शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

जि़प़ कामकाजाची चौकशी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 01:04 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या कारभाराविषयी पदाधिकारी, सदस्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गठित केलेल्या समितीची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून, आठवडाभरात ती पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे समिती ठाण मांडून : आठवड्यात अहवाल देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या कारभाराविषयी पदाधिकारी, सदस्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गठित केलेल्या समितीची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून, आठवडाभरात ती पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजाविषयी रोष प्रकट करून स्थायी समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. त्यात अखर्चित निधी, निधी खर्चाचे नियोजन न करणे, महिला व बाल कल्याण विभागाच्या योजना न राबविल्या गेल्याने तीन वर्षांपासून निधी पडून असणे, समाज कल्याण विभागातदेखील ५ टक्के खर्चाचे नियोजन न होणे, नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेल्या निधीचे अवघे ५० टक्केच खर्च होणे, केंद्र सरकारकडून प्राप्त होणाºया सर्व शिक्षा अभियान, राष्टÑीय आरोग्य अभियान या योजनेंतर्गत प्राप्त होणाºया निधी खर्चात लोकप्रतिनिधींच्या सूचना डावलणे, राष्टÑीय पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होऊनही देयके न देणे, जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांनी सुचविलेली कामे न करणे, फाइलींचा निपटारा न करणे आदी प्रकारच्या तक्रारी करणारे निवेदन विभागीय आयुक्त माने यांना सादर करून या संपूर्ण कामकाजाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती.या संपूर्ण तक्रारींची दखल घेत विभागीय आयुक्त माने यांनी सहा सदस्यीय समितीची नेमणूक करून त्यांना विविध मुद्द्यांवर चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या ठप्प झालेल्या कामांची माहिती घेणे, सन २०१७-१८ या वर्षाचा ८३ कोटी अखर्चित निधी परत गेला, त्यास शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता घेणे आवश्यक असताना कार्यवाही न करणे, समाज कल्याण विभागातील ५ टक्के निधी खर्चाचे नियोजन न करणे याबाबींची चौकशी करण्याबरोबरच सन २०१७ पासून विभागवार मंजूर नियत व त्या प्रमाणात झालेला खर्च व नियोजन, अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रलंबित विभागीय चौकशी पूर्ण करून प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेणे, निधी खर्चासाठी विलंब व खर्चाचे नियोजन याची माहिती घेण्याच्याही सूचना दिल्या होत्या. पंधरा दिवसांपासून या समितीने जिल्हा परिषदेत ठाण मांडून प्रत्येक विभागाच्या फाईल्स, योजनांची माहिती व अंमलबजावणीतील अडचणी जाणून घेतल्या. गेल्या आठवड्यात अध्यक्ष, पदाधिकाºयांची निवडणूक असल्याने समितीने कामकाज थांबविले होते. सोमवारपासून पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदEmployeeकर्मचारी