शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ऐतिहासिक दुर्ग संवर्धनासाठी सरसावले युवक

By admin | Updated: July 4, 2014 00:12 IST

ऐतिहासिक दुर्ग संवर्धनासाठी सरसावले युवक

 

आनंद बोरा नाशिक, दि. ०३ - महाराष्ट्राच्या सामर्थ्यशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले ऐतिहासिक दुर्ग, गड संवर्धनासाठी नाशिक जिल्ह्यातील युवकांनी एकत्र येत सिन्नर-घोटी रस्त्यावरील टाकेद येथील शिवाजी महाराजांच्या विश्रामगड (पट्टागड) कि ल्लयावर श्रमदान करून दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानाच्या वतीने विविध गड, किल्लयांच्या संवर्धनासाठी व त्यांचे सौंदर्याची जोपासणा करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिवरायांचे नाशिक जिल्ह्यात बरेच किल्ले आहेत. शिवरायांचा इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांचे संवर्धन व्हावे भावी पिढीला प्रत्यक्ष किल्ले बघता यावे या उद्देशाने नाशिक जिल्ह्यातील युवक एकित्रत आले व त्यांनी ‘दुर्ग संवर्धन प्रतिष्ठाण’ची स्थापना केली. सिन्नर-घोटी रोड वरील टाके द गावातील ज्या ठिकाणी शिवाजी राजे महिनाभर विश्रांती साठी थांबले होते. त्या विश्रामगडावर श्रमदान करून स्थापना करण्यात आली. या गडावरील आठ ते दहा पाण्याच्या कुं ड स्वच्छ करण्यात आले या मोहिमेत विजयकुमार घोटे, पप्पू जगताप, सागर घोलप, मनोज पगारे, अजित जगताप,सागर बनकर, गणेश जाधव, दर्शन घुगे, आशिष बनकर, पंढरी जाधव, मुरलीधर मेंघाल, नामदेव जाधव,विकी गोसावी,मयूर शिंदे, मयूर तुपे, संदीप घोटे यांनी सहभाग घेतला. दरम्यान काही पर्यटकांनी त्यांच्या मोहिमेला हातभार लावला....असा आहे विश्रामगडया किल्ल्यावर जाण्यासाठी सिन्नर- ठाणगाव- वैतागवाडी-पट्टेवाडी या मार्गाने जाता येते. समुद्रसपाटी पासून हा किल्ला ४५६२ फुट उंचीवर आह.े विश्रामगडाच्या पायथ्याशी पटटेवाडी गाव आहे. त्यामुळे त्याला पट्टागड नाव पडले असावे. हा किल्ला लांब असून किल्ल्यावर गुहा आणि पाण्याच्या कुंड मोठ्या प्रमाणात आहे. गडाच्या पहिल्या टप्यात गड दैवत असलेले देवीचे मंदिर आहे. मंदिराजवळ पाण्याचे खोदीव टाके आहेत. किल्ल्याचे उत्तरद्वार आजही टिकून आहे. गडाच्या तटबंदी मोठया प्रमाणात पडझड झालेली दिसून येते. ...असा आहे इतिहासया किल्ल्याचा उल्लेख रामायणात देखील वाचायला मिळतो. सीता मातेला जेव्हा रावणाने पळविले तेव्हा त्याचा प्रतिकार जटायु ने केला होता यावेळी जटायू घायाळ होवून या ठिकाणी पडला होता. त्यावेळी राम लक्ष्मण त्यास सर्वतीर्थ टाकेद येथे भेटले. जटायूचे वास्तव्य याच किल्ल्यावर होते. तर शिवरायांचा इतिहासात डोकावले असता युद्धांमुळे राजे थकले होते बिहर्जी नाईक जाधव हा गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता त्यांनी राजेंना आडवाटेने पट्टे किल्ल्यावर आणले. या ठिकाणी राजे महिनाभर विश्रांतीला होते. म्हणून या किल्ल्याला विश्राम गड असे नाव पडले आहे. जेव्हा डोंगर बोलू लागतात...या पुस्तकात देखील या किल्लयाचा सखोल इतिहास वाचायला मिळतो.दुर्मिळ वृक्षसंपदेचे माहेरघरया किल्ल्यावर शेकडो प्रकारची वृक्ष बघावयास मिळतात. वन विभागाने वृक्षारोपण देखील केले आहे. या परिसरात करवंदे, शिकेकाई, वाघाटीचे प्रकार, हिंगण बेट, बेरंगी बाभूळ, काटेसावर, शतावरी, कोरपड, घायापात, सागवान, बिजा, हळदू, शिवन, कळम, शिसम,खैर, मोह असे अनेक वृक्ष येथे आहेत. प्राणवायू देणारे पिंपळ, कादंब, बांबू, जैविक इंधन देणारे करंज, कडूनिंब वातावरणातील प्रदूषण रोखणारया उंबर, सीताफळ,जांभूळ, सप्तपर्णी, मोह, निम, पुत्रंजीवा, आंबा, चारोळी, तामण, पळस अशी वृक्षसंपदा येथे बघावयास मिळते....अशी आहे गड-किल्यांची ऊंची* पट्टा किल्ला— ४५३२ फूट *कळसुबाई- ५४००फूट, *अलंग ४८५२ फूट, *मदनगड-४८२१ फूट,*कुलंग- ४८२२ फूट, *औंढा-४३२९ फूट, *हरिश्चंद गड ४६९१ फूट,*रतनगड ४२५५ फूट, *भैरवगड २८३५ फूट, *कुंजर- ३६७० फूट उंचीचा आहे.