शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी तातडीने प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:55 IST

अवकाळी पावसामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांचे पत्रे व कौले उडून गेली असून, सध्या शाळा सुरू झाल्याने कधीही पावसाचे आगमन होवू शकते. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे पावसापासून बचाव करण्यासाठी पत्रे उडालेल्या शाळांची दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत देण्यात आल्या.

ठळक मुद्देशिक्षकांच्या नियुक्त्या सोमवारपर्यंत

नाशिक : अवकाळी पावसामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांचे पत्रे व कौले उडून गेली असून, सध्या शाळा सुरू झाल्याने कधीही पावसाचे आगमन होवू शकते. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे पावसापासून बचाव करण्यासाठी पत्रे उडालेल्या शाळांची दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत देण्यात आल्या.स्थायी समितीची सभा अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी शाळा दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला असतानाही ग्रामीण भागातील शाळा दुरुस्ती होत नसल्याबद्दल नागरिक तक्रारी करीत असून, शिक्षण विभागाला किती निधी प्राप्त झाला आणि त्यातून कधी कामे होणार असा सवाल केला, तर आत्माराम कुंभार्डे यांनी चांदवड तालुक्यात अवकाळी वादळी पावसामुळे अनेक शाळांचे पत्रे उडाल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, दुरुस्ती करावयाच्या शाळांचा प्राधान्यक्रम ठरवून समितीची मान्यता मिळण्याची वाट न पाहता ज्या शाळांचे पत्रे उडाले व किरकोळ खर्चाचे काम असेल तर त्याचे स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनीही सहमती दर्शवित वादळामुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती सदस्य, गट शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांकडून मागवून प्राधान्यक्रम ठरवावे व शिक्षण समितीच्या बैठकीत त्याची मान्यता घेऊन आठ दिवसांत आपल्याकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश दिले.शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी शाळा दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी प्राप्त झाला असल्याचे सांगून, २८ जून रोजी शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले. आंतरजिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीबाबत मनीषा पवार यांनी प्रश्न विचारून लवकरात लवकर शिक्षकांना नियुक्त्या देण्याची मागणी केली. त्यावर शासनाकडून नियुक्ती देण्याबाबत नवीन आदेश प्राप्त झाले असून, त्यानुसार येत्या सोमवारपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.शाळेसाठी शिक्षणमंत्र्यांना भेटणारकन्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू असले तरी, त्यासाठी शिक्षक मान्यता नाही. त्यामुळे नेहमीच या शाळेचा प्रश्न निर्माण होत असल्याबद्दल कुंभार्डे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर चार महिला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असली, त्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्र्माण होत असल्यामुळे शासनाकडे तसा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कन्या शाळा जिल्हा परिषदेसाठी आवश्यक असून, गरिबांची मुले येथे शिक्षण घेतात त्यामुळे प्रसंगी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याकडे बैठक घेण्यात येईल, असे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सांगितले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSchoolशाळा