येवला : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी अनुदान रकमेचा लाभ मिळण्यासाठी तहसील कार्यालयाला दिलेले बँक खाते नंबरच चुकल्याने अनुदान असूनही, केवळ बँक खातेनंबर लिहिण्याची चूक केल्याने अनुदान मिळत नसल्याची माहिती उजेडात आली आहे.मार्च महिन्यात येवला तालुक्यात झालेल्या गारपिटीत शेतकऱ्यांना पाच कोटी २३ लाख रुपयांचा लाभ मिळणार होता. यापैकी येवला तहसील कार्यालयाकडे अजूनही ५० लाख रुपये अनुदान पडून आहे. ८५०० गारपीटग्रस्त शेतकऱ्यांपैकी १००० शेतकऱ्यांचे अनुदान देणे बाकी असले तरी यापैकी अनेक शेतकऱ्यांनी बँक खात्याचा नंबर चुकीचा असल्याचे कळविला आहे. संबंधित गावांत, कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याकडे आपला बिनचूक बँक खाते नंबर, देण्याचे आवाहन तहसीलदार शरद मंडलिक यांनी केले आहे. (वार्ताहर)कसबेसुकेणे: वनसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात दहावी परिक्षेत सोनाली जयराम शिंदे हिने ९०.८१ टक्के मिळवुन प्रथम क्रमांक पटकाविला.
येवल्यात लाभार्थी अनुदानापासून वंचित
By admin | Updated: June 20, 2014 01:19 IST