शहरं
Join us  
Trending Stories
1
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
2
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
3
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
4
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
5
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
6
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
7
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
8
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
9
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
10
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
11
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
12
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
13
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
14
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
15
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
16
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
17
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
18
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
19
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
20
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुका : पंचायत समितीत तीन गावे, एका वाडीचा टॅँकरसाठी प्रस्ताव डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:22 IST

तालुक्याला डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरी आटल्या असून, पाणीटंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरुवात झाली आहे.

येवला : तालुक्याला डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरी आटल्या असून, पाणीटंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरुवात झाली आहे. विहिरीचे स्रोत आटल्याने व तळ उघडा पडू लागल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठी तीन गावे आणि एक वाडीचा टँकर मागणीचा प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे दाखल झाला आहे. पाणी टँकर अद्याप तालुक्यात सुरू नसला तरी गावोगावचे पाणीटंचाईचे ठराव यायला सुरुवात झाली आहे. यामुळे आगामी सहा महिन्यांत पाणीटंचाई तालुक्याला हैराण करणार असल्याचे चित्र आजच दिसत आहे. पंचायत समिती आणि तहसीलचा संयुक्त पाहणी दौरा मात्र अजून सुरू झालेला नाही. तालुक्यातील अहेरवाडी, खैरगव्हाण, कुसमाडी ही तीन गावे आणि गोपाळ वाडीचे (खैरगव्हाण) टॅँकर प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहे.असा होतो मागणीचा प्रस्ताव मंजूरपाणीटंचाईच्या गावात प्रथम ग्रामपंचायतीत महिला कमिटी टंचाईचा ठराव करून पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करते. गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांची संयुक्त समिती संबंधित गावाला भेट देऊन पाहणी करते. त्यानंतर आवश्यकता असल्यास सदरचा प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला जातो. मंजुरी मिळाल्यानंतर गावाला टँकर सुरू होतो.पाणीटंचाई कृती आराखडागेल्या वर्षी सन २०१५-१६ मध्ये येवला तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. अंतिम टप्प्यात तब्बल ६३ गावे, ४४ वाड्यांना ३३ टँकर्सद्वारे दररोज ११६ खेपा करून पाणीपुरवठा करण्यात आला होता. २०१६-१७ मध्ये ४८२ मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याने तुलनेने पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी झाली होती; मात्र तालुका टँकरमुक्त होण्यासाठी नवीन पाणीस्रोत व साठवण करण्याची गरज नक्कीच कायम राहिली आहे. यंदा पालखेडचे आवर्तन फिरल्याने शेतीला पुरेसे पाणी मिळाले नसले तरी अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची टंचाई काहीकाळ लांबणीवर पडली होती. यंदा मात्र डिसेंबरमध्येच पाणीटंचाई भासू लागली आहे. टॅँकरचे प्रस्ताव दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.पाणीटंचाई आणि कृती आराखडापंचायत समितीच्या वतीने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करून दरवर्षी मंजूर केला जातो. या आराखड्यात उपाययोजना करताना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे हीच उपाययोजना प्राधान्याने विचारात घेतली जाते; मात्र पाणीपुरवठा निवारण करण्यासाठी विहीर, विंधन विहीर घेणे व लगतचे जलस्रोत बळकट करण्याचे उपाय मात्र केवळ कागदावरच राहतात, तर प्रत्यक्षात किती उतरवले जातात हा संशोधनाचा विषय आहे. गेल्या वर्षी पाणीटंचाईच्या दुसºया टप्प्यात कृती आराखड्याच्या कागदावर जानेवारी २०१७ ते मार्च २०१७ या तीन महिन्यांत २१ गावे आणि २४ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे नियोजन होते; मात्र तालुक्यात ४८२ मिलीमीटर पाऊस झाल्याने केवळ बाळापूर या एका गावाचा टँकर प्रस्ताव आला होता. यंदा जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत ३४ गावे व २३ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रस्तावित आहे.