शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

कुऱ्हेगावजवळ दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 15:49 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अस्वली - गोंदे दुमालाकडे जाणाऱ्या कुऱ्हेगावजवळील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा एका रेल्वे कर्मचाऱ्याची दुचाकी घसरून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १) रोजी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या धोकादायक वळणाने घेतलेला हा पाचवा बळी आहे. संबंधित विभागाने या वळणदार रस्त्याची दुरूस्ती करून या ठिकाणी अपघात होणार नाही, अशी सोय करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देधोकादायक वळणाने घेतला पुन्हा बळी : वळणरस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अस्वली - गोंदे दुमालाकडे जाणाऱ्या कुऱ्हेगावजवळील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा एका रेल्वे कर्मचाऱ्याची दुचाकी घसरून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १) रोजी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या धोकादायक वळणाने घेतलेला हा पाचवा बळी आहे. संबंधित विभागाने या वळणदार रस्त्याची दुरूस्ती करून या ठिकाणी अपघात होणार नाही, अशी सोय करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथून अस्वलीकडे जाणाऱ्या कुऱ्हेगावजवळ असलेल्या धोकादायक वळणावर अस्वली स्टेशन येथील रेल्वे कर्मचारी भरत गणेश माथे (२२, ह. मु. अस्वली स्टेशन) हे दुचाकीने (एमएच १५ एचई ८३९१) घरी जात होते. मात्र, समोरील वळणदार रस्ता असल्यामुळे त्यांचा घसरून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी खांदवे व अन्य कर्मचारी यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.अपघाती जागाकुऱ्हेगाव येथील या वळणदार रस्त्यावर यापूर्वीदेखील चार व्यक्तिंना आपले प्राण गमवावे लागले असून, वारंवार या वळणाच्या ठिकाणी अपघात होत असतात. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर वळणदार रस्त्याची दुरूस्ती करून मार्ग काढावा, अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.गोंदे दुमाला ते अस्वली या रस्त्यावरून कामगारवर्ग, दुग्ध व्यावसायिक व शेतकरी यांची वर्दळ असल्याने या रस्त्याची दुरूस्ती करून धोकादायक वळणदार रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे. तसेच हा वळणदार असलेला रस्ता सरळ करण्यात यावा व या रस्त्यावर पथदीपांची सोय करण्यात यावी. यामुळे रात्री - अपरात्री मार्गक्रमण करणाऱ्या कामगारांना दिलासा मिळेल व अपघातांना आळा बसेल.- अंबादास धोंगडे, शिवसेना गणप्रमुख, वाडिवऱ्हे. 

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात