शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्हा परिषदेला साडेतीनशे कोटी निधी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 00:56 IST

जिल्हा नियोजन मंडळाकडून चालू आर्थिक वर्षात विविध योजना व विकास कामांसाठी ऑक्टोबर अखेर ३६२ कोटी ९७ लाख ६५ हजार रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून, कोरोना काळातही विविध खात्यांनी दोनशे कोटींहून अधिक रुपये खर्च केले असून, खर्चाचे हे प्रमाण ५५ टक्के इतके आहे. आगामी काळात उर्वरित रक्कम खर्च करण्याचे मोठे आव्हान आहे.

ठळक मुद्दे५५ टक्के खर्च : नियोजन मंडळाकडून मिळाले पैसे

नाशिक : जिल्हा नियोजन मंडळाकडून चालू आर्थिक वर्षात विविध योजना व विकास कामांसाठी ऑक्टोबर अखेर ३६२ कोटी ९७ लाख ६५ हजार रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून, कोरोना काळातही विविध खात्यांनी दोनशे कोटींहून अधिक रुपये खर्च केले असून, खर्चाचे हे प्रमाण ५५ टक्के इतके आहे. आगामी काळात उर्वरित रक्कम खर्च करण्याचे मोठे आव्हान आहे. जिल्हा विकास योजनांसाठी दरवर्षी नियोजन मंडळाकडून सर्वसाधारण योजनांसाठी तसेच आदिवासी उपयोजनांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. साधारणत: मे महिन्यानंतर विकासकामे व योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर नियोजन मंडळाकडून टप्पाटप्प्याने निधी वितरीत केला जातो. यंदा मार्च महिन्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने जवळपास तीन महिने शासकीय कामकाज ठप्प झाले होते. पाणीपुरवठा व आरोग्य विभाग वगळता सर्वच खात्यांचे कामकाज थंडावले होते. जून, जुलैपासून खऱ्या अर्थाने कामकाजाला सुरुवात होऊन विविध खात्यांनी आपले प्रस्ताव तयार करून त्यास प्रशासकीय मान्यता, स्थायी समिती व सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन निधीची मागणी केल्याने नियोजन मंडळाने तीनशे कोटी ९७ लाख ६५ हजार रुपये वितरीत केले. त्यात शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, ग्रामपंचायत, कृषी, बांधकाम व लघु पाटबंधारे विभागांचा समावेश आहे. या निधीच्या खर्चाचा आढावा घेतला असता त्यात विविध खात्यांनी आजवर ५५ टक्के निधी खर्च केल्याची बाब समोर आली आहे. सदरचा निधी मार्चअखेरपर्यंत खर्च करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे सर्वच खात्यांनी निधी वेळेत खर्च करण्याच्या सूचना अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदMONEYपैसा