शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

ऐतिहासिक दुर्ग संवर्धनासाठी सरसावले युवक

By admin | Updated: July 4, 2014 00:12 IST

ऐतिहासिक दुर्ग संवर्धनासाठी सरसावले युवक

 

आनंद बोरा नाशिक, दि. ०३ - महाराष्ट्राच्या सामर्थ्यशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले ऐतिहासिक दुर्ग, गड संवर्धनासाठी नाशिक जिल्ह्यातील युवकांनी एकत्र येत सिन्नर-घोटी रस्त्यावरील टाकेद येथील शिवाजी महाराजांच्या विश्रामगड (पट्टागड) कि ल्लयावर श्रमदान करून दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानाच्या वतीने विविध गड, किल्लयांच्या संवर्धनासाठी व त्यांचे सौंदर्याची जोपासणा करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिवरायांचे नाशिक जिल्ह्यात बरेच किल्ले आहेत. शिवरायांचा इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांचे संवर्धन व्हावे भावी पिढीला प्रत्यक्ष किल्ले बघता यावे या उद्देशाने नाशिक जिल्ह्यातील युवक एकित्रत आले व त्यांनी ‘दुर्ग संवर्धन प्रतिष्ठाण’ची स्थापना केली. सिन्नर-घोटी रोड वरील टाके द गावातील ज्या ठिकाणी शिवाजी राजे महिनाभर विश्रांती साठी थांबले होते. त्या विश्रामगडावर श्रमदान करून स्थापना करण्यात आली. या गडावरील आठ ते दहा पाण्याच्या कुं ड स्वच्छ करण्यात आले या मोहिमेत विजयकुमार घोटे, पप्पू जगताप, सागर घोलप, मनोज पगारे, अजित जगताप,सागर बनकर, गणेश जाधव, दर्शन घुगे, आशिष बनकर, पंढरी जाधव, मुरलीधर मेंघाल, नामदेव जाधव,विकी गोसावी,मयूर शिंदे, मयूर तुपे, संदीप घोटे यांनी सहभाग घेतला. दरम्यान काही पर्यटकांनी त्यांच्या मोहिमेला हातभार लावला....असा आहे विश्रामगडया किल्ल्यावर जाण्यासाठी सिन्नर- ठाणगाव- वैतागवाडी-पट्टेवाडी या मार्गाने जाता येते. समुद्रसपाटी पासून हा किल्ला ४५६२ फुट उंचीवर आह.े विश्रामगडाच्या पायथ्याशी पटटेवाडी गाव आहे. त्यामुळे त्याला पट्टागड नाव पडले असावे. हा किल्ला लांब असून किल्ल्यावर गुहा आणि पाण्याच्या कुंड मोठ्या प्रमाणात आहे. गडाच्या पहिल्या टप्यात गड दैवत असलेले देवीचे मंदिर आहे. मंदिराजवळ पाण्याचे खोदीव टाके आहेत. किल्ल्याचे उत्तरद्वार आजही टिकून आहे. गडाच्या तटबंदी मोठया प्रमाणात पडझड झालेली दिसून येते. ...असा आहे इतिहासया किल्ल्याचा उल्लेख रामायणात देखील वाचायला मिळतो. सीता मातेला जेव्हा रावणाने पळविले तेव्हा त्याचा प्रतिकार जटायु ने केला होता यावेळी जटायू घायाळ होवून या ठिकाणी पडला होता. त्यावेळी राम लक्ष्मण त्यास सर्वतीर्थ टाकेद येथे भेटले. जटायूचे वास्तव्य याच किल्ल्यावर होते. तर शिवरायांचा इतिहासात डोकावले असता युद्धांमुळे राजे थकले होते बिहर्जी नाईक जाधव हा गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता त्यांनी राजेंना आडवाटेने पट्टे किल्ल्यावर आणले. या ठिकाणी राजे महिनाभर विश्रांतीला होते. म्हणून या किल्ल्याला विश्राम गड असे नाव पडले आहे. जेव्हा डोंगर बोलू लागतात...या पुस्तकात देखील या किल्लयाचा सखोल इतिहास वाचायला मिळतो.दुर्मिळ वृक्षसंपदेचे माहेरघरया किल्ल्यावर शेकडो प्रकारची वृक्ष बघावयास मिळतात. वन विभागाने वृक्षारोपण देखील केले आहे. या परिसरात करवंदे, शिकेकाई, वाघाटीचे प्रकार, हिंगण बेट, बेरंगी बाभूळ, काटेसावर, शतावरी, कोरपड, घायापात, सागवान, बिजा, हळदू, शिवन, कळम, शिसम,खैर, मोह असे अनेक वृक्ष येथे आहेत. प्राणवायू देणारे पिंपळ, कादंब, बांबू, जैविक इंधन देणारे करंज, कडूनिंब वातावरणातील प्रदूषण रोखणारया उंबर, सीताफळ,जांभूळ, सप्तपर्णी, मोह, निम, पुत्रंजीवा, आंबा, चारोळी, तामण, पळस अशी वृक्षसंपदा येथे बघावयास मिळते....अशी आहे गड-किल्यांची ऊंची* पट्टा किल्ला— ४५३२ फूट *कळसुबाई- ५४००फूट, *अलंग ४८५२ फूट, *मदनगड-४८२१ फूट,*कुलंग- ४८२२ फूट, *औंढा-४३२९ फूट, *हरिश्चंद गड ४६९१ फूट,*रतनगड ४२५५ फूट, *भैरवगड २८३५ फूट, *कुंजर- ३६७० फूट उंचीचा आहे.