शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
3
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
4
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
5
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
6
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
7
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
8
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
9
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
10
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
11
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
12
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
13
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
14
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
15
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
16
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
17
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
18
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
19
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
20
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले

गावगाड्याच्या राजकारणाची तरुणांना क्रेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 18:10 IST

सायखेडा : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू झाली आहे. प्रशासकीय कामकाज सुरु झाले आहे.

ठळक मुद्देपुढाऱ्यांची कसब पणाला : निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न हवेत

सायखेडा : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू झाली आहे. प्रशासकीय कामकाज सुरु झाले आहे.गावगाड्याच्या निवडणुकीत यंदा तरुणांची वाढती क्रेज पाहता निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे, मात्र कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे विस्कटलेली आर्थिक घडी लक्षात घेता निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे, मात्र तरुणाचा वाढता सहभाग आणि पक्षीय राजकारण यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा जोरदार धुरळाधुरळा उडणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ग्रामपंचायत ही ग्रामविकासाचा कणा मानला जातो अलीकडे १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होतो. शिवाय इतर विकास योजनेअंतर्गत लाखो रुपये येतात असतात त्यामुळे स्थानिक विकास योजनेत सरपंचपदाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे तरुण आकर्षित झाले असून जुन्या गाव पुढाऱ्यांना दूर सारून तरुण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र गावागावात दिसत आहे.निवडणुका झाल्या खर्चिकविधानसभा व लोकसभा निवडणुकीतील वाढता खर्च आत्ता ग्रामपंचायत निवडणुकीत जाचक ठरणार आहे. तालुक्यातील निवडणुकीतील कोटींच्या उलाढालीमुळे कार्यकर्त्याना लागलेली सवय आणि मतदारांचा वाढता खर्च ग्रामपंचायत निवडुकीत महाग ठरणार आहे.काही ग्रामपंचायतमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडुकीला लाजवेल इतका खर्च केला जातो सदस्य होण्यासाठी दहा लाख रुपये खर्च झाल्याची चर्चा निवडणुकी नंतर रंगलेली आहे त्यामुळे यंदाच्या निवडुकीत वारेमाप खर्च आणि उधळ पट्टी होणार आहेकोरोनामुळे आर्थिक संकटग्रामीण भागाचा विचार केला असता निफाड तालुका कोरोणाचा हॉस्पॉट ठरला होता यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आणि व्यवसाय मोडकळीला आले. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. ग्रामपंचायत स्तरावर अद्यापही करांच्या वसुलीला वेग आला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा फटका निवडणुकीत पाहायला असा अंदाज व्यक्त केला जात आहे.निवडणुका बिनविरोधसाठी प्रयत्न व्हावेग्रामपंचायतीचे सरपंचपद मिळवण्यासाठी अनेकदा आटापिटा केला जातो. सदस्यांची गोळाबेरीज करताना लाखो रुपये खर्च होतो. ग्रामीण विकासाचे सर्वोच्च मानाचे पद आरक्षित असल्यास उपसरपंच गावाचा गाडा हाकताना दिसतात. अनेक ठिकाणी सरपंच सदस्यांना विश्वासात न घेता कामकाजाचा गाव गाडा हाकतात. त्यामुळे गावातील निवडणूक विश्वासात घेऊन बिनविरोध होण्याची गरज आहे.

पुढाऱ्यांचा वाढता हस्तक्षेप...ज्या पक्षाकडे सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात असतात अशा पक्षाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात अधिक बळ मिळत असते. यामुळे तालुक्यातील पक्षीय पुढार्‍यांनी अलीकडे ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातल्याने निवडणुका चुरशीचा होत असतात अनेक ठिकाणी रसद देखील पुरवली जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील पुढाऱ्यांचा हस्तक्षेप कमी व्हावा अशी मागणी होत आहे.अनेक ग्रामपंचायत निवडणुका पहात आलो आहे .अलीकडील काळातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि खर्चिक होत आहे. त्यामुळे गावातील लाखो रुपये खर्च वाया जातो. गावातील जाणकारांनी पुढे येऊन निवडणुका बिनविरोध करणे काळाची गरज आहे.- राजेंद्र मोगल, माजी सभापती, जिल्हा परिषद, नाशिक.ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील गावकी, भावकी आणि पक्षीय राजकारण या गोष्टी अडसर ठरतात. परंतु विकासाचा विचार करता तरुणांनी एकत्र निवडणुका बिनविरोध करणे काळाची गरज आहे- भाऊसाहेब कमानकर, माजी उपसरपंच, भेंडाळी.गेल्या काही वर्षापासून ग्रामपंचायत निवडणुकामध्ये खर्च करण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेतून विरोधक तयार होत आहे. इर्षा आणि संघर्ष यातून कौटुंबिक कलह निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळते, त्यामुळे निवडणुका बिनविरोध काळाची गरज आहे.- धोंडीराम रायते, उपसरपंच, शिंगवे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक