शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

दहा गुंठे मिरचीतून दीड लाखाचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:35 AM

बदलत्या काळात कृषीक्षेत्राची वेगाने प्रगती होत आहे. या व्यवसायात अनेक  सकारात्मक बदलही होत आहेत. त्र्यंबकेश्वरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. अनेक शेतकरी त्यात यशस्वीही होऊ लागले आहेत.

ठळक मुद्दे तळवाडे गावातील शेतकरी तानाजी बोडकेचा दहा गुंठे शेतीत वेगळा प्रयोग मिरचीला ३० रूपये प्रतिकिलो बाजारभाव ; तब्बल एक लाख ६६ हजारांचे उत्पन्न शेतीला माहिती तंत्रज्ञानाची जोड दिल्यास दहा गुंठ्यातील मिरचीही चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते

वसंत तिवडेबदलत्या काळात कृषीक्षेत्राची वेगाने प्रगती होत आहे. या व्यवसायात अनेक  सकारात्मक बदलही होत आहेत. त्र्यंबकेश्वरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. अनेक शेतकरी त्यात यशस्वीही होऊ लागले आहेत.तालुक्यातील तळवाडे गावातील शेतकरी तानाजी शांताराम बोडके यांनी आपल्या दहा गुंठे शेतीत असाच वेगळा प्रयोग करलन परिश्रमाला आधुनिकतेची जोड देऊन मिरचीच्या उत्पादनातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.  शेतकरी तानाजी बोडके यांनी अवघ्या १० गुंठे क्षेत्रात एका सिडस कंपनीचे प्रतिनिधी किरण मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस्टॉन मिरचीची लागवड केली. ६ महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या या मिरचीला ३० रूपये प्रतिकिलो या प्रमाणे बाजारभाव मिळून त्यांनी तब्बल एक लाख ६६ हजारांचे उत्पन्न घेतले. उत्पन्नात अजूनही वाढ होण्याची अपेक्षा आहे. जैविक औषधांची फवारणी केल्यामुळे मिरचीची लांबी आठ ते दहा सें.मी. अधिक वाढली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची पिकावर मोठे विपरीत परिणाम जाणवले असले तरी बोडके यांना अद्याप उत्पन्न मिळण्याची आशा आहे. अनेकांना मिरचीने रडवले असताना शेतीला माहिती तंत्रज्ञानाची जोड दिल्यास दहा गुंठ्यातील मिरचीही चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते हे यातून दिसते.  द्राक्ष काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. सोनाका, गणेश, थॉमसन व काळी अशा जातीची द्राक्षे परदेशात जात असतानाच वणी व परिसरातील फ्लेम जातीच्या फिकट तपकिरी लालसर रंगाच्या गोड द्राक्षांनी गुजराथी जनतेला भुरळ घातली आहे. वणी-सापुतारा मार्गे गुजरात राज्यात मार्गक्र मण करणारे गुजराथी बांधव रस्त्यालगतच्या द्राक्षबागांमधून वा रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांकडून द्राक्ष खरेदी करताना दिसत आहे. सदरच्या द्राक्षांमध्ये तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्णत: साखर उतरते म्हणजेच नैसर्गिक गोडी तयार होते. त्यामुळे स्वाभाविक प्लेम जातीच्या द्राक्षांना पसंती दिली जात आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी