शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गावगाड्याच्या राजकारणाची तरुणांना क्रेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 18:10 IST

सायखेडा : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू झाली आहे. प्रशासकीय कामकाज सुरु झाले आहे.

ठळक मुद्देपुढाऱ्यांची कसब पणाला : निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न हवेत

सायखेडा : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू झाली आहे. प्रशासकीय कामकाज सुरु झाले आहे.गावगाड्याच्या निवडणुकीत यंदा तरुणांची वाढती क्रेज पाहता निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे, मात्र कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे विस्कटलेली आर्थिक घडी लक्षात घेता निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे, मात्र तरुणाचा वाढता सहभाग आणि पक्षीय राजकारण यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा जोरदार धुरळाधुरळा उडणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ग्रामपंचायत ही ग्रामविकासाचा कणा मानला जातो अलीकडे १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होतो. शिवाय इतर विकास योजनेअंतर्गत लाखो रुपये येतात असतात त्यामुळे स्थानिक विकास योजनेत सरपंचपदाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे तरुण आकर्षित झाले असून जुन्या गाव पुढाऱ्यांना दूर सारून तरुण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र गावागावात दिसत आहे.निवडणुका झाल्या खर्चिकविधानसभा व लोकसभा निवडणुकीतील वाढता खर्च आत्ता ग्रामपंचायत निवडणुकीत जाचक ठरणार आहे. तालुक्यातील निवडणुकीतील कोटींच्या उलाढालीमुळे कार्यकर्त्याना लागलेली सवय आणि मतदारांचा वाढता खर्च ग्रामपंचायत निवडुकीत महाग ठरणार आहे.काही ग्रामपंचायतमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडुकीला लाजवेल इतका खर्च केला जातो सदस्य होण्यासाठी दहा लाख रुपये खर्च झाल्याची चर्चा निवडणुकी नंतर रंगलेली आहे त्यामुळे यंदाच्या निवडुकीत वारेमाप खर्च आणि उधळ पट्टी होणार आहेकोरोनामुळे आर्थिक संकटग्रामीण भागाचा विचार केला असता निफाड तालुका कोरोणाचा हॉस्पॉट ठरला होता यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आणि व्यवसाय मोडकळीला आले. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. ग्रामपंचायत स्तरावर अद्यापही करांच्या वसुलीला वेग आला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा फटका निवडणुकीत पाहायला असा अंदाज व्यक्त केला जात आहे.निवडणुका बिनविरोधसाठी प्रयत्न व्हावेग्रामपंचायतीचे सरपंचपद मिळवण्यासाठी अनेकदा आटापिटा केला जातो. सदस्यांची गोळाबेरीज करताना लाखो रुपये खर्च होतो. ग्रामीण विकासाचे सर्वोच्च मानाचे पद आरक्षित असल्यास उपसरपंच गावाचा गाडा हाकताना दिसतात. अनेक ठिकाणी सरपंच सदस्यांना विश्वासात न घेता कामकाजाचा गाव गाडा हाकतात. त्यामुळे गावातील निवडणूक विश्वासात घेऊन बिनविरोध होण्याची गरज आहे.

पुढाऱ्यांचा वाढता हस्तक्षेप...ज्या पक्षाकडे सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात असतात अशा पक्षाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात अधिक बळ मिळत असते. यामुळे तालुक्यातील पक्षीय पुढार्‍यांनी अलीकडे ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातल्याने निवडणुका चुरशीचा होत असतात अनेक ठिकाणी रसद देखील पुरवली जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील पुढाऱ्यांचा हस्तक्षेप कमी व्हावा अशी मागणी होत आहे.अनेक ग्रामपंचायत निवडणुका पहात आलो आहे .अलीकडील काळातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि खर्चिक होत आहे. त्यामुळे गावातील लाखो रुपये खर्च वाया जातो. गावातील जाणकारांनी पुढे येऊन निवडणुका बिनविरोध करणे काळाची गरज आहे.- राजेंद्र मोगल, माजी सभापती, जिल्हा परिषद, नाशिक.ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील गावकी, भावकी आणि पक्षीय राजकारण या गोष्टी अडसर ठरतात. परंतु विकासाचा विचार करता तरुणांनी एकत्र निवडणुका बिनविरोध करणे काळाची गरज आहे- भाऊसाहेब कमानकर, माजी उपसरपंच, भेंडाळी.गेल्या काही वर्षापासून ग्रामपंचायत निवडणुकामध्ये खर्च करण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेतून विरोधक तयार होत आहे. इर्षा आणि संघर्ष यातून कौटुंबिक कलह निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळते, त्यामुळे निवडणुका बिनविरोध काळाची गरज आहे.- धोंडीराम रायते, उपसरपंच, शिंगवे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक