शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून नाशिकला युवा शेतक-याने रेल्वे रुळावर संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 21:53 IST

या कर्जबाजारीपणाला कंटाळून आलेल्या नैराश्यापोटी नाशिकमधील भगूर गावात राहणारे जगदीश बहिरू शिरसाठ (३७) या युवा शेतक-याने सोमवारी रेल्वे रुळावर आत्महत्त्या केल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देआत्महत्त्यापुर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याने खळबळसरकारकडून कुठलीही आश्वासने पुर्ण केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तवनाशिकमधील भगूर गावात राहणारे जगदीश बहिरू शिरसाठ (३७) या युवा शेतक-याने आत्महत्त्या केल्याचे समोर आले

नाशिक : शेती पिकविण्यासाठी घेतलेले कर्ज फेडताना आलेल्या नैराश्यातून नाशिकमधील भगूर गावातील युवा शेतक-याने रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेपुढे जीवनयात्रा संपविली; तत्पुर्वी त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याने खळबळ उडाली आहे.सत्ताधारी भाजपाच्या फडणवीस सरकारने शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा काही महिन्यांपुर्वी केली; मात्र त्याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. शेतक-यांच्या राज्यातील आत्महत्त्या रोखण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात आली आहे, असेही सरकारी दरबारातून वारंवार सांगितले गेले; मात्र प्रत्यक्षात शेतक-याच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी होण्यास सरकारकडून कुठलीही आश्वासने पुर्ण केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. या कर्जबाजारीपणाला कंटाळून आलेल्या नैराश्यापोटी नाशिकमधील भगूर गावात राहणारे जगदीश बहिरू शिरसाठ (३७) या युवा शेतक-याने सोमवारी रेल्वे रुळावर आत्महत्त्या केल्याचे समोर आले आहे.

नाशिक जिल्हा हा बागायती जिल्हा म्हणून ओळखला जातो; मात्र या जिल्हयतही शेतक-यांच्या आत्महत्त्येचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. एकूणच शेतक-यांच्या आत्महत्त्या हा गंभीर प्रश्न बनत चालला असून राज्य सरकारने यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.

शिरसाठ यांच्यावर कर्जाचा बोझा होता. त्यांना पीक कर्जाच्या अनुदानाची रक्कम बॅँकेतून मिळाली नाही. असे त्यांनी चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. चिठ्ठीमधील त्यांच्या व्यथ्या त्यांच्याच शब्दांत ‘‘बॅँकेकडून पुढील आठवड्यापासून रक्कम मिळण्यास सुरूवात होईल, असे सांगण्यात आले.  आपल्या शेतीवर ९५ हजार रुपये कर्ज आहे. नैसर्गिक आपत्तीतून सावरु देत नाही आणि कर्जामुळे अडचणीत सापडलो आहे. त्यामुळे मी आत्त्महत्त्या करीत आहे, मला कोणीही आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त केलेले नाही. सदर माझी पत्नी सुरेखा हिस न्याय मिळावा... आपला शेतकरी, जगदीश बहिरु शिरसाठ’’

 

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याNashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसagricultureशेती