शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जणू आपोआप ‘जॅमर’ : ‘नेटवर्क ’साठी डिजीपीनगरवासीयांची अंगणात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 14:36 IST

डीजीपीनगर क्रमांक-१ हा परिसर दुर्गम किंवा आदिवासी भागातील नाही तर जिल्हा परिषद कर्मचा-यांची सर्वात जुनी वसाहत व महापालिकेच्या आरोग्य सभापतींचे निवासस्थान असलेल्या हा परिसर नाशिक-पुणे महामार्गाला लागून आहे.

ठळक मुद्देमोबाईल कंपन्यांकडून नेटवर्क अत्यंत कमकुवत नेटवर्कला जणू आपोआप ‘जॅमर’ लागतो अशोकामार्गावरही समस्या नेमके कोणत्या कंपनीमध्ये पोर्टेबिलिटी करावी, हा रहिवाशांपुढे यक्ष प्रश्न

नाशिक : माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मेक इन इंडियाचे स्वप्न बघितले जात असताना स्मार्टफोन वापरणाऱ्या शहरातील चक्क डीजीपीनगर क्रमांक-१ मधील रहिवाशांना मात्र ‘नेटवर्क’ मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यावर बसून रहिवाशी नेटवर्कची प्रतीक्षा करतानाचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. मोबाईल नेटवर्क पुरविणा-या सर्वच कंपन्यांच्या नावाने या भागात मोठी ओरड होत आहे.डीजीपीनगर क्रमांक-१ हा परिसर दुर्गम किंवा आदिवासी भागातील नाही तर जिल्हा परिषद कर्मचा-यांची सर्वात जुनी वसाहत व महापालिकेच्या आरोग्य सभापतींचे निवासस्थान असलेल्या हा परिसर नाशिक-पुणे महामार्गाला लागून आहे. डीजीपीनगर गृहनिर्माण संस्था ही सर्वात जुनी गृहनिर्माण संस्था म्हणून ओळखली जाते. या भागात मोबाईल कंपन्यांकडून नेटवर्क अत्यंत कमकुवतरित्या पुरविले जात असल्याने नागरिकांच्या नाकीनव आले आहे. याचा सर्वाधिक त्रास गृहिणींना सहन करावा लागत आहे. डीजीपीनगरच्या घरांमध्ये कुठल्याही कंपनीचे नेटवर्क अजिबात मिळत नाही. त्यामुळे जोपर्यंत उंबरा ओलांडून बाहेर येणार नाही, तोपर्यंत मोबाईल कंपन्यांचे नेटवर्कचे चिन्ह दिसत नाही. तुमचा स्मार्टफोन कितीही महागडा जरी असला व लेटेस्ट सिस्टम अपडेट वर्जन जरी असले तरी डीजीपीनगरमध्ये प्रवेश करताच जणू तुमच्या स्मार्टफोनच्या नेटवर्कला जणू आपोआप ‘जॅमर’ लागतो. मागील काही महिन्यांपासून ही समस्या मोठ्या स्वरुपात भेडसावत असल्याने डीजीपीनगरवासी त्रस्त झाले आहे.ज्या कंपनीचे सिमकार्ड वापरले जात आहेत, त्या कंपनीच्या ग्राहक सेवाअधिका-यांशी वारंवार संपर्क साधून रहिवाशांनी ही समस्या निदर्शनास आणून दिली आहे; मात्र कुठल्याही कंपनीकडून या समस्येवर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नसल्याचे नागरिका सांगतात. एकूणच स्मार्टफोनवर संवाद साधणे डीजीपीनगरमधून जिकरीचे ठरत असल्यामुळे इंटरनेट वापर व त्यासाठी लागणारा ‘डेटा स्पीड’बाबत कल्पना न केलेली बरी.‘...अहो तुमचा फोनच लवकर लागत नाही’डीजीपीनगरवासीयांच्या कानी सध्या त्यांचे मित्र परिवार नातेवाईकांचे एकच वाक्य मागील काही दिवसांपासून पडत आहे. ते म्हणजे, ‘अहो, तुमचा फोनच लवकर लागत नाही’ हे वाक्य ऐकून येथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. जोपर्यंत मोबाईल घराच्या खिडकीमध्ये किंवा अंगणात घेऊन येत नाही, तोपर्यंत मोबाईलला रेंज येत नाही आणि संपर्कही होत नाही. मागील महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून ही समस्या गंभीर बनली आहे.---अशोकामार्गावरही समस्याडीजीपीनगर क्रमांक-१पासून जवळ असलेल्या श्री.श्री.रविशंकर मार्गालगतच्या अशोका मार्ग परिसरातील घरांमध्येही मोबाईल नेटवर्कची समस्या मागील काही महिन्यांपासून प्रचंड भेडसावत असल्याने येथील नागरिकही वैतागले आहेत. नेमके कोणत्या कंपनीमध्ये पोर्टेबिलिटी करावी, हा येथील रहिवाशांपुढे सध्याचा यक्ष प्रश्न आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही. अशोका मार्ग हा उच्चभ्रू वसाहत म्हणून उदयास आलेला परिसर आहे. या भागात मोठ्या संख्येने घरगुती प्रकल्प व रहिवाशी अपार्टमेंट आहेत. येथील फ्लॅटमध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पैसे भरुनही मोबाईल कं पन्यांकडून गलथान सेवा दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :NashikनाशिकMobileमोबाइल