शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

गावगाड्याच्या राजकारणाची तरुणांना क्रेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 18:10 IST

सायखेडा : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू झाली आहे. प्रशासकीय कामकाज सुरु झाले आहे.

ठळक मुद्देपुढाऱ्यांची कसब पणाला : निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न हवेत

सायखेडा : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू झाली आहे. प्रशासकीय कामकाज सुरु झाले आहे.गावगाड्याच्या निवडणुकीत यंदा तरुणांची वाढती क्रेज पाहता निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे, मात्र कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे विस्कटलेली आर्थिक घडी लक्षात घेता निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे, मात्र तरुणाचा वाढता सहभाग आणि पक्षीय राजकारण यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा जोरदार धुरळाधुरळा उडणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ग्रामपंचायत ही ग्रामविकासाचा कणा मानला जातो अलीकडे १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होतो. शिवाय इतर विकास योजनेअंतर्गत लाखो रुपये येतात असतात त्यामुळे स्थानिक विकास योजनेत सरपंचपदाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे तरुण आकर्षित झाले असून जुन्या गाव पुढाऱ्यांना दूर सारून तरुण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र गावागावात दिसत आहे.निवडणुका झाल्या खर्चिकविधानसभा व लोकसभा निवडणुकीतील वाढता खर्च आत्ता ग्रामपंचायत निवडणुकीत जाचक ठरणार आहे. तालुक्यातील निवडणुकीतील कोटींच्या उलाढालीमुळे कार्यकर्त्याना लागलेली सवय आणि मतदारांचा वाढता खर्च ग्रामपंचायत निवडुकीत महाग ठरणार आहे.काही ग्रामपंचायतमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडुकीला लाजवेल इतका खर्च केला जातो सदस्य होण्यासाठी दहा लाख रुपये खर्च झाल्याची चर्चा निवडणुकी नंतर रंगलेली आहे त्यामुळे यंदाच्या निवडुकीत वारेमाप खर्च आणि उधळ पट्टी होणार आहेकोरोनामुळे आर्थिक संकटग्रामीण भागाचा विचार केला असता निफाड तालुका कोरोणाचा हॉस्पॉट ठरला होता यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आणि व्यवसाय मोडकळीला आले. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. ग्रामपंचायत स्तरावर अद्यापही करांच्या वसुलीला वेग आला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा फटका निवडणुकीत पाहायला असा अंदाज व्यक्त केला जात आहे.निवडणुका बिनविरोधसाठी प्रयत्न व्हावेग्रामपंचायतीचे सरपंचपद मिळवण्यासाठी अनेकदा आटापिटा केला जातो. सदस्यांची गोळाबेरीज करताना लाखो रुपये खर्च होतो. ग्रामीण विकासाचे सर्वोच्च मानाचे पद आरक्षित असल्यास उपसरपंच गावाचा गाडा हाकताना दिसतात. अनेक ठिकाणी सरपंच सदस्यांना विश्वासात न घेता कामकाजाचा गाव गाडा हाकतात. त्यामुळे गावातील निवडणूक विश्वासात घेऊन बिनविरोध होण्याची गरज आहे.

पुढाऱ्यांचा वाढता हस्तक्षेप...ज्या पक्षाकडे सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात असतात अशा पक्षाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात अधिक बळ मिळत असते. यामुळे तालुक्यातील पक्षीय पुढार्‍यांनी अलीकडे ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातल्याने निवडणुका चुरशीचा होत असतात अनेक ठिकाणी रसद देखील पुरवली जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील पुढाऱ्यांचा हस्तक्षेप कमी व्हावा अशी मागणी होत आहे.अनेक ग्रामपंचायत निवडणुका पहात आलो आहे .अलीकडील काळातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि खर्चिक होत आहे. त्यामुळे गावातील लाखो रुपये खर्च वाया जातो. गावातील जाणकारांनी पुढे येऊन निवडणुका बिनविरोध करणे काळाची गरज आहे.- राजेंद्र मोगल, माजी सभापती, जिल्हा परिषद, नाशिक.ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील गावकी, भावकी आणि पक्षीय राजकारण या गोष्टी अडसर ठरतात. परंतु विकासाचा विचार करता तरुणांनी एकत्र निवडणुका बिनविरोध करणे काळाची गरज आहे- भाऊसाहेब कमानकर, माजी उपसरपंच, भेंडाळी.गेल्या काही वर्षापासून ग्रामपंचायत निवडणुकामध्ये खर्च करण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेतून विरोधक तयार होत आहे. इर्षा आणि संघर्ष यातून कौटुंबिक कलह निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळते, त्यामुळे निवडणुका बिनविरोध काळाची गरज आहे.- धोंडीराम रायते, उपसरपंच, शिंगवे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक