शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

वीज कोसळून आंबेवाडीत तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:33 IST

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदलेल्या मान्सूनपूर्व वातावरणामुळे वादळी वारा, वीज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील दशरथ धोंडू ढवळे हा २७ वर्षांचा तरुण जागीच ठार झाला. जिल्ह्यातील अन्य भागात वादळी पावसामुळे पोल्ट्री फार्म, जनावरांचे गोठे, घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले, शिवाय ठिकठिकाणी वीज कोसळण्याची घटना घडल्याने जनावरे दगावली आहेत. प्रशासनाने महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदलेल्या मान्सूनपूर्व वातावरणामुळे वादळी वारा, वीज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील दशरथ धोंडू ढवळे हा २७ वर्षांचा तरुण जागीच ठार झाला. जिल्ह्यातील अन्य भागात वादळी पावसामुळे पोल्ट्री फार्म, जनावरांचे गोठे, घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले, शिवाय ठिकठिकाणी वीज कोसळण्याची घटना घडल्याने जनावरे दगावली आहेत. प्रशासनाने महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे.शुक्रवारी दुपारनंतर सिन्नर, वावी, येवला तालुक्यात पावसाने धूळधाण उडवली. वादळी वारा व विजेचा कडकडाट करीत कोसळलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. सिन्नर तालुक्यातील शहा येथे ३२ घरांची पडझड होऊन ग्रामपंचायतीचे सभागृहाचे तसेच दोन कांदा चाळीचे शेड उडून गेले.देवपूर येथे २१ घरांची किरकोळ पडझड झाली व वीज कोसळून एक बैल व दोन वासरू मयत झाले. चार पोल्ट्री शेड जोरदार वादळात जमीनदोस्त झाले. वावी येथेही २६ घरांची किरकोळ पडझड तर नांदूरशिंगोटे येथे २२ घरांची पडझड व ४ कांदा चाळीचे नुकसान झाले. पांढुर्ली येथे १५ घरे व १४ गोठ्यांची पडझड तर ७ शेडनेटचे नुकसान झाले. सिन्नर तालुक्यात शनिवारी दुसºया दिवशीही पाऊस व वादळी वाºयाने धुळवड येथील ७ ते ८ घरांचे नुकसान झाले तसेच निवृत्ती रामनाथ आव्हाड यांचे घर कोसळून घरातील चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ संगमनेर येथे दाखल करण्यात आले आहे. बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथे वीज पडून शेतात बांधून ठेवलेला गोºहा मयत झाला तर रातीर येथे पाचटाचे झाप असलेल्या घरावर वीज कोसळून घराला आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कळवण तालुक्यातील देवळी वणी आणि बिलवाडी गावात वादळी वाºयाने १० ते १५ घरांचे नुकसान झाले तसेच गावातील विजेचा खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. निफाड तालुक्यातील सोनगाव येथे वीज पडून शिवनाथ त्र्यंबक गावले यांची गाय मयत झाली तर वाकद येथे सखूबाई ज्ञानदेव गागरे यांचे पोल्ट्रीचे शेड वादळी वाºयात उडून गेले.(जोड आहे)जवान ठारइगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारात विजेचा कडकडाट करीत पावसाने हजेरी लावली. घराकडे परतणारा दशरथ धोंडू ढवळे (२७) हा तरुण झाडाखाली उभा असताना अंगावर वीज कोसळून तो जागीच ठार झाला. मयत दशरथ हा मुंबई महापालिकेच्या अग्रिशामक दलात नोकरीस होता. सुटीनिमित्त तो गावी परतला होता. त्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातNatural Calamityनैसर्गिक आपत्ती