येवला : तालुक्यातील चार गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, चार गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकार्यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. आणखी चार गावांची पाणीटंचाई क्षेत्र म्हणून प्रशासनाने पाहणी करून प्रस्ताव तयार करण्याच्या तयारीत आहेत.आडगाव चोथवा ग्रामपंचायतीअंतर्गत बोरगाव येथील पाणीटंचाईसह १३ गावांना तीव्र पाणीटंचाई भासत आहे. पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन २१ दिवसांपूर्वीच येवला तालुक्याला आल्याने शहरातील गंगासागर तलाव ३८ गाव पाणीपुरवठ्याचे तलाव व इतर २० गावांचे गावतळे व बंधारे पाण्याने भरल्याने, पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी झाली आहे.संबंधित १३ गावांतील विहिरीचे पाणी आटले. तळ उघडा पडला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे.२२ एप्रिल रोजी चिचोंडीला पाण्याचा टँकर पाठवून तेथील जनतेला प्रशासनाने दिलासा दिला होता. परंतु पाण्याचे आवर्तन आल्याने २२ एप्रिलपासून चिचांेडीच्या टँकरच्या खेपा बंद करण्यात आल्या.महाल गाव, घनामाळी मळा, नगरसूल, गुजरखेडा, मुरमी येथे सध्या टँकरची रोज एक खेप टाकली जात आहे. आहेरवाडी, देवरगाव, तळवाडे, शिवाजीनगर (तळवाडे) आदि चार गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकार्यांच्या मजुरीच्या प्रतीक्षेत आहे.सध्या बाळापूर, कासारखेडे, निळखेडे, सायगाव (महादेववाडी) आदि चार गावांचे टँकर मागणी प्रस्ताव येवला पंचायत समितीत गटविकास अधिकार्यांकडे आले आहे. आगामी दोन दिवसात याबाबत कार्यवाही अपेक्षित आहे. बोरगाव येथेरी तीव्र पाणीटंचाई भासत आहे. तहसीलदार शरद मंडलिक, गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी टँकरची मागणी व पाहणी करून तात्काळ टँकर उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
येवला तालुक्यात १३ गावांत पाणीटंचाई मागणी वाढली : चार गावांत टँकर सुरू
By admin | Updated: May 5, 2014 19:36 IST