शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून नाशिकला युवा शेतक-याने रेल्वे रुळावर संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 21:53 IST

या कर्जबाजारीपणाला कंटाळून आलेल्या नैराश्यापोटी नाशिकमधील भगूर गावात राहणारे जगदीश बहिरू शिरसाठ (३७) या युवा शेतक-याने सोमवारी रेल्वे रुळावर आत्महत्त्या केल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देआत्महत्त्यापुर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याने खळबळसरकारकडून कुठलीही आश्वासने पुर्ण केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तवनाशिकमधील भगूर गावात राहणारे जगदीश बहिरू शिरसाठ (३७) या युवा शेतक-याने आत्महत्त्या केल्याचे समोर आले

नाशिक : शेती पिकविण्यासाठी घेतलेले कर्ज फेडताना आलेल्या नैराश्यातून नाशिकमधील भगूर गावातील युवा शेतक-याने रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेपुढे जीवनयात्रा संपविली; तत्पुर्वी त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याने खळबळ उडाली आहे.सत्ताधारी भाजपाच्या फडणवीस सरकारने शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा काही महिन्यांपुर्वी केली; मात्र त्याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. शेतक-यांच्या राज्यातील आत्महत्त्या रोखण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात आली आहे, असेही सरकारी दरबारातून वारंवार सांगितले गेले; मात्र प्रत्यक्षात शेतक-याच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी होण्यास सरकारकडून कुठलीही आश्वासने पुर्ण केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. या कर्जबाजारीपणाला कंटाळून आलेल्या नैराश्यापोटी नाशिकमधील भगूर गावात राहणारे जगदीश बहिरू शिरसाठ (३७) या युवा शेतक-याने सोमवारी रेल्वे रुळावर आत्महत्त्या केल्याचे समोर आले आहे.

नाशिक जिल्हा हा बागायती जिल्हा म्हणून ओळखला जातो; मात्र या जिल्हयतही शेतक-यांच्या आत्महत्त्येचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. एकूणच शेतक-यांच्या आत्महत्त्या हा गंभीर प्रश्न बनत चालला असून राज्य सरकारने यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.

शिरसाठ यांच्यावर कर्जाचा बोझा होता. त्यांना पीक कर्जाच्या अनुदानाची रक्कम बॅँकेतून मिळाली नाही. असे त्यांनी चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. चिठ्ठीमधील त्यांच्या व्यथ्या त्यांच्याच शब्दांत ‘‘बॅँकेकडून पुढील आठवड्यापासून रक्कम मिळण्यास सुरूवात होईल, असे सांगण्यात आले.  आपल्या शेतीवर ९५ हजार रुपये कर्ज आहे. नैसर्गिक आपत्तीतून सावरु देत नाही आणि कर्जामुळे अडचणीत सापडलो आहे. त्यामुळे मी आत्त्महत्त्या करीत आहे, मला कोणीही आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त केलेले नाही. सदर माझी पत्नी सुरेखा हिस न्याय मिळावा... आपला शेतकरी, जगदीश बहिरु शिरसाठ’’

 

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याNashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसagricultureशेती