शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

येवला तालुका : पंचायत समितीत तीन गावे, एका वाडीचा टॅँकरसाठी प्रस्ताव डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:22 IST

तालुक्याला डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरी आटल्या असून, पाणीटंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरुवात झाली आहे.

येवला : तालुक्याला डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरी आटल्या असून, पाणीटंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरुवात झाली आहे. विहिरीचे स्रोत आटल्याने व तळ उघडा पडू लागल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठी तीन गावे आणि एक वाडीचा टँकर मागणीचा प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे दाखल झाला आहे. पाणी टँकर अद्याप तालुक्यात सुरू नसला तरी गावोगावचे पाणीटंचाईचे ठराव यायला सुरुवात झाली आहे. यामुळे आगामी सहा महिन्यांत पाणीटंचाई तालुक्याला हैराण करणार असल्याचे चित्र आजच दिसत आहे. पंचायत समिती आणि तहसीलचा संयुक्त पाहणी दौरा मात्र अजून सुरू झालेला नाही. तालुक्यातील अहेरवाडी, खैरगव्हाण, कुसमाडी ही तीन गावे आणि गोपाळ वाडीचे (खैरगव्हाण) टॅँकर प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहे.असा होतो मागणीचा प्रस्ताव मंजूरपाणीटंचाईच्या गावात प्रथम ग्रामपंचायतीत महिला कमिटी टंचाईचा ठराव करून पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करते. गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांची संयुक्त समिती संबंधित गावाला भेट देऊन पाहणी करते. त्यानंतर आवश्यकता असल्यास सदरचा प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला जातो. मंजुरी मिळाल्यानंतर गावाला टँकर सुरू होतो.पाणीटंचाई कृती आराखडागेल्या वर्षी सन २०१५-१६ मध्ये येवला तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. अंतिम टप्प्यात तब्बल ६३ गावे, ४४ वाड्यांना ३३ टँकर्सद्वारे दररोज ११६ खेपा करून पाणीपुरवठा करण्यात आला होता. २०१६-१७ मध्ये ४८२ मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याने तुलनेने पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी झाली होती; मात्र तालुका टँकरमुक्त होण्यासाठी नवीन पाणीस्रोत व साठवण करण्याची गरज नक्कीच कायम राहिली आहे. यंदा पालखेडचे आवर्तन फिरल्याने शेतीला पुरेसे पाणी मिळाले नसले तरी अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची टंचाई काहीकाळ लांबणीवर पडली होती. यंदा मात्र डिसेंबरमध्येच पाणीटंचाई भासू लागली आहे. टॅँकरचे प्रस्ताव दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.पाणीटंचाई आणि कृती आराखडापंचायत समितीच्या वतीने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करून दरवर्षी मंजूर केला जातो. या आराखड्यात उपाययोजना करताना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे हीच उपाययोजना प्राधान्याने विचारात घेतली जाते; मात्र पाणीपुरवठा निवारण करण्यासाठी विहीर, विंधन विहीर घेणे व लगतचे जलस्रोत बळकट करण्याचे उपाय मात्र केवळ कागदावरच राहतात, तर प्रत्यक्षात किती उतरवले जातात हा संशोधनाचा विषय आहे. गेल्या वर्षी पाणीटंचाईच्या दुसºया टप्प्यात कृती आराखड्याच्या कागदावर जानेवारी २०१७ ते मार्च २०१७ या तीन महिन्यांत २१ गावे आणि २४ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे नियोजन होते; मात्र तालुक्यात ४८२ मिलीमीटर पाऊस झाल्याने केवळ बाळापूर या एका गावाचा टँकर प्रस्ताव आला होता. यंदा जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत ३४ गावे व २३ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रस्तावित आहे.