शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

वीज कोसळून आंबेवाडीत तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:33 IST

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदलेल्या मान्सूनपूर्व वातावरणामुळे वादळी वारा, वीज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील दशरथ धोंडू ढवळे हा २७ वर्षांचा तरुण जागीच ठार झाला. जिल्ह्यातील अन्य भागात वादळी पावसामुळे पोल्ट्री फार्म, जनावरांचे गोठे, घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले, शिवाय ठिकठिकाणी वीज कोसळण्याची घटना घडल्याने जनावरे दगावली आहेत. प्रशासनाने महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदलेल्या मान्सूनपूर्व वातावरणामुळे वादळी वारा, वीज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील दशरथ धोंडू ढवळे हा २७ वर्षांचा तरुण जागीच ठार झाला. जिल्ह्यातील अन्य भागात वादळी पावसामुळे पोल्ट्री फार्म, जनावरांचे गोठे, घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले, शिवाय ठिकठिकाणी वीज कोसळण्याची घटना घडल्याने जनावरे दगावली आहेत. प्रशासनाने महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे.शुक्रवारी दुपारनंतर सिन्नर, वावी, येवला तालुक्यात पावसाने धूळधाण उडवली. वादळी वारा व विजेचा कडकडाट करीत कोसळलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. सिन्नर तालुक्यातील शहा येथे ३२ घरांची पडझड होऊन ग्रामपंचायतीचे सभागृहाचे तसेच दोन कांदा चाळीचे शेड उडून गेले.देवपूर येथे २१ घरांची किरकोळ पडझड झाली व वीज कोसळून एक बैल व दोन वासरू मयत झाले. चार पोल्ट्री शेड जोरदार वादळात जमीनदोस्त झाले. वावी येथेही २६ घरांची किरकोळ पडझड तर नांदूरशिंगोटे येथे २२ घरांची पडझड व ४ कांदा चाळीचे नुकसान झाले. पांढुर्ली येथे १५ घरे व १४ गोठ्यांची पडझड तर ७ शेडनेटचे नुकसान झाले. सिन्नर तालुक्यात शनिवारी दुसºया दिवशीही पाऊस व वादळी वाºयाने धुळवड येथील ७ ते ८ घरांचे नुकसान झाले तसेच निवृत्ती रामनाथ आव्हाड यांचे घर कोसळून घरातील चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ संगमनेर येथे दाखल करण्यात आले आहे. बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथे वीज पडून शेतात बांधून ठेवलेला गोºहा मयत झाला तर रातीर येथे पाचटाचे झाप असलेल्या घरावर वीज कोसळून घराला आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कळवण तालुक्यातील देवळी वणी आणि बिलवाडी गावात वादळी वाºयाने १० ते १५ घरांचे नुकसान झाले तसेच गावातील विजेचा खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. निफाड तालुक्यातील सोनगाव येथे वीज पडून शिवनाथ त्र्यंबक गावले यांची गाय मयत झाली तर वाकद येथे सखूबाई ज्ञानदेव गागरे यांचे पोल्ट्रीचे शेड वादळी वाºयात उडून गेले.(जोड आहे)जवान ठारइगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारात विजेचा कडकडाट करीत पावसाने हजेरी लावली. घराकडे परतणारा दशरथ धोंडू ढवळे (२७) हा तरुण झाडाखाली उभा असताना अंगावर वीज कोसळून तो जागीच ठार झाला. मयत दशरथ हा मुंबई महापालिकेच्या अग्रिशामक दलात नोकरीस होता. सुटीनिमित्त तो गावी परतला होता. त्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातNatural Calamityनैसर्गिक आपत्ती