शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी तातडीने प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:55 IST

अवकाळी पावसामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांचे पत्रे व कौले उडून गेली असून, सध्या शाळा सुरू झाल्याने कधीही पावसाचे आगमन होवू शकते. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे पावसापासून बचाव करण्यासाठी पत्रे उडालेल्या शाळांची दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत देण्यात आल्या.

ठळक मुद्देशिक्षकांच्या नियुक्त्या सोमवारपर्यंत

नाशिक : अवकाळी पावसामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांचे पत्रे व कौले उडून गेली असून, सध्या शाळा सुरू झाल्याने कधीही पावसाचे आगमन होवू शकते. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे पावसापासून बचाव करण्यासाठी पत्रे उडालेल्या शाळांची दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत देण्यात आल्या.स्थायी समितीची सभा अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी शाळा दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला असतानाही ग्रामीण भागातील शाळा दुरुस्ती होत नसल्याबद्दल नागरिक तक्रारी करीत असून, शिक्षण विभागाला किती निधी प्राप्त झाला आणि त्यातून कधी कामे होणार असा सवाल केला, तर आत्माराम कुंभार्डे यांनी चांदवड तालुक्यात अवकाळी वादळी पावसामुळे अनेक शाळांचे पत्रे उडाल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, दुरुस्ती करावयाच्या शाळांचा प्राधान्यक्रम ठरवून समितीची मान्यता मिळण्याची वाट न पाहता ज्या शाळांचे पत्रे उडाले व किरकोळ खर्चाचे काम असेल तर त्याचे स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनीही सहमती दर्शवित वादळामुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती सदस्य, गट शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांकडून मागवून प्राधान्यक्रम ठरवावे व शिक्षण समितीच्या बैठकीत त्याची मान्यता घेऊन आठ दिवसांत आपल्याकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश दिले.शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी शाळा दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी प्राप्त झाला असल्याचे सांगून, २८ जून रोजी शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले. आंतरजिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीबाबत मनीषा पवार यांनी प्रश्न विचारून लवकरात लवकर शिक्षकांना नियुक्त्या देण्याची मागणी केली. त्यावर शासनाकडून नियुक्ती देण्याबाबत नवीन आदेश प्राप्त झाले असून, त्यानुसार येत्या सोमवारपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.शाळेसाठी शिक्षणमंत्र्यांना भेटणारकन्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू असले तरी, त्यासाठी शिक्षक मान्यता नाही. त्यामुळे नेहमीच या शाळेचा प्रश्न निर्माण होत असल्याबद्दल कुंभार्डे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर चार महिला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असली, त्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्र्माण होत असल्यामुळे शासनाकडे तसा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कन्या शाळा जिल्हा परिषदेसाठी आवश्यक असून, गरिबांची मुले येथे शिक्षण घेतात त्यामुळे प्रसंगी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याकडे बैठक घेण्यात येईल, असे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सांगितले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSchoolशाळा