२०१३ साली दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने सर्व जागा लढण्याचं ठरवलं. त्यानंतर पहिल्याच निवडणुकीत दिल्लीत आपनं ७० पैकी २८ जागा विजयी होत सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का दिला. अरविंद केजरीवालांनी तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दिक्षित यांचा पराभव केला. त्यानंतर बहुमत न मिळाल्याने काँग्रेससोबत मिळून केजरीवाल सत्तेत आले. मात्र या आघाडीवर आरोप होऊ लागले तेव्हा अवघ्या ४९ दिवसांत केजरीवालांनी राजीनामा दिला. 

वर्षभर राष्ट्रपती राजवटीनंतर दिल्लीत निवडणुका झाल्या. त्यात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून बहुमत मिळवलं आणि स्वबळावर दिल्लीत सरकार स्थापन केले. फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. यावेळी ७० पैकी ६२ जागा आपने जिंकल्या. २०१५ च्या तुलनेत आमदारांची संख्या घटली परंतु पुन्हा बहुमत मिळवणं हे चमत्कारापेक्षा कमी नव्हतं.  

१० वर्षात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा

२ वर्षापूर्वी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात १३ टक्के मते आपला मिळाली. त्याठिकाणी ५ जागा केजरीवालांच्या पक्षाने जिंकल्या त्यामुळे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. सध्या दिल्ली आणि पंजाब याठिकाणी आम आदमी पक्षाचं सरकार आहे. दिल्लीत ६२, पंजाबमध्ये ९२, गुजरातमध्ये ५, गोवा असे एकूण १६१ आमदार आहेत. त्याशिवाय दिल्ली महापालिकेत आपची सत्ता आहे. संसदेत आपचे १३ खासदार आहेत त्यात लोकसभेत ३ आणि राज्यसभेत १० खासदार आहेत.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीanna hazareअण्णा हजारे